महत्वाच्या बातम्या
-
ईडीच्या अशा नोटीशीला मनसे भीक घालत नाही: मनसेची प्रतिक्रिया
कोहिनूर मिल प्रकरणात मनसेप्रमुखराज ठाकरे यांना बजावण्यात आलेल्या नोटिशीविरोधात मनसेने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ”पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नव्या भारतातील हिटलर आहेत. राज ठाकरेंना बजावण्यात आलेली ईडीची नोटीस हा केवळ दबावतंत्राचा भाग आहे. गेल्या पाच सहा वर्षांत भाजपाच्या एकाही नेत्याची ईडीकडून चौकशी झालेली नाही. मात्र अशा चौकशांना मनसे घाबरणार नाही, तर हिटलरशाहीविरोधातील लढा सुरूच राहील, असा इशारा मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी दिला.
6 वर्षांपूर्वी -
गडकरी म्हणाले, अधिकाऱ्यांनो कामं करा अन्यथा लोकांकडून धुलाई; मग विरोधकांवर खटले का?
एमएसएमई सेक्टर मध्ये लघु उद्याेग भारतीच्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नवीन वाद निर्माण हाेण्याची शक्यता आहे. आठ दिवसांमध्ये कामं पूर्ण केली नाहीत तर लोकांना कायदा हातात घेऊन तुमची धुलाई करण्यास सांगेन अशी तंबी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग विकासमंत्री नितीन गडकरी यांनी अधिकाऱ्यांना दिली आहे. या विधानामुळे नितिन गडकरी पून्हा एकदा चर्चेत आले आहेत. तसेच आपण लालफितीच्या कारभराच्या विराेधात असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
6 वर्षांपूर्वी -
देश मंदिर-मशीद, कलम ३७० मध्ये गुंतला; तर रोजगारा अभावी तरुणाच्या आत्महत्यांकडे डोळेझाक
मागील काही दिवसांपासून एक बाजूला देशभर मंदिर मशीद आणि कलम ३७० वरून वातावरण पेटत ठेवण्यात आलं आहे. मात्र दुसऱ्याबाजूला सामान्य लोकांच्या जीवनाशी निगडित असलेला रोजगार आणि भूकमारी याकडे पूर्णपणे कानाडोळा केला जात असल्याचं पाहायला मिळत आहे. केवळ गावखेडयताच नव्हे तर शहरात देखील अनेक कारखाने आणि कंपन्या बंद होत असल्याच्या कारणाने सुशिक्षित तरुण देखील मोठ्या संख्येने रोजच्या रोज बेरोजगार होतो आहे.
6 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्र्यांनी लावलेला हाऊसफुल्ल बोर्ड हटवून हे भाजप नेते पुन्हा भरती सुरु करणार
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी, काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते भारतीय जनता पक्ष-शिवसेनेच्या वाटेवर असताना कोकणातील दोन-तीन आमदार भाजपात येण्यास उत्सुक असल्याचा दावा भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी केला आहे. ज्यांची प्रतिमा चांगली आहे, ज्यांना जनसमुदायात मान्यता आहे, अशा लोकप्रतिनिधींनाच पक्षात प्रवेश दिला जाईल, असेही त्यांनी म्हटले. त्यामुळे भारतीय जनता पक्ष मेगाभरतीचं दुसरं पर्व लवकरच रंगणार, याचे संकेत त्यांनी दिले आहेत. पक्षात काहीच राहिलं नसेल तर प्रत्येक जण वाट शोधतो, अशीच काहीशी परिस्थिती एनसीपीची झालेली आहे, असे म्हणत त्यांनी एनसीपीवर जोरदार टीका केली.
6 वर्षांपूर्वी -
देशभरात प्लॅस्टिक बंदी कठोरपणे करा: आदित्य ठाकरे
संपूर्ण देशात प्लॅस्टिकबंदी कायदा करून कडक अंमलबजावणी करा, अशी मागणी युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी केली आहे. महाराष्ट्रात प्लॅस्टिकबंदी लागू झाली असून अंमलबजावणी करण्यात येत आहे. परंतु आता ‘सिंगल यूज’ प्लॅस्टिक देशातून हद्दपार करण्याची गरज असून त्यासाठी कठोर कायदा करून काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची नितांत गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आज शिवसेना भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला तेव्हा त्यांनी हे भाष्य केलं.
6 वर्षांपूर्वी -
अर्थमंत्र्यांची पत्नी विश्वस्त पदी; तिरुपती देवस्थानला २०० कोटींचा भूखंड १ रुपया दराने; सरकारचा पराक्रम
श्रीमंत तिरुपती देवस्थानाला मुंबईतली कोट्यवधींची जमीन एक रुपया भाडेपट्ट्याने देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. देवस्थानाच्या मागणीनुसार मुंबईतील वांद्रे उपनगरातील शासकीय जमीन 30 वर्षांसाठी भाडेपट्ट्याने देण्यास ८ ऑगस्ट रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. आपल्या पत्नीचे विश्वस्त पद कायम राहावे म्हणून राज्याच्या अर्थमंत्र्यांनी ८० कोटी किंमत असणारी सरकारी जमीन तिरुपती देवस्थान ट्रस्टला चक्क १ रुपया या कवडीमोल भावाने दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या कामासाठी पारदर्शकतेचा कायम पुरस्कार करणा-या मुख्यमंत्र्यांनीही पाठिंबा दिल्याची माहिती मंत्रालयातील विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, या जमिनीचे बाजारमूल्य दोनशे कोटी आहे.
6 वर्षांपूर्वी -
बहुमताच्या जोरावर शेतकरी हिताचा स्वामिनाथन आयोग लागू का केला नाही: बच्चू कडू
प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी मोदी सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून चांगलेच धारेवर धरले आहे. सध्या देशभर कलम ३७० हटवण्यावरून जोरदार चर्चा रंगली असताना, भारतीय जनता पक्षाने ते बहुमताच्या जोरावर केल्याचं म्हटलं गेलं. मात्र आमदार बच्चू कडू यांनी नेमका त्याच बहुमताचा आधार घेत भारतीय जनता पक्षाला लक्ष केलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
‘वंचित’कडून २८८ जागा लढण्यासाठी मोर्चेबांधणी; भाजप-सेना देखील स्वबळावर? सविस्तर
महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुका काही महिन्यांतच होणार असून, वंचित बहुजन आघाडीला निवडणूक लढविण्यासाठी निवडणूक आयोगाने कपबशी गायब करून गॅस सिलिंडर हे चिन्ह दिलं आहे. तसेच वंचित आघाडीकडूनही २८८ जागा लढविण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. मात्र आता मतदारांंपर्यंत कपबशी ऐवजी गॅस सिलेंडर हे नवे चिन्ह पोहोचविण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.
6 वर्षांपूर्वी -
कारण उद्धव ठाकरे म्हणाले, ‘राणे परत आले तर मी घर सोडीन’
राज्याचे माजी मुख्यमंत्री, ‘प्रहार’चे संपादकीय सल्लागार, खासदार नारायण राणे यांचे आत्मकथन असलेल्या ‘झंझावात’ या मराठी पुस्तकाचे प्रकाशन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या हस्ते, No Holds Barred या इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभगृहात शुक्रवारी सायंकाळी एका शानदान समारंभात झाले. या कार्यक्रमास राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनासकर, सांस्कृतिक व मराठी भाषा मंत्री विनोद तावडे, शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, खा. सुनील तटकरे, आ. कालिदास कोळंबकर, दोन्ही पुस्तकांचे संपादक प्रियम मोदी, मधुकर भावे, सौ. निलमताई राणे, निलेश राणे, आ. नितेश राणे आदी उपस्थित होते.
6 वर्षांपूर्वी -
विरोधकांवर तुटून पडणारा भाजप प्रकाश आंबेडकरांवर टीका का करत नसावा? सविस्तर
महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुका काही महिन्यांतच होणार असून, वंचित बहुजन आघाडीला निवडणूक लढविण्यासाठी निवडणूक आयोगाने कपबशी गायब करून गॅस सिलिंडर हे चिन्ह दिलं आहे. तसेच वंचित आघाडीकडूनही २८८ जागा लढविण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. मात्र आता मतदारांंपर्यंत कपबशी ऐवजी गॅस सिलेंडर हे नवे चिन्ह पोहोचविण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.
6 वर्षांपूर्वी -
डॉ. बाबासाहेबांचे विचार संपविण्यासाठीच भाजप वंचितला चालवत आहेत: जोगेंद्र कवाडे
पीआरपीचे राष्ट्रीय अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ‘रिपब्लिकन’ हा राजकीय विचार संपविण्याचा प्रयत्न प्रकाश आंबेडकरांकडून होत आहे असं कवाडे म्हणाले आहेत. तसेच त्यांनी वंचित बहुजन आघाडीवरही जोरदार टीका केली.
6 वर्षांपूर्वी -
सांगली: पूरग्रस्त दुर्गम भागात मनसेकडून औषधांचा पुरवठा
निसर्गही किती विचित्र आहे, एका बाजूला मराठवाड्यात सुका दुष्काळ पडला असतानाच कोल्हापूर, सांगली, सातारा, नाशिक व कोकणाला निर्दयीपणाने पावसाने झोडपून काढले. इतके की, अनेक वर्षांनी महापूर आला. भयावह पूरसदृश परिस्थिती महाराष्ट्रात १ ऑगस्टपासून निर्माण व्हायला सुरुवात झाली, पण इतकी भयानक परिस्थिती निर्माण होईल, असं कुणाला स्वप्नातही वाटलं नव्हतं. शहरांना जोडणारे अनेक महामार्ग तसेच गावाकडे जाणारे छोटेछोटे रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले, त्यामुळे दररोज या रस्त्यावर धावणारी लोकवाहिनीही ठप्प झाली.
6 वर्षांपूर्वी -
कौतुकास्पद! प्रकाश आंबेडकरांनी दत्तक घेतलं सांगलीतील 'ब्रह्मनाळ' गाव
कोल्हापूर आणि सांगलीच्या भीषण पूरस्थितीचा सामना करण्यासाठी राज्यभारातून अनेक हात पुढे येत आहेत. या जिल्ह्यांतील अनेक गावे उध्वस्त झाली आहेत. सांगली जिल्ह्याच्या पलूस तालुक्यातील ब्रम्हनाळ हे पूरग्रस्त गाव वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दत्तक घेतलं आहे. ब्रम्हनाळ गावात पुराचे पाणी घुसलेले असताना बचावकार्यादरम्यान बोट पाण्यात उलटुन १४ जणांचा दुर्देवी मृत्यू झाला त्यामुळे या गावावर मोठी शोककळा पसरली आहे. ३५०० लोकसंख्या असलेल्या या गावाचे पुनर्वसन करण्याची जबाबदारी प्रकाश आंबेडकर यांनी घेतली आहे.
6 वर्षांपूर्वी -
पूरग्रस्त व रूग्णांच्या भेटी घेताना गिरीश महाजन पुरग्रस्तांच्या अंथरुणावर शूज घालून
दोन दिवसांपूर्वी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी करण्याआधी जात असलेल्या बोटीतून हसत सेल्फी व्हिडीओ काढल्याने अनेकांनी त्यांच्यावर टीका केली होती. पुराचं कोणतंही गांभीर्य मंत्र्यांना नाही अशी टीका झाल्यानंतर गिरीश महाजन यांनी सांगलीत पाण्यात उतरुन पुन्हा मार्केटिंग केलं. मात्र बोलण्याच्या ओघात ट्विटमध्ये संबंधित गावातील लोकांना ४ दिवस कोणतीही शासकीय मदत मिळाली नव्हती अशी माहिती देताना अप्रत्यक्षपणे सरकार ४ दिवस झोपल्याचे सिद्ध केले होते. त्यात कोल्हापूरमधील शोबाजीवरून विरोधकांनी आणि नेटकऱ्यांनी चांगलेच फैलावर घेतल्याने त्यांना सांगलीत उपरती आली असेच दिसले.
6 वर्षांपूर्वी -
संवेदनशील नाना पूरग्रस्तांना ५०० घरं बांधून देणार
सांगली आणि कोल्हापूरातील भीषण पूरस्थितीचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र पुढे सरसावला आहे. त्यामध्ये, स्थानिक कोल्हापूर आणि सांगलीतील नेते, सामाजिक संघटना, समाजसेवक यांसह अनेकांनी मदतीसाठी स्वत:ला झोकून देऊन काम केले. कोल्हापुरातील शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीला संवेदनशील अभिनेता नाना पाटेकरही धावला आहे. नाना आज कोल्हापुरातील 5 गावांना भेटी देणार असून तेथे मदतकार्य करत आहे.
6 वर्षांपूर्वी -
संकटकाळात निवडणुकांची चर्चा कशाला म्हणणाऱ्यांकडून महापौर-उपमहापौरांच्या निवडणुकीला मुदतवाढ
सध्या राज्यावर पुराचे संकट असताना निवडणुकांची चर्चा कशाला असा सवाल करत पूरग्रस्तांना मदत पोहोचवण्याकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले. त्यावेळी त्यांच्या अप्रत्यक्ष रोख हा राज ठाकरे यांचावर होता.
6 वर्षांपूर्वी -
फडणवीसांनी उंटावरून शेळ्या राखणे बंद करावं: रुपाली चाकणकर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पूरस्थितीपेक्षा महाजनादेश यात्रेची काळजी आहे, मागील पाच वर्षात जनतेच्या हिताचे निर्णय घेतले असते तर आज यात्रा काढण्याची गरज पडली नसती. सरकार पूरस्थिती हाताळण्यात अपयशी ठरले असून मुख्यमंत्र्यांनी उंटावरून शेळ्या राखणे बंद करावे, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
मनसे नवी मुंबई-पालघर शाखांकडून जीवनावश्यक वस्तूंचे ट्रक सांगली-कोल्हापूरच्या दिशेने रवाना
कोल्हापूर आणि सांगलीमध्ये पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला होता. त्यात सांगलीतील बचावकार्यात तब्बल १६ लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची दुःखद घटना देखील घडली. लाखो लोकांचे घरदार आणि संपूर्ण संसाराचं उध्वस्त झाले आहेत. दरम्यान, मदतीचा ओघ संपूर्ण राज्यातून सुरु झाला आहे तर दुसऱ्याबाजूला उशिरा का होईना, पण प्रशासनाकडून बचाव कार्य देखील युद्धपातळीवर सुरु असून, त्यात अनेक स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक तरुणांचा सहभाग लक्षणीय आहे.
6 वर्षांपूर्वी -
शर्मिला राज ठाकरे आज सांगली-कोल्हापूर पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर
सतत पडणाऱ्या पावसामुळे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात नद्यांना पूर आल्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेले आहे. तसेच नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेले आहे. तसेच या पूरग्रस्तांसाठी सरकार सर्वतोपरी मदत करताना दिसत आहे. तसेच पूरग्रस्त भागाच्या विकासासाठी विविध सामाजिक संस्थांनीही पुढाकार घेतलेला दिसत आहे.
6 वर्षांपूर्वी -
कल्याण शहर घोषणेचे ६५०० कोटी ५ वर्ष वेटिंगवर; आता पूरग्रस्तांसाठी ६,८०० कोटींची घोषणा
पूरग्रस्त भागांसाठी केंद्र सरकारने ६ हजार कोटींची मदत द्यावी अशी मागणी राज्य सरकारने केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फड़णवीस यांनी दिली आहे. मुंबईतल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. कोल्हापूर, सांगली आणि सातारा अशा एका भागाला एक भाग असेल. तर दुसरा भाग कोकण, नाशिक आणि उर्वरित महाराष्ट्राचा दुसरा भाग असेल. कोल्हापूर, सांगली, सातारा यासाठी ४७०० कोटी तर उर्वरित भागांसाठी २१०० कोटींची मदत मागितली आहे असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
AWL Share Price | अदानी विल्मर शेअर देईल तगडा परतावा, 49 टक्के अपसाईड कमाईची संधी, अपडेट नोट करा - NSE: AWL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर्सची जोरदार खरेदी, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL