महत्वाच्या बातम्या
-
काल शिवस्वराज्य यात्रा सुरू झाली आणि सरकारने या यात्रेचा धसका घेतला
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पक्षांनी मोर्चेबंधणीला सुरवात केली आहे. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसने खा. डॉ. अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली ‘शिवस्वराज्य यात्रा’ सुरू केली आहे. या यात्रेत खा. कोल्हे आपल्या पक्षाला बळ देणार असून राज्यातील जनतेला विधानसभा निवडणुकीतील पक्षाच्या भूमिका समजावून सांगत आहेत. मात्र राष्ट्रवादीच्या बहुउद्देशीय या ‘शिवस्वराज्य यात्रेत’ गटबाजी असल्याचं समोर आलं होतं. तर पक्षातील काही नेत्यांना विश्वासात व विचारात न घेता या यात्रेचे आयोजन केले असल्याची कुजबुज पक्षात सुरु असल्याचं बोललं जात होत.
6 वर्षांपूर्वी -
कोल्हापूर, सांगलीला महापुर; जनजीवन विस्कळीत
कोल्हापूर : आठवड्याभरापासून कोसळत असलेला मुसळधार पाऊस आणि पात्राबाहेर वाहणाऱ्या नद्यांनी दक्षिण महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूर शहर-जिल्ह्यांची अवस्था बुधवारी आणखी भीषण केली. या दोन्ही शहरांना सोमवारपासून बसलेला महापुराचा विळखा बुधवारी आणखी आवळला गेला. हजारो बुडालेली घरे, पाण्याखाली गेलेले रस्ते-बाजारपेठा, ठप्प झालेले जनजीवन आणि मदतीसाठी सुरू असलेली विविध यंत्रणांची धडपड.. हेच विदारक चित्र या दोन्ही शहर- जिल्ह्य़ांमध्ये दिसत होते.
6 वर्षांपूर्वी -
सरसकट कर्जमाफी केल्याशिवाय शांत बसणार नाही: आदित्य ठाकरे
लोकसभा निवडणूकीनंतर आता सर्वत्र विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. सर्वच पक्षांनी पक्षबांधणी, राजकीय दौरे, भेटीगाठी यांसारख्या राजकीय घडामोडींना उधाण आले आहेत. याच पार्श्वभूमीवर युवसेना प्रमुख आदित्य ठाकरे हे राज्याच्या जन आशीर्वाद यात्रेवर आहेत. रविवारी सकाळी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची जन आशीर्वाद यात्रा परभणीहुन बीड जिल्ह्यात पोहोचली आहे. यावेळी त्यांनी बीडमध्ये नागरिकांशी संवाद साधला यावेळी बोलताना शेतकऱ्यांविषयी मोठे विधान केले आहे. त्यांनी शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी केल्याशिवाय शांत बसणार नाही अस विधान केले आहे.
6 वर्षांपूर्वी -
पावसामुळे मुंबई आणि आसपासच्या शहरातील वाहतूक जवळपास ठप्प होण्याच्या दिशेने
मुंबई आणि परिसरात कालपासून मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने थैमान घातले आहे. आजही दिवसभर मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला असून आज हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे गरज नसल्यास घराबाहेर पडू नका, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. दरम्यान, अनेक ठिकाणी सखल भागांत पाणी साचल्याने रस्ते वाहतूक कोलमडली असून रेल्वे रूळही पाण्याखाली गेल्याने रेल्वे वाहतूकही कोलमडली आहे. त्यामुळे प्रवाशांना प्रचंड हाल सोसावे लागत आहेत.
6 वर्षांपूर्वी -
सेनेत गृहकलह वाढवण्यासाठी फडणवीसांनी आदित्य यांच्या उपमुख्यमंत्री पदाबाबत भाष्य केलं? सविस्तर
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेपर्यंत पोहचत आहेत. मात्र ही यात्रा सुरु झाल्याप्पासून आदित्य ठाकरे हेच शिवसेनेकडून मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असतील अशी चर्चा आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष आता विधानसभा निवडणुकीवर लागले आहे. त्यातच मुख्यमंत्रीपदावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये चढाओढ पहायला मिळत आहे. शिवसेनेकडून आदित्य ठाकरे यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी पुढे केलेले पहायला मिळत आहे.
6 वर्षांपूर्वी -
आता बांधकाम कामगारांना मिळणार अवघ्या ५ रुपयात जेवण
कोणतीही इमारत किंवा प्रकल्प उभा करायचा असेल तर यात अत्यंत महत्वाची भूमिका असते ती म्हणजे बांधकाम कामगारांची. याच कामगारांना आता अटल आहार योजनेअंतर्गत अवघ्या पाच रुपयात जेवण उपलब्ध होणार आहे. अटल आहार योजना क्रेडाई पुणे मेट्रोच्या सहकार्याने हि योजना गुरुवारी सुरु झाली. कोणतीही इमारत उभी राहण्याच्या प्रक्रियेत कामगारांची महत्वाची भूमिका असते.
6 वर्षांपूर्वी -
VIDEO पुरावे: ईव्हीएम'संदर्भात उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांचे ही गंभीर आरोप होते
ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरनं निवडणुका घेण्यासाठी आंदोलन करण्यापेक्षा विरोधकांनी आत्मचिंतन करावे, असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंना टोला लगावला आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी गुणवत्ता असलेल्या आमदार-पदाधिकारी व अन्य नेत्यांना भाजपात सुरू असलेला प्रवेश आता बंद झाला असला तरी विदर्भातील नेत्यांचे आम्ही स्वागत करू, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले आहे. ईव्हीएमच्या ऐवजी बॅलेट पेपरच्या माध्यमातून निवडणुका घेण्यासाठी आंदोलन करणे हे अविश्वास दर्शविण्यासारखे आहे. ते न करता आत्मचिंतन करावे, असा सल्ला त्यांनी विरोधकांना दिला आहे.
6 वर्षांपूर्वी -
VIDEO: आशिष शेलारजी भाजप निवडणूक लढवतं; मग हे नेते काय बोलत आहेत ईव्हीएम'वर?
ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरनं निवडणुका घेण्यासाठी आंदोलन करण्यापेक्षा विरोधकांनी आत्मचिंतन करावे, असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंना टोला लगावला आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी गुणवत्ता असलेल्या आमदार-पदाधिकारी व अन्य नेत्यांना भाजपात सुरू असलेला प्रवेश आता बंद झाला असला तरी विदर्भातील नेत्यांचे आम्ही स्वागत करू, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले आहे. ईव्हीएमच्या ऐवजी बॅलेट पेपरच्या माध्यमातून निवडणुका घेण्यासाठी आंदोलन करणे हे अविश्वास दर्शविण्यासारखे आहे. ते न करता आत्मचिंतन करावे, असा सल्ला त्यांनी विरोधकांना दिला आहे.
6 वर्षांपूर्वी -
VIDEO पुरावे: ईव्हीएमवर जी शंका राज ठाकरे आणि विरोधकांनी घेतली, ती भाजपला देखील
ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरनं निवडणुका घेण्यासाठी आंदोलन करण्यापेक्षा विरोधकांनी आत्मचिंतन करावे, असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंना टोला लगावला आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी गुणवत्ता असलेल्या आमदार-पदाधिकारी व अन्य नेत्यांना भाजपात सुरू असलेला प्रवेश आता बंद झाला असला तरी विदर्भातील नेत्यांचे आम्ही स्वागत करू, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले आहे. ईव्हीएमच्या ऐवजी बॅलेट पेपरच्या माध्यमातून निवडणुका घेण्यासाठी आंदोलन करणे हे अविश्वास दर्शविण्यासारखे आहे. ते न करता आत्मचिंतन करावे, असा सल्ला त्यांनी विरोधकांना दिला आहे.
6 वर्षांपूर्वी -
ईव्हीएमवर शंका घेण्यापेक्षा विरोधकांनी आत्मचिंतन करावे: फडणवीस
ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरनं निवडणुका घेण्यासाठी आंदोलन करण्यापेक्षा विरोधकांनी आत्मचिंतन करावे, असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंना टोला लगावला आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी गुणवत्ता असलेल्या आमदार-पदाधिकारी व अन्य नेत्यांना भाजपात सुरू असलेला प्रवेश आता बंद झाला असला तरी विदर्भातील नेत्यांचे आम्ही स्वागत करू, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले आहे. ईव्हीएमच्या ऐवजी बॅलेट पेपरच्या माध्यमातून निवडणुका घेण्यासाठी आंदोलन करणे हे अविश्वास दर्शविण्यासारखे आहे. ते न करता आत्मचिंतन करावे, असा सल्ला त्यांनी विरोधकांना दिला आहे.
6 वर्षांपूर्वी -
त्या ईडी'ला मी घाबरतही नाही: राज ठाकरे
निवडणूक होत असताना पारदर्शकता बाळगली गेलीच पाहिजे अशी आमची प्रमुख मागणी आहे. त्याचमुळे ईव्हीएमला आमचा विरोध आहे. विधानसभा निवडणूक बॅलेट पेपरवर निवडणूक घेतली गेली पाहिजे अशी मागणी विरोधकांकडून करण्यात आली. लोकशाहीत हे घडता कामा नये असेही अजित पवार यांनी यावेळी म्हटलं आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सगळ्यांच्या वतीने भूमिका मांडली आणि त्यामध्ये त्यांनी ईव्हीएमवर शंका उपस्थित केली. विधानसभा निवडणुकीत EVM नको बॅलेट पेपर आणा अशी मागणी विरोधकांनी एकमुखाने केली आहे. ईव्हीएम विरोधात २१ ऑगस्ट रोजी आम्ही मोर्चा काढणार आहोत. ही जनभावना आहे त्यामुळे या मोर्चात एकाही पक्षाचा झेंडा नसेल. लोकांचं म्हणणं काय आहे? ते आम्ही मांडणार आहोत असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
6 वर्षांपूर्वी -
ईव्हीएम'विरोधात एल्गार! २१ ऑगस्टला विरोधकांचा मोर्चा
निवडणूक होत असताना पारदर्शकता बाळगली गेलीच पाहिजे अशी आमची प्रमुख मागणी आहे. त्याचमुळे ईव्हीएमला आमचा विरोध आहे. विधानसभा निवडणूक बॅलेट पेपरवर निवडणूक घेतली गेली पाहिजे अशी मागणी विरोधकांकडून करण्यात आली. लोकशाहीत हे घडता कामा नये असेही अजित पवार यांनी यावेळी म्हटलं आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सगळ्यांच्या वतीने भूमिका मांडली आणि त्यामध्ये त्यांनी ईव्हीएमवर शंका उपस्थित केली. विधानसभा निवडणुकीत EVM नको बॅलेट पेपर आणा अशी मागणी विरोधकांनी एकमुखाने केली आहे. ईव्हीएम विरोधात २१ ऑगस्ट रोजी आम्ही मोर्चा काढणार आहोत. ही जनभावना आहे त्यामुळे या मोर्चात एकाही पक्षाचा झेंडा नसेल. लोकांचं म्हणणं काय आहे? ते आम्ही मांडणार आहोत असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
6 वर्षांपूर्वी -
धक्कादायक! शिवसेनेच्या माजी नगरसेवकाला बलात्काराच्या गुन्ह्यात अटक
अंबरनाथमधील शिवसेनेच्या माजी नगरसेवकावल बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच याप्रकरणात त्याला अटकही करण्यात आली आहे. प्रधान पाटील असं या माजी नगरसेवकाचे नाव आहे. अंबरनाथमध्ये एका महिलेने शिवसेनेच्या माजी नगरसेवकावर गुरुवारी बलात्काराचा आरोप केल्याने खळबळ उडाली होती. त्यानंतर आज पोलिसांनी याची दखल घेत प्रधान पाटील याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलिसांनी प्रधान पाटील याला अटक केली आहे. याप्रकरणी आता पोलीस अधिक तपास करत आहेत. लवकरच या प्रकरणातील संपूर्ण माहिती समोर येईल.
6 वर्षांपूर्वी -
दुष्काळग्रस्त भागातील गरीब विद्यार्थ्यांचं परीक्षा क्षुल्क माफ
राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील गरीब विद्यार्थ्यांना मोठा दिलासा राज्य सरकारने दिला आहे. या भागातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा क्षुल्क माफ करण्यात आले आहे. हा महत्वपूर्ण निर्णय राज्यसरकारने घेतला असल्याची माहिती शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी ट्विटरवरून दिली. ज्या दुष्काळग्रस्त भागात लोकांना अन्न पाण्याविना राहावे लागते. त्याच परिस्थितीत विध्यार्थी परीक्षा क्षुल्क कसे भरू शकणार यासाठी राज्यसरकारने हा निर्णय घेतला आहे.
6 वर्षांपूर्वी -
भाजपात दुसरी मेगाभरती १० ऑगस्टला?
भारतीय जनता पक्षात दुसरी मेगाभरती १० ऑगस्टच्या सुमारास होणार असल्याची माहिती सध्या समोर येत आहे. बुधवारी झालेल्या मेगाभरतीमध्ये भाजपाने काँग्रेस राष्ट्रवादीमधील एकूण ६ बड्या नेत्यांसह अनेक नगरसेवक, पदाधिकारी यांना पक्षप्रवेश दिला.
6 वर्षांपूर्वी -
राज यांच्या EVM विरोधी आक्रमकपणामुळे ईडी'चं अस्त्र? भाजप राज ठाकरेंना घाबरल्याची चर्चा
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट काल थेट पश्चिम बंगालमध्येच जाऊन भेट घेतल्याने संपूर्ण राज्यातील भारतीय जनता पक्षामध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी दबक्या आवाजात भीती व्यक्त केली जाऊ लागली आहे. कारण सक्तवसुली संचलनालयाच्या (ईडी) सुत्रांकडून प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना प्राप्त झालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना लवकरच समन्स बजावण्यात येणार आहे. येणाऱ्या आठवड्यात हा समन्स बजावला जाण्याची शक्यता आहे. फ्री प्रेस जर्नलने दिलेल्या वृत्तानुसार, कोहिनूर मिल क्रमांक ३ विकत घेण्यामध्ये राज ठाकरे यांची भूमिका असून यासाठीच ते ईडीच्या रडारवर आहेत.
6 वर्षांपूर्वी -
२००९-२०१४ मध्ये फक्त जाहिरातीत माउलीच्या समस्या समजून घेतल्या; उद्यापासून पुन्हा 'माउली संवाद'
महाराष्ट्र शासनाने सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाच्या अध्यक्ष पदाला राज्यमंत्रिपदाचा दर्जा देण्याचा निर्णय घेतल्याने साहजिकच शिवसेनेचे सचिव आदेश बांदेकर यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा प्राप्त झाला होता. आदेश बांदेकर हे शिवसेनेत सध्या सचिव या पदावर असून, शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या मुंबईच्या श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाचे अध्यक्ष पद त्यांना देण्यात आले होते
6 वर्षांपूर्वी -
भाजपनीती! एनसीपी'चे बहुतांश आमदार सेनेविरुद्ध निवडून आल्याचा इतिहास; युती अचानक तोडणार? सविस्तर
लवकरच राज्यात विधानसभा निवडणुका होऊ घातल्या असल्या तरी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भारतीय जनता पक्षाचे अंतर्गत मनसुबे भलतेच असू शकतात याची शिवसेनेला देखील पूर्व कल्पना असणार. त्यात लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला मिळालेलं यश देखील मोदीमुळेच आहे असं भाजपचे अनेक नेते पडद्याआड बोलून दाखवत आहेत, तर शिवसेनेचे अनेक खासदार देखील ते पाठीमागे मान्य करतात.
6 वर्षांपूर्वी -
उद्योगपतींवर आत्महत्येची वेळ; हे 'मेड इन इंडिया' की 'डेड इन इंडिया'? - धनंजय मुंडे
मागील २ दिवस बेपत्ता असलेले ‘सीसीडी’चे मालक व्ही. जी. सिद्धार्थ यांचा धक्कादायक मृत्यू झाला आहे. सिद्धार्थ यांनी मंगळुरु येथील नेत्रावती नदीत आत्महत्या केली असल्याचं सांगितलं आहे. आज नदीत त्यांचा मृतदेह सापडला आहे. यावरून आत्महत्येचा संशय व्यक्त केला जात आहे. तसेच सिद्धार्थ यांनी एक पत्र देखील लिहिले होते.
6 वर्षांपूर्वी -
खेकड्यांमुळे धरण कसे फूटू शकते? विद्यार्थ्याचा आदित्य ठाकरेंना सवाल
युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला आजपासून सुरुवात झाली आहे. लोकसभा निवडणुकीत ज्या मतदारांनी शिवसेनेला मतदान केले त्यांचे आभार मानण्यासाठी आणि ज्यांनी शिवसेनेला मतदान केले नाही त्या मतदारांचे मन जिंकण्यासाठी आदित्य ठाकरेंनी आज सोलापुरातून यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात केली आहे. यावेळी वालचंद महाविद्यालयात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना, ‘युवासेनाप्रमुख म्हणून तुमचे प्रश्न पुढे नेण्यासाठी मला ते ऐकणे गरजेचे आहे म्हणूनच मी युवा संवाद हा कार्यक्रम घेतला आहे, असे म्हणत, १८ ते १९ वर्षाच्या वयात मनात जे प्रश्न आहेत ते विचारायला विद्यार्थी घाबरत नाहीत’, याचे आदित्य ठाकरेंनी कौतुक केले.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
AWL Share Price | अदानी विल्मर शेअर देईल तगडा परतावा, 49 टक्के अपसाईड कमाईची संधी, अपडेट नोट करा - NSE: AWL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर्सची जोरदार खरेदी, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL