महत्वाच्या बातम्या
-
स्वाभिमानी शेतकरी संघटना विधानसभेत एकूण ४९ जागा लढवणार: राजू शेट्टी
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आता राज्यातील सर्वच लहान मोठे पक्ष कामाला लागले आहेत. काँग्रेस-एनसीपीच्या जागावाटपाची अजून बोलणी झाली नसताना इतर लहान सहकारी पक्षांनी त्यांनी किती जागा लढवायच्या ते निश्चित करण्यासाठी बैठकांचा सपाटा लावला आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभेत देखी काँग्रेस आघाडीला फक्त खेळवत बसण्याचा निर्णय वंचित बहुजन आघाडीने घेतल्याचे प्रथम दर्शनी तरी दिसत आहे. तुम्ही आम्हाला किती जागा द्याव्यात यापेक्षा आम्हीच काँग्रेसला ४० जागा सोडतो असं म्हणत प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसची खिल्ली उडवली आहे.
6 वर्षांपूर्वी -
तिवरे धरणाचे ठेकेदार सेना आमदार सदानंद चव्हाणांविरुद्ध गुन्हा दाखल करा, विरोधकांची मागणी
चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटल्यानंतर आता राजकीय आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. हे धरण बांधलेली खेमराज कन्ट्रक्शन कंपनी आरोपीच्या पिंजऱ्यात आहे. महत्त्वाचं म्हणजे खेमराज कन्ट्रशन कंपनी चिपळूणचे शिवसेना आमदार सदानंद चव्हाण आणि त्यांच्या बंधूची आहे. धरणाला लागलेल्या गळतीप्रकरणी आता खेमराज कन्ट्रक्शन कंपनी जवाबदार असल्याचे आरोप होत आहे.
6 वर्षांपूर्वी -
फुटण्याच्या अवस्थेतील धरणांच्या ऑडिट'पेक्षा जलसंपदा मंत्री पक्ष फोडाफोडीत व्यस्त राहिल्यावर काय होणार?
आजची घटना जरी चिपळूण येथील तिवरे धरणाच्या फुटाण्यासंबंधित असली तरी राज्यातील अनेक धरणाची अवस्था ही अत्यंत भयानक आहे. दरम्यान जलसंपदा खात्याकडे स्थानिकांनी अनेक तक्रारी देखील दिल्या आहेत. मात्र अशा दयनीय अवस्थेतील धरणांचे ऑडिट करण्याचे जलसंपदा मंत्री यांना कधीच मनात आले नसावे, कारण त्याच्या या मंत्रिपदाचा बराच कार्यकाळ हा स्वतःला भाजपचे संकटमोचक बनविण्यात आणि इतर पक्षातील नेतेमंडळी फोडण्यात वाया गेला आहे.
6 वर्षांपूर्वी -
शहर नियोजनाचा अर्थ ते सांगत राहिले; पण मुंबईकर २५ वर्ष 'अर्थ'वेड्या पक्षाच्या प्रेमात तल्लीन? सविस्तर
मागील २ दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईतील जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान या पावसामुळे मुंबईतील पायाभूत सुविधांचे अक्षरशः धिंडवडे निघाल्याचे पाहायला मिळाले. तसेच पावसाळ्यापूर्वी करोडो रुपये खर्चून १०० टक्के नालेसफाई करण्यात आल्याचा दावा देखील शिवसेनेने सामना वृत्तपत्रातून केला होता. कालच विधानसभेत कॅगचा अहवाल सादर करण्यात आला आणि त्यामध्ये मुंबई महापालिकेतील कारभाराची तसेच नालेसफाई आणि पायाभूत सुविधा उभारण्याच्या पद्धतीवर ताशेरे ओढण्यात आले होते. दरम्यान, पायाभूत सुविधा कोलमडल्याने विरोधकांपासून ते सामान्य नागरिकांनी सत्ताधारी शिवसेनेवर संताप व्यक्त करत, मागील २५-३० वर्ष शहरात सत्तेत असून देखील इथल्या पायाभूत सुविधा जैसे थे असल्याचा आरोप अनेक सामान्य लोकांनी देखील केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
मेहतांना नुसते घरी पाठवू नका तर गुन्हाही दाखल करा : जयंत पाटील
एनसीपीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एसआरए घोटाळ्याच्या आरोपांवरून पायउतार करण्यात आलेले मंत्री प्रकाश मेहता यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली आहे. मंत्री प्रकाश मेहता गृहनिर्माण खात्याचा गैरफायदा घेत एस.डी. कॉर्पोरेशनसंबंधित एसआरए प्रकल्पात प्रत्यक्ष मुख्यमंत्र्यांना अंधारात ठेवून बांधकाम व्यवसायिकाकासाठीच काम केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणी नेमण्यात आलेल्या लोकायुक्त अहवालात प्रकाश मेहता यांच्यावर जाणीवपूर्वक केलेल्या त्रुटींवर बोट ठेवण्यात आले होते.
6 वर्षांपूर्वी -
चिपळूण: तिवरे धरण फुटल्याने एक पूर्ण वाडीच वाहून गेली; २३ जण बेपत्ता
मागील ४ दिवस कोकणात देखील अतिवृष्टीने थैमान घातल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण ओसंडून वाहू लागले आहे. त्यामुळे तेथील एक पूर्ण वाडी वाहून गेली असून संबंधित वाडीतील तब्बल २३ जण वाहून गेल्याची भीती स्थानिक प्रशासनाने व्यक्त केली आहे. वृत्त पसरताच मदतीसाठी राष्ट्रीय आपत्ती मदत पथकाला पाचारण करण्यात आले असून वाहून गेलेल्यांपैकी दोघांचे मृतदेह हाती लागल्याचे वृत्त आहे. धरणानजीकचा दादर पूल पाण्याखाली आला असून, ओवळी, रिक्टोली, आकले, दादर, नांदिवसे, कळकवणे या गावांशी पूर्णतः संपर्क तुटला आहे. पावसाच्या प्रमाणाने मर्यादा गाठली तर संबंधित धरण फुटण्याची भीती देखील व्यक्त केली जाते आहे.
6 वर्षांपूर्वी -
कॅग रिपोर्टमध्ये शिवसेनेची पोलखोल; कसली नालेसफाई, गटारे प्रचंड गाळाने अजूनही भरलेली
मुंबई शहरांमध्ये पावसाळ्यापूर्वी १०० टक्के नालेसफाई झाल्याच्या थेट दावा सामना वृत्तपत्रातून करण्यात आला होता. दरम्यान, पावसाळ्यापूर्वी मुंबई शहरातील नाले आणि गटारांमधील गाळ काढण्यासाठी मोठे टेंडर देखील काढण्यात आले होते. मात्र सत्ताधारी शिवसेनेची आज विधानसभेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या कॅग रिपोर्ट’मध्ये पोलखोल झाली आहे. प्रतितास केवळ २५ मि.मी पडलेल्या पावसाचे पाणी वाहण्याची मुंबईतील गटारांची क्षमता असून मुंबईतील गटारे गाळाने आजही भरली असल्याचे कॅगने आपल्या अहवालात समोर आणले आहे. मुंबईत साचणाऱ्या पाण्यास मुंबई महापालिकेचा ढीसाळ कारभार आणि हलगर्जीपणाच कारणीभूत असल्याचं कॅगने आपल्या अहवालात उघड केल्याने सत्ताधारी शिवसेना तोंडघशी पडली आहे.
6 वर्षांपूर्वी -
कोकणात तेलशुद्धीकरण प्रकल्प नको म्हणणारी सेना पुन्हा पलटली? रायगड जिल्हा कोकणात नाही का?
लोकसभा निवडणुकीत नाणार’मधील प्रस्तावित तेलशुद्धीकरण प्रकल्प कोकणच्या निसर्गाला हानिकारक असून शिवसेनेचा अशा प्रकल्पना विरोध असून असे प्रकल्प येऊ देणार नाही असं म्हणणारी शिवसेना लोकसभा निवडणूक संपताच आणि रायगडमधून अनंत गीते पराभूत होताच, पडद्याआडून वेगळ्याच हालचाली सूर झाल्या आहेत. सदर प्रकल्प हा कित्त्येक लाख करोड रुपयांचा असल्याने शिवसेनेला शांत करण्याच्या हालचाली भाजपकडून सुरु झाल्याचे वृत्त आहे.
6 वर्षांपूर्वी -
त्या १०० टक्के नालेसफाईतील 'टक्केवारी' नक्की गेली कुठे? सविस्तर
मुंबई आणि शिवसेनेची सत्ता असलेल्या आजूबाजूच्या शहरांमध्ये पावसाळा सुरु होऊन १-२ दिवस उलटले नाहीत तरी जागोजागी पाण्याची गटारं तुंबल्याने लोकांच्या घरात पाणी शिरल्याचे पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी तर पाणी तुंबल्याने प्रवास करणे कठीण झाले असून वाहन देखील अडकून पडली आहेत. विशेष म्हणजे पावसाळा सुरु होऊन १-२ दिवस झाले आहेत आणि म्हणावा तास पाऊस देखील पडलेला नाही, मात्र शहरात अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याचे पाहायला मिळत आहे. परंतु पावसाळा सुरु होण्यापूर्वी सामना वृत्तपत्रात शिवसेनेकडून १००% नालेसफाईची कामं झाल्याचा दावा करण्यात आला होता. त्यामुळे पावसाच्या पहिल्याच झटक्यात मुंबईतील नालेसफाईच्या कामातील टक्केवारी नक्की गेली कुठे असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.
6 वर्षांपूर्वी -
सामना'त खिल्ली उडवल्याने पुसदच्या न्यायालयाने कोणाविरुद्ध अटक वॉरंट जारी केले होते?
शिवसेनेचे मुखपत्र दैनिक ‘सामना’ मुखपत्रातून मराठा मोर्चाची खिल्ली उडवून त्यात मराठा समाजातील तरुण तरुणींना ‘मुका मोर्चा’ म्हणून हिणवलं होतं. दरम्यान मराठा समाजाचा अपमान केल्याप्रकरणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, संपादक संजय राऊत, व्यंगचित्रकार श्रीनिवास प्रभूदेसाई आणि राजेंद्र भागवत या चौघांविरुद्ध पुसदच्या न्यायालयाने एप्रिल महिन्यात अटक वॉरंट जारी केला होते याची किती जणांना कल्पना होती. समन्स बजावून देखील सर्व आरोपी न्यायालयात हजर न राहिल्याने अटक वॉरंट जारी करण्यात आले होते. सध्या मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाच्या हक्कावर शिक्कामोर्तब केल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्याचा विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय फायदा उचलण्याचा प्रयत्न केल्याची जोरदार चर्चा समाज माध्यमांवर सध्या रंगली आहे आणि त्यावरून अनेक पुरावे मराठा समाजातील युवक व्हायरल करत आहेत. तसेच आता विनोद पाटलांवर देखील संधीसाधू अशी टीका होऊ लागली असून, त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या तिकिटासाठीच हा खटाटोप केल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.
6 वर्षांपूर्वी -
छत्रपती शिवाजी महाराजांकडे ऊ.ठा'सारखे मावळे असते तर ते कधीच यशस्वी झाले नसते
मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आंदोलकांनी आरक्षण वैध ठरल्याच्या निर्णयानंतर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि त्यांचे आभार मानले. दरम्यान त्यावेळी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मराठा-मराठेतर वाद विसरा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून एकत्र या असे आवाहन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी केले. मात्र उद्धव ठाकरेंचा हा प्रयोग म्हणजे विधानसभा निवडणुकीत फायदा उचलण्यासाठी केलेला खटाटोप अशी जोरदार चर्चा समाज माध्यमांवर रंगली आहे. ज्यावर आता नीलेश राणे यांनी ट्विटच्या माध्यमातून बोचरी टीका टीका केली आहे. निवडणुका जवळ आल्या असल्याने उद्धव ठाकरेंनी असे वक्तव्य केले. जर छत्रपती शिवाजी महाराजांकडे उद्धव ठाकरेंसारखे मावळे असते तर तर महाराज कधीच यशस्वी झाले नसते. महाराजांनी उद्धव ठाकरेंना टकमक टोकावरून खाली फेकले असते अशी खोचक टीका नीलेश राणे यांनी केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
विधानसभा: वंचित आघाडीची कॉंग्रेसकडे ५० जागांसाठी मागणी; परंतु कॉंग्रेस देणार ३० जागा
लोकसभा निवडणुकीत देशभर दारुण पराभवाला सामोरे जावे लागल्याने राज्यातील कॉंग्रेस आघाडीने राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कोणताही धोका न पत्करण्याचं धोरण अवलंबलं आहे आणि त्यासाठीच काँग्रेसकडून समविचारी पक्षांसोबत मोर्चेबांधणी सुरु झाली आहेत. दरम्यान याच अनुषंगाने काल कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील नेत्यांची बैठक बोलावली होती. यावेळी बैठकीत राहुल गांधी यांनी कॉंग्रेस आघाडीला सोबत वंचित आघाडीला देखील सामील करा, असा आदेश राज्यातील नेत्यांना दिला आहे. सदर विषयावर सखोल चर्चा झाल्यावर काँग्रेसकडून वंचित बहुजन आघाडीला एकूण २५ जागा देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे.
6 वर्षांपूर्वी -
नितेश राणेंचा सेनेला दणका; विद्यार्थ्यांच्या आडून १५० रु'चा हॅण्डवॉश १३०० रु खरेदी प्रस्ताव स्थगित
सत्ताधारी शिवसेना पक्ष सध्या स्थायी समितीच्या माध्यमातून टेंडरमध्ये नवनवे विक्रम करताना दिसत आहेत. महापालिकेच्या तिजोरीतून पैसे कसे उकळावे याबाबतीत ठाण्यातील गोल्डन गँगचा हात कोणीच पकडू शकत नाहीत. दरम्यान राज्यातील विधानसभा निवडणूक तोंडावर आल्याने पक्षासाठी फंडींगच्या अनुषंगाने टेंडरचा वापर केला जातो आहे असा आरोप विरोधकांनी केला आहे. विशेष म्हणजे शिवसेनेची सत्ता असलेल्या महानगरपालिकांमध्ये असे प्रकार नित्याचे झाले आहेत. तसेच काही महिन्यांपूर्वी ‘आपला दवाखाना’च्या अनुषंगाने आणि ठाण्यातील व्यवस्थेच्या नावाने देखील मोठा घोटाळा झाला असल्याचा आरोप याआधीच विरोधकांनी केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकावे म्हणून आ. नितेश राणे यांच्याकडून कॅव्हेट दाखल
मुंबई उच्च न्यायालयात मराठा आरक्षणाला कायदेशीर मान्यता मिळाल्यानंतर त्याच्या विरोधात काहींनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याचे भाष्य केले होते. दरम्यान आमदार नितेश राणे यांनी देखील मराठा आरक्षणावरून पहिल्यापासूनच आक्रमक भूमिका घेतली होती. स्वतः नारायण राणे यांनी आघाडी सरकार सत्तेत असताना त्याचा मसुदा तयार केला होता. दरम्यान मराठा आरक्षणाच्या निर्णयाच्या विरोधात एकतर्फी स्थगिती मिळू नये यासाठी आमदार नितेश राणे यांनी खबरदारीचा उपाय म्हणून सुप्रीम कोर्टात कॅव्हेट दाखल केले आहे. मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकावे यासाठी आमदार नितेश राणे सज्ज झाले असून शनिवारी त्यांनी कॅव्हेट दाखल केले.
6 वर्षांपूर्वी -
राज्यात २ वर्षांत तब्बल ९७३ कारखाने बंद पडले: उद्योगमंत्री सुभाष देसाई
महाराष्ट्र राज्यात विविध कारणांमुळे २०१५-१६ या कालावधीत १५४ तर २०१७-१८ या कालावधीत तब्बल ८१९ कारखाने बंद पडल्याचा धक्कादायक खुलासा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी शुक्रवारी विधान परिषदेत केला. दरम्यान बंद पडलेले कारखाने पुनर्जीवित करण्यासाठी महाराष्ट्र सरकार प्रयत्न करीत असून, वर्षभरापासून बेरोजगारीवर मात करण्यासाठी उद्योग विभागातर्फे मोठे प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती देसाई यांनी यावेळी सभागृहाला दिली.
6 वर्षांपूर्वी -
पुण्यातील दुर्घटनेची सखोल चौकशी करा: मुख्यमंत्र्यांचे आदेश
पुण्यातील कोंढवा परिसरात सुरक्षा भिंत कोसळून दुर्दैवी अपघात घडला आहे. सदर घटनेत तब्बल १५ कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून या संतापजनक घटनेला नक्की जबाबदार कोण यावरुन मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. प्रसार माध्यमांनी देखील या विषयाला अनुसरून सरकारला धारेवर धरले आहे. पुण्यातील या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या लोकांबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संवेदना व्यक्त केली असून या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत.
6 वर्षांपूर्वी -
मराठी माणसाला मुंबईतून हुसकावून बदलापूरच्या हद्दीत शिवसेनेने ढकललं
राज्याची राजधानी असलेल्या मुंबई महानगरपालिकेमध्ये ज्यांची कित्येक वर्ष सत्ता आहे, त्यांनीच मराठी माणसाला मुंबईतून हुसकावून लावून बदलापूरच्या हद्दीत ढकललं आहे, अशी घणाघाती आणि बोचरी टीका आमदार कपील पाटील यांनी शिवसेनेवर केली आहे. शिवसेनेच्या हाती मुंबईची सत्ता आहे, मात्र मुंबई महापालिका स्वतः मराठीत बोलत नाही. मराठीत व्यवहार देखील करत नाही. मराठी भाषेचं आणि मराठी माणसाचं सर्वात जास्त नुकसान मराठी भाषेच्या नावाने सत्तेवर आलेल्यांनीच केल्याचे आरोप यावेळी कपिल पाटील विधान परिषदेत केला.
6 वर्षांपूर्वी -
विधानसभा तयारी: वंचित आघाडीचे उमेदवार अस्लम सय्यद मुंबई भाजपच्या बैठकीत?
प्रकाश आंबेडकर यांच्या नैतृवत्वाखाली स्थापन झालेली वंचित बहुजन आघाडीवर विरोधकांनी नेहमीच भाजपची बी टीम असा आरोप केला आहे. तसेच वंचित आघाडीचा उद्देश हा लोकसभा निवडणूक जिंकणं नव्हता तर भाजपाला अप्रत्यक्ष मदत करून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारांना पराभूत करणं आहे, असा खुलेआम आरोप काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना केला होता.
6 वर्षांपूर्वी -
खबरदारीचा उपाय म्हणून विनोद पाटलांकडून सुप्रीम कोर्टात कॅव्हेट दाखल
मराठा समाजाला देण्यात आलेलं आरक्षण वैध आहे, अपवादात्मक स्थितीत ५० टक्क्यांहून अधिक आरक्षण राज्य सरकार देऊ शकतं, असं स्पष्ट करत मुंबई हायकोर्टाने मराठा आरक्षण कायद्यावर काल शिक्कामोर्तब केलं आहे. मात्र, देण्यात आलेलं १६ टक्के आरक्षण कमी करून १२ ते १३ टक्के आरक्षण देण्याचे निर्देश कोर्टाने दिले. या निकालावर, मराठा आरक्षणाविरोधात याचिका करणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी तीव्र शब्दात संताप व्यक्त केला आहे. तसेच सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचे देखील सांगितलेय. त्यानंतर मराठा आरक्षणासाठी सातत्याने कायदेशीर बाजू लढणारे मराठा आंदोलक विनोद पाटील यांनी खबरदारीचा उपाय म्हणून सुप्रीम कोर्टात कॅव्हेट दाखल केले आहे.
6 वर्षांपूर्वी -
महानगरपालिकेच्या व नगरसेवकांच्या चुकांसाठी मोदींना दोष देऊ नका: मनसे नेते अनिल शिदोरे
लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘लाव रे तो व्हिडीओ’ म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाच्या घोषणांना अक्षरशः उघड पाडल होत. भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदींचे देशात प्रखर विरोधक म्हणून राज ठाकरे यांच्याकडे पाहण्यास सुरवात झाली असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि प्रवक्ते अनिल शिदोरे यांनी उठसूट नरेंद्र मोदींना दोष देऊ नका अस वक्तव्य केल आहे.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
AWL Share Price | अदानी विल्मर शेअर देईल तगडा परतावा, 49 टक्के अपसाईड कमाईची संधी, अपडेट नोट करा - NSE: AWL
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर्सची जोरदार खरेदी, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL