महत्वाच्या बातम्या
-
सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोगावर विश्वास नाही- राज ठाकरे
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची राज ठाकरेंनी आज त्यांच्या कोलकात्यातील कार्यालयात जाऊन भेट घेतली आहे. त्यानंतर राज ठाकरे आणि ममता बॅनर्जी पत्रकारांना सामोरे गेले आहेत. निवडणुकांमध्ये ईव्हीएम नकोच, बॅलेट पेपरच्याच माध्यमातून निवडणुका घ्या, असं ममता बॅनर्जींनी स्पष्ट केलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
भाजप-सेनेच्या 'महाजनादेश आणि जण आशीर्वाद' यात्रेला 'शिवस्वराज्य यात्रेने' उत्तर
आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यातील सत्ता कायम राखण्यासाठी भारतीय जनता पक्षाने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. एकीकडे इतर पक्षांमधील नेत्यांना पक्षामध्ये प्रवेश देण्यात येत असतानाच थेट मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी भारतीय जनता पक्षाने महाजनादेश यात्रेची घोषणा केली आहे. दरम्यान, भारतीय जनता पक्षाच्या या महाजनादेश यात्रेला एनसीपी’च्या माध्यमातून प्रत्युत्तर देणार असून, खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली येत्या 6 ऑगस्टपासून या शिवस्वराज्य यात्रेला सुरुवात होणार आहे.
6 वर्षांपूर्वी -
२०१४ च्या वचनाप्रमाणे काँग्रेस-राष्ट्रवादीवाल्यांना तुरुंगात डामणार होते; सध्या भाजपात भरती!
काँग्रेस-एनसीपी’चेआमदार आणि पदाधिकाऱ्यांनी आज मुंबईतल्या गरवारे क्लब येथे भारतीय जनता पक्षामध्ये जाहीररीत्या प्रवेश केला आहे. एनसीपीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे, वैभव पिचड, संदीप नाईक तर काँग्रेसचे कालिदास कोळंबकर या आमदारांसह एनसीपीच्या माजी महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, नवी मुंबईतील काही नगरसेवकांसह राज्यभरातून पदाधिकारी, कार्यकर्ते भारतीय जनता पक्षामध्ये दाखल झाले आहेत.
6 वर्षांपूर्वी -
१५ दिवसांचा इशारा: पीकविमा कंपन्यांना दम देऊन काहीच न झाल्याने सेनेचे खासदार मोदींकडे
मागील ५ वर्षात कित्येक शेतकऱ्यांचे मोर्चे कोसो दुरून पायी चालत आले आणि मंत्रालयावर तसेच मुंबईमध्ये धडकले. तेव्हा मुंबईत असून देखील उद्धव ठाकरे यांनी स्वतः सत्तेत असून देखील त्यांची प्रत्यक्ष भेट न घेता पक्षातील प्रतिनिधी धाडले होते. मात्र आदित्य संवाद सुरु झाल्यापासून आणि आदित्य ठाकरे यांच्या ‘जण आशीर्वाद’ यात्रेला जळगावातून सुरुवात होणार होती म्हणून केवळ वातावरण निर्मिती म्हणून पीकविमा कंपन्यांकडून राज्यातील शेतकऱ्यांची अडवणूक केली जात असल्याचा आरोप शिवसेनेकडून उद्धव ठाकरे स्वतः मैदानात उतरले होते.
6 वर्षांपूर्वी -
विधानसभा निवडणूकीआधी सरकार धनगर समाजावर खुश!
आगामी विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर असताना आता राज्य सरकार सर्व समाजाला खुश करण्याचा प्रयत्न करत आहे. धनगर समाजाला आरक्षण मिळण्यास विलंब होत असताना तसंच धनगर समाजाचा रोष टाळण्यासाठी राज्य सरकारने आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत धनगर समाजाला आदिवासी समाजाच्या सवलती मिळणार असल्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. याआधी मराठा समाजाला देखील आरक्षण देऊन खूश केलं आहे. आता राज्य सरकारने आदिवासी समाजाला मिळणाऱ्या सवलती धनगर समाजाला देखील मिळतील असा निर्णय घेऊन धनगर समाजाला खुश करण्याचा प्रयत्न केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
शिवेंद्रराजेंच ठरलं तर! विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे सोपवला राजीनामा
विधानसभा निवडणुकीआधी एनसीपीला अजून एक धक्का बसला असून सातारा-जावळी मतदारसंघाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. शिवेंद्रसिंहराजे भोसले भाजपात प्रवेश करण्याची शक्यता असून त्यांनी तसे स्पष्ट संकेत दिले आहेत. सोमवारी झालेल्या बैठकीत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी भाजपामध्ये प्रवेश करावा असा प्रस्ताव कार्यकर्त्यांनी मांडला होता. भारतीय जनता पक्षात प्रवेशाचा सर्व कार्यकर्त्यांनी आग्रह धरल्याने शिवेंद्रसिंहराजे यांनी कार्यकर्त्यांच्या विचाराचाच निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगत एकप्रकारे भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट संकेतच दिले.
6 वर्षांपूर्वी -
राजापुरात पुन्हा पूर, चिपळुणात वाशिष्ठी तर खेड'मध्ये जगबुडी नदीची पातळी वाढली
जिल्ह्यात मध्यरात्रीपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा जलप्रलय झाला आहे. राजापूर शहरात पाणी भरले असून चिपळुणातील वाशिष्ठी नदीचेपाणी वाढू लागले आहे. रत्नागिरी तालुक्यातील चांदेराई येथेही पूर आला आहे. वादळी वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे रत्नागिरीत शाळा सोडून देण्यात आल्या आहेत.
6 वर्षांपूर्वी -
राजू शेट्टी नारायण राणेंच्या भेटीला; तिसऱ्या आघाडीची चर्चा?
आगामी विधानसभा निवडणुका ह्या बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात अशी मागणी आम्ही केली होती. याला अनेक पक्षांनी, संघटनानी पाठिंबा दिला आहे. नारायण राणेंनी सुद्धा ईव्हीएम बद्दल शंका उपस्थित केली आहे, त्या संदर्भात त्यांच्याशी भेटून चर्चा केली असल्याची प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी दिली आहे.राजू शेट्टी यांनी आज नारायण राणे यांची मुंबईत भेट घेतली. माझ्या मनात ज्या शंका आहेत त्याच त्यांच्या मनात आहेत का? याबाबत या भेटीत चर्चा झाली. राणेंच्या मनात सुद्धा ईव्हीएम बाबत शंका आहेत. याबाबत जनजागृती आम्ही आता राज्यभर करत आहोत, असे शेट्टी म्हणाले.
6 वर्षांपूर्वी -
तिहेरी तलाक: मोदींचं सुद्धा लग्न झाले आहे, मग मोदी का नांदत नाहीत? प्रकाश आंबेडकर
मोदी सरकारने काही बदल करून तिसऱ्यांदा लोकसभेत मांडलेले तिहेरी तलाक विधेयक या सभागृहामध्ये गुरुवारी ३०२ खासदारांनी पाठिंबा दिल्याने मंजूर झाले, तर विरोधात ७८ मते पडली. हे विधेयक आता राज्यसभेकडे संमतीसाठी पाठविण्यात येईल. या विधेयकाला काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांबरोबरच एनडीएचा घटक पक्ष असलेल्या जनता दल (यू) नेदेखील जोरदार विरोध केला. या विधेयकाच्या निषेधार्थ जनता दल (यू)च्या खासदारांनी सभात्यागही केला.
6 वर्षांपूर्वी -
राज ठाकरेंनी घेतली जयंत पाटलांची भेट; ईव्हीएमविषयी चर्चा झाल्याची शक्यता
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने दणदणीत विजय मिळवला होता. परंतु विरोधकांकडून भारतीय जनता पक्षाने हा विजय ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार करून मिळवला असल्याची टीका होत आहे. त्यामुळे विरोधक महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका या बॅलेट पेपरवर घ्याव्यात अशी मागणी करत आहेत.
6 वर्षांपूर्वी -
नवी मुंबईत राष्ट्रवादीचं राजकारण संपुष्टात येणार, गणेश नाईक भाजपच्या वाटेवर?
नवी मुंबई आणि ठाणे या भागातील राष्ट्रवादीचा चेहरा असलेले माजी मंत्री गणेश नाईक भाजपमध्ये प्रवेश करण्यास असल्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. नाईक हे राष्ट्रवादीच्या ५७ नगरसेवकांसह येत्या काही दिवसांत प्रवेश करणार असल्याचे बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार यांनी आपल्या निवासस्थानी एनसीपीच्या ५७ नगरसेवकांची बैठक बोलवली आहे. या बैठकीत नाईक यांच्या भारतीय जनता पक्षातील प्रवेशावर निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
6 वर्षांपूर्वी -
राणेंच्या पुस्तकाचे प्रकाशन शरद पवारांच्या हस्ते; मुख्यमंत्र्यांची मात्र टाळाटाळ
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी ‘नो होल्ड्स बार्ड’ नावाचं आत्मचरित्र लिहिलं आहे. या आत्मचरित्राच्या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार होते. मात्र, पुस्तक प्रकाशनाला ते टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे राणेंच्या ‘नो होल्ड्स बार्ड’ (No Holds Barred’) या आत्मचरित्राच्या पुस्तकाचे प्रकाशन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. १६ ऑगस्टला या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. तसेच नारायण राणे यांच्या आत्मचरित्राला शरद पवार यांची प्रस्तावना देण्यात आली आहे.
6 वर्षांपूर्वी -
राष्ट्रवादी व शरद पवारांनी आत्मचिंतन करावं – मुख्यमंत्री
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये राज्य आणि केंद्र सरकारबाबत अनेक गौप्यस्फोट केले. तसंच सरकारवर जोरदार टीका देखील केली. या टीकेनंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार करत प्रत्युत्तर दिले आहे. ‘भाजप सरकार कोणावरही दबाव टाकत नसून दबाव टाकून लोकांना पक्षात घेण्याची भारतीय जनता पक्षाला गरज नाही.
6 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्रात युतीला टक्कर देण्यासाठी 'महाराष्ट्र बहुजन आघाडीची' स्थापना
बहुजनांच्या मतांचे विभाजन टाळून विधान सभा निवडणूकीत भाजप-शिवसेना युतीला पराभूत करण्यासाठी महाराष्ट्र बहुजन आघाडीची स्थापना करण्यात आली आहे. लोकसभा निवडणूकीच्यावेळी बहुजनांच्या मतांचं विभाजन टाळण्यासाठी वंचित बहुजन आघाडीची स्थापना करण्यात आली होती. मात्र, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेत न्या. बी जी कोळसे पाटील आघाडीतून बाहेर पडले. त्यानंतर लक्ष्मण माने यांनी देखील नाराजी व्यक्त करत प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला.
6 वर्षांपूर्वी -
काँग्रेस-राष्ट्रवादीला पक्ष टिकवायचा असल्याने आरोप: गिरीश महाजन
मागील काही दिवसांपासून काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील लोकांचे भारतीय जनता पक्षातील आणि शिवसेनेतील प्रवेश हा सत्तेचा गैरवापर करत, प्राप्तिकर विभाग आणि ईडीच्या मार्फत दबाव टाकून करून घेतले जात आहेत असे आरोप धक्कादायक आरोप विरोधकांनी केले आहेत. काही दिवसांपूर्वीच कागलच्या राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरी आयकर विभागाने अचानक धाडी घातल्या होत्या.
6 वर्षांपूर्वी -
आ. राणाजगजीत सिंह पाटील यांच्या भाजप प्रवेशाची ती अफवा; नेमका विषय आला समोर: सविस्तर
देशांत २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उदय झाला अन् राजकारणाचे चित्रच पालटून गेले. सर्वकाही सकारात्मक नसलं तरी अनेक पिढ्या राजकारणात असल्याने मातब्बर बनलेल्या घराण्यांना मोठे हादरे बसले. वाढवलेला व्याप कायम राखण्यासाठी या घरण्यांनी पक्षांतराचा मार्ग स्वीकारला. मोठ-मोठी घराणी सर्वाधिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षसोबत होती. त्यामुळे पक्षांतराचा सर्वाधिक फटकाही राष्ट्रवादी काँग्रेसलाच बसत असून पक्षाध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांची चिंता वाढली आहे.
6 वर्षांपूर्वी -
भरडं पीठ बाजूला गेलेलं कधीही चांगलच; रोहित पवारांची खोचक टीका
राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेना आणि भाजप मध्ये जाण्याचं सत्र सुरू आहे. पक्षांतर करणाऱ्या नेत्यांवर रोहित पवार यांनी फेसबुकवर पोस्ट करत खोचक टीका केली आहे. भाकरी बदलण्याचा विचार करताना भरडं पीठ आपोआप बाजूला गेलेलं कधीही चांगलंच असतं, असा टोला रोहित पवार यांनी लगावला.
6 वर्षांपूर्वी -
रुपाली चाकणकर यांची महाराष्ट्र राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड
शुक्रवारी एनसीपी’च्या नेत्या चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला आहे. त्यांनी त्यांच्याकडील असलेल्या महाराष्ट्र राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे त्या लवकरच भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याच बोललं जात आहे. त्याला अनुसरून चित्र वाघ यांनी भाजपच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या आणि त्यासंबंधित व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होताच त्या बातम्यांमध्ये तथ्य असल्याचं उघड झालं होतं.
6 वर्षांपूर्वी -
विधानसभेपर्यंत राष्ट्रवादीचे उमेदवार संपवण्याची योजना? आतापर्यंत २० नेते बाहेर, तर १० तयारीत
देशांत २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उदय झाला अन् राजकारणाचे चित्रच पालटून गेले. सर्वकाही सकारात्मक नसलं तरी अनेक पिढ्या राजकारणात असल्याने मातब्बर बनलेल्या घराण्यांना मोठे हादरे बसले. वाढवलेला व्याप कायम राखण्यासाठी या घरण्यांनी पक्षांतराचा मार्ग स्वीकारला. मोठ-मोठी घराणी सर्वाधिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षसोबत होती. त्यामुळे पक्षांतराचा सर्वाधिक फटकाही राष्ट्रवादी काँग्रेसलाच बसत असून पक्षाध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांची चिंता वाढली आहे.
6 वर्षांपूर्वी -
अखेर चित्रा वाघ यांचा महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा; राष्ट्रवादीला रामराम
राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशानंतर पक्षाला दुसरा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजीनामा सत्र थांबायचं नाव घेत नाही आहे. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सचिन अहिर यांच्याप्रमाणेच चित्रा वाघ यादेखील राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देणार अशा चर्चांना शुक्रवारी उधाण आलं होतं. शेवटी चित्रा वाघ यांनी राजीनामा देत चर्चांना पूर्णविराम दिला आहे. ‘मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देत असून पक्षाच्या प्राथमिक सभासदत्वाचा देखील राजीनामा देत आहे. महाराष्ट्रातल्या महिलांची सेवा करण्यासाठी आणि त्यांचा आवाज बनण्यासाठी मला दिलेल्या सर्व संधींसाठी मी तुमची (शरद पवार) आभारी आहे’, असं चित्रा वाघ यांनी त्यांच्या राजीनाम्यात म्हटलं आहे.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
AWL Share Price | अदानी विल्मर शेअर देईल तगडा परतावा, 49 टक्के अपसाईड कमाईची संधी, अपडेट नोट करा - NSE: AWL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
Rattan Power Share Price | अप्पर सर्किट हिट, पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, संधी सोडू नका - NSE: RTNPOWER