महत्वाच्या बातम्या
-
राम्या पोरी पळव, पंकु चिक्की घे, दाजी साल्या म्हण; राष्ट्रवादीचं फडणवीसांना प्रतिउत्तर
बालभारती पुस्तकातील संख्यावाचनाच्या मुद्द्यावरून भारतीय जनता पक्ष आणि एनसीपी’माहे चांगलाच कलगीतुरा रंगल्याच पाहायला मिळत आहे. कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीला उत्तर देताना एनसीपी’च्या नेत्यांना लक्ष केलं होतं. त्यानंतर पुन्हा एनसीपीने भारतीय जनता पक्षाला जोरदार प्रतिऊत्तर देत ‘राम्या पोरी पळव, पंकु चिक्की घे, दाजी साल्या म्हण, नितीन टोल भर, विनोद जोक मार, असं म्हणत एनसीपीने भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
ईव्हीएमवर मतदान प्रक्रिया ही बॅलेट पेपरपेक्षा महाग; मग ईव्हीएमचा हट्ट का?
जगातील अनेक प्रगत देशांनी बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र सामान्यांच्या खिशातून टॅक्सच्या माध्यमाने जाणाऱ्या पैशांचा ईव्हीएमसाठी अपव्यय चालला आहे. एक हजार मतदानासाठी बॅलेट पेपरसाठी एक हजार ३००, तर ईव्हीएमवर मतदान घेण्यासाठी ३३ हजार रुपयांचा खर्च येतो. या निवडणुकीतच ४५०० कोटींपेक्षा जास्त खर्च ईव्हीएमवर मतदान घेण्यासाठी केला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कोणतीही मानवनिर्मित गोष्ट बनविणाऱ्याला त्यातील त्रुटी माहित असतात, त्यामध्ये कसे बदल करायचे हे माहित असते. अगदी कायद्यात देखील किती पळवाटा आहेत असेही उदयनराजेंनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.
6 वर्षांपूर्वी -
मी खासदारकीचा राजीनामा देतो, साताऱ्यात फेरनिवडणूक बॅलेट पेपरवर घ्या
पुढे काय व्हायचं ते होऊद्या मी माझ्या खासदारकीचा राजीनामा देतो, सातारा लोकसभा मतदारसंघातली फेरनिवडणूक केंद्रीय निवडणूक आयोगाने बॅलेट पेपरवर घ्यावी अशी जाहीर मागणी एनसीपीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे. ईव्हीएमद्वारे झालेल्या मतदानानंतर मतमोजणीत अनेक मतदारसंघातल्या मतांमध्ये मोठा फरक असल्याच्या तक्रारी मोठ्याप्रमामांवर आल्या होत्या. ज्यानंतर समाज माध्यमांवर एक फेसबुक पोस्ट लिहून उदयनराजे भोसले यांनी ही जाहीर मागणी केली.
6 वर्षांपूर्वी -
आज उद्धव ठाकरे यांचा नाशिक व औरंगाबाद दौरा; शेतकऱ्यांशी संवाद साधणार
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच पक्ष कामाला लागलेले असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे देखील जोरदार तयारीला लागले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज नाशिक आणि औरंगाबाद दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्या दरम्यान उद्धव ठाकरे हे पीक विमा केंद्रांना भेटी देऊन शेतकऱ्यांशी थेट संवाद साधणार आहेत. महाराष्ट्रात सध्या भीषण दुष्काळाची परिस्थिती आहे. त्यात अजूनपर्यंत मान्सूनचं आगमन न झाल्याने परिस्थिती अजूनच बिकट झाली आहे. परिणामी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीच संकट उभं राहिलं आहे. या गंभीर परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी हा दौरा असल्याचं शिवसेनेकडून सांगण्यात येत आहे.
6 वर्षांपूर्वी -
बदलत्या राजकारणाचं आधुनिक तंत्र सेनेने स्वीकारलं; पण राज ठाकरे ते स्वीकारतील का? सविस्तर
सध्या देशातील राजकीय तंत्र झपाट्याने बदलण्यास सुरुवात आली आहे. अगदी २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत हे तंत्र भाजपने यशस्वीपणे राबवलं आणि ऐतिहासिक विजय प्राप्त केला होता. कालांतराने राजकारणातील ते गणित समजून घेण्याचा आणि यशस्वी होण्याचं तंत्र देशातील इतर प्रमुख पक्षांनी देखील समजून घेऊन अमलात आणण्याचा प्रयत्न केला. आजच्या घडीला ज्या पक्षांनी निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच ३-४ महिने चिकाटीने आणि योजनाबद्धपणे राबवलं तेच देश व राज्यात निवडून आले किंवा मोठ्या प्रमाणावर यशस्वी झाले. राजकारणातील हे औटसोर्सिंगच हे तंत्र जो पक्ष अमलात आणेल तोच भविष्यात स्वतःचं अस्तित्व टिकवेल अशीच परिस्थिती आहे.
6 वर्षांपूर्वी -
शाळांमध्ये मराठी शिकवणं अनिवार्य; मनसेने मानले मुख्यमंत्र्यांचे आभार
महाराष्ट्रात मराठी सक्तीचीच आहे हे महाराष्ट्राला सांगितल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन आणि आभार, अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अनिल शिदोरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आभार मानले आहेत. राज्यातील एसएससी, आयसीएसई आणि सीबीएसई अशा सर्व बोर्डाच्या शाळांमध्ये मराठी शिकवणं अनिवार्य आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत केली. यावरच अनिल शिदोरे यांनी ट्विटरवर प्रतिक्रिया देत मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत.
6 वर्षांपूर्वी -
काँग्रेसचं पानिपत झालं म्हणून आमच्याबरोबर बसायला तयार आहात का? प्रकाश आंबेडकर
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेस पक्षाचं देशभर पानिपत झाल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर हाती आलेल्या आकडेवारीनंतर काँग्रेसच्या अनेक जागा बहुजन वंचित आघाडीच्या उमेदवारामुळे पडलायचं दिसलं आणि काँग्रेसने प्रकाश आंबेडकरांसोबत जुळवून घेण्याच्या गोष्टी करण्यास सुरुवात केल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे काँग्रेसचं पानिपत झालं आहे म्हणून आमच्याबरोबर बसायला तयार आहात का?, असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
धक्कादायक! राज्यात ३ महिन्यात ६१० शेतकऱ्यांच्या आत्महत्या
यावर्षीच्या जानेवारी ते मार्च ३ महिन्यांच्या कालावधीत महाराष्ट्रातील ६१० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. सहकार आणि पुनर्वसन मंत्री सुभाष देशमुख यांनी विधानसभेत ही माहिती दिली आहे. यामधली १९२ प्रकरणं जिल्हास्तरीय समितीत पात्र ठरवण्यात आली आहेत. ज्यापैकी १८२ प्रकरणी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना राज्य शासनाकडून मदत देण्यात आली आहे. दरम्यान एकूण ९६ प्रकरणं निकषात न बसल्याने अपात्र ठरवण्यात आली. तर ३२३ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत अशी देखील माहिती देशमुख यांनी सभागृहाला दिली. सदर विषयाला अनुसरून विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंयज मुंडे यांनी लक्ष वेधले होते ज्यावर देशमुख यांनी सभागृहाला हे उत्तर दिले.
6 वर्षांपूर्वी -
गृहनिर्माण मंत्र्यांची गिरणी कामगारांना मुंबईबाहेर धाडण्याची भाषा, सत्ताधारी सेना मूग गिळून शांत
मुंबईचे पूर्वीचे मालक आणि राबणारे हात म्हणजे तत्कालीन गिरणी कामगार, मात्र सध्या राज्याचे नवनियुक्त गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी म्हाडाच्या बैठकीत केल्याने विधानाने गिरणी कामगारांमध्ये संतापाची भावना आहे. बैठकी दरम्यान राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले की म्हाडाने मुंबईबाहेर घरे बांधावीत, अशी सूचना करणाऱ्या गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी थेट गिरणी कामगारांच्या घरांबाबत देखील धक्कादायक सल्ला दिला आहे. गिरणी कामगारांना सुद्धा बेलापूर, उरणमध्ये घरे द्यावीत, असे म्हाडाच्या बैठकीत विखे कोणताही मागचा पुढचा विचार न करता म्हणाले.
6 वर्षांपूर्वी -
कोण काय छापतं? मुख्यमंत्रिपदाची जागा पुढील ५ वर्षांसाठी रिकामी नाही: अवधूत वाघ
लोकसभा संपून भाजप सरकार बहुमताने सत्तेत आले आणि मंत्रिमंडळ वाटप पूर्ण झाल्यानंतर शिवसेनेकडून विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सातत्याने मुख्यमंत्री पदावर दावा करण्यात येतो आहे. एका बाजूला विधानसभेत दोन्ही बाजूचे वरिष्ठ नेते युतीसाठी प्रयत्न करत असताना काही नेत्यांकडून आग लावण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत असंच म्हणावं लागेल. त्यामुळे आगामी काळात या विषयावरून भाजप सेनेमध्ये पुन्हा कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे.
6 वर्षांपूर्वी -
गॅंगस्टर सुरेश पुजारी'कडून मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना ठार मारण्याची धमकी
कुख्यात गॅंगस्टर सुरेश पुजारी टोळीकडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सदर प्रकरणी ठाणे खंडणी विरोधी पथकाने मुंबईतून संदेश शेट्टी याला अटक केली, तर पुजारी टोळीतील इतर आरोपींचा कसून शोध सुरू असल्याचं वृत्त आहे. नवी मुंबईतील एका व्यापाऱ्याला खंडणीसाठी धमकावणाऱ्या पुजारी टोळीच्या शेट्टी याला जाधव यांनी विनंती केली. तेव्हा, संबंधित प्रकरणात पडू नको अन्यथा ठार मारण्याच्या धमकीचा फोन पुजारीने परदेशातून केला होता असं वृत्त आहे.
6 वर्षांपूर्वी -
सत्ताधाऱ्यांकडून रामराजें विरोधात अविश्वास ठराव आणण्यासाठी हालचाली?
विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणण्याची तयारी सत्ताधाऱ्यांनी चालवली आहे, तर फडणवीस सरकारला अधिवेशनातच कोंडीत पकडण्यासाठी एनसीपीने जोरदार हालचाली सुरू केल्या असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे आज दिवसभरात विधिमंडळात जोरदार राजकीय घडामोडी पाहायला मिळतील.
6 वर्षांपूर्वी -
BSNLने सिंधुदुर्गला ४-जी सेवेतून वगळले; अपयशी ठरताच विनायक राऊतांकडून भलतीच अफवा
आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेचे रत्नागिरी – सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांच्यावर सडकून टीका केली आहे. स्वतःच्या अडाणीपणामुळे कुप्रसिद्ध असलेले रत्नागिरी – सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांनी आपला अडाणीपणा मागील पानावरुन पुढे चालू केल्याचे समोर आले आहे. संपूर्ण राज्यात सुरु असलेली BSNLची ४ जी सेवा सिंधुदुर्गात आणण्यात अपयशी ठरल्यानंतर आता राऊत यांनी आपल्या नसलेल्या अकलेचे तारे तोड्ड्ण्यास सुरुवात केली आहे. ही सेवा सुरु झाल्यास नागरिकांचे जुने मोबाईल फोन निकामी होतील व त्यांना नवीन फोन विकत घ्यावे लागतील, अशी अजब कारणं पुढे रेटली आहेत. त्यांच्या या “थोर” विचारांमुळे कोकणात युवापिढी राऊत यांना लाखोल्या वाहत आहे.
6 वर्षांपूर्वी -
बदल पहिलीपासूनच, गणिताच्या पुस्तकामध्ये सोपे ते स्वीकारले
इयत्ता दुसरीच्या गणिताच्या पुस्तकामध्ये संख्या वाचनात केलेल्या बदलावरून वाद निर्माण झाला आहे. समाज माध्यमांवर यावरून मोठं मोठे विनोद होण्यास सुरुवात झाली आहे. काही शिक्षणतज्ज्ञ, लेखक, राजकीय नेत्यांनी हा बदल मराठी भाषेला अत्यंत मारक असल्याचे उघडपणे सांगितले आहे. दरम्यान संबंधित बदल करताना इंग्रजी भाषेचे अनुकरण केल्याचा थेट आरोप केला जात आहे. एकवीसला वीस एक म्हटल्याने विद्यार्थ्यांमध्ये देखील गोंधळ निर्माण होईल, असा दावा देखील अनेकांनी केला आहे. मात्र बालभारतीच्या गणित विषयतज्ज्ञ समितीच्या अध्यक्ष डॉ. मंगला नारळीकर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना संपुर्ण वादावर विस्तृतपणे मांडणी करून सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचे ठामपणे सांगितले. त्यामुळे हा बदल नवीन नाही असं त्यांनी ठामपणे म्हटलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
जागावाटपात स्वबळावर बार्गेनिंगसाठी? पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच : उद्धव ठाकरे
आगामी विधानसभा निवडणुकीत आपला मुख्यमंत्री करायचाच असा ठाम निर्धार शिवसेनेने केला असून भारतीय जनता पक्षाशी जरी युती असली तरी शिवसेना ही स्वतंत्र बाण्याची संघटना असून आगामी विधानसभा भगवी करुन टाकू, त्यासाठी शिवसैनिकांनी सर्व शक्तीनिशी कामाला लागावे अशा शब्दांत शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी लवकरच येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा स्वबळावर लढण्याचा सूचक इशारा दिला आहे. आज शिवसेनेचा ५४वा वर्धापन दिन असून त्यानिमित्त उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या सामना या मुखपत्रातील अग्रलेखातून आपली भुमिका स्पष्ट केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
विधानसभा २०१९: आपल्या निधीसाठी ‘आपला दवाखाना’च्या नावाने १६० कोटींचा घोटाळा? सविस्तर
दिल्लीतील मोहल्ला क्लिनीकच्या धर्तीवर शिवसेनेने ठाणे महापालिका हद्दीत ‘आपला दवाखाना’ नावाची संकल्पना सुरू करणार असून त्यासाठी सर्वप्रथम किसननगर आणि कळवा येथे प्रायोगिक तत्त्वावर सुरू केलेली ही योजना पूर्णतः फोल ठरली आहे आणि लोकं तेथे फिरकत सुद्धा नाहीत अशी माहिती आहे, तसेच ठाणे शहरातील एकूण लोकसंख्येच्या तुलनेत तब्बल २६ आरोग्य केंद्रांची गरज असताना केवळ पक्षाच्या प्रचाराच्या हेतूने आणि आरोग्याच्या नावाखाली या संकल्पनेसाठी तब्बल १६० कोटी रुपयांची उधळपट्टी केली जात असल्याचा दावा महापालिका विरोधी पक्ष नेते मिलिंद पाटील यांनी केला आहे. विशेष म्हणजे मेडिकल ऑन गो प्रायव्हेट लिमिटेडला हा ठेका देऊन त्याद्वारे विधानसभा निवडणुकीसाठी पैसा गोळा करण्याचा सत्ताधारी शिवसेनेचा प्रयत्न असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
विधानसभा: हेल्मेट सक्तीतून पुणेकरांकडून मोठा दंड वसूल केल्यावर मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती
यावर्षी १ जानेवारीपासून पुण्यात पोलिसांकडून हेल्मेटसक्ती लागू करण्यात आली. त्यानंतर अनेक ठिकाणी निदर्शनं आणो कोर्टकचेऱ्या देखील झाल्याचं पाहायला मिळालं. विशेष म्हणजे या कालावधीत पुणे वाहतूक पोलिसांनी पूणेकरांकडून रग्गड दंड देखील वसूल केला. मात्र विधानसभा निवडणूक केवळ ३-४ महिन्यांवर आल्याने या विषयाला अनुसरून पुणेरकरांचा रोष सहन करावा लागू नये म्हणून मुख्यमंत्र्यांनी अखेर हेल्मेट सक्तीच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे.
6 वर्षांपूर्वी -
आज फडणवीस सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प
महाराष्ट्र राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आला आहे. सदर अहवालात राज्याची अर्थव्यवस्था देशाच्या ६.८ टक्के विकास दरापेक्षा अधिक वेगाने म्हणजे ७.५ टक्के दराने विकसित होत असून राज्याने आधीच्या ४ वर्षात सरासरीपेक्षा कमी पाऊस होऊनही प्रगतीची घोडदौड निरंतर राखण्यात यश प्राप्त झाले असल्याचे वित्त व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. त्यामुळे मुनगंटीवार आज दुपारी १.४५ वाजता राज्य सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करतील.
6 वर्षांपूर्वी -
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात; दुष्काळावर विशेष चर्चा
महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. यापार्श्वभूमीवर काल रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनाच्या कामकाजाच्या रुपरेषेची माहिती देण्यासाठी जाहीर पत्रकार परिषद घेतली. यामध्ये नवी आणि प्रलंबित अशी एकूण २८ विधेयकं मांडली जाणार असल्याचे त्यांनी प्रसार माध्यमांना सांगितले.
6 वर्षांपूर्वी -
इतर पक्षातील आयात नेते आणि विधानपरिषदेवरील आमदारांची सेनेत चांदी
लोकसभा निवडणुकीच्या आधी शिवबंधन बांधत शिवसेनेत दाखल झालेले राज्याचे माजी मंत्री आणि बीडचे राष्ट्रवादीचे नेते जयदत्त क्षीरसागर आणि विधान परिषदेचे पहिल्यांदाच सदस्य झालेले तसेच ‘महाराष्ट्राला भिकेला लावेन’ असं वादग्रस्त वक्तव्य करणारे तानाजी सावंत यांना थेट कॅबिनेट मंत्रीपदाची लॉटरी लागल्याने शिवसेनेच्या विशेषत: जमिनीवर पक्ष वाढवणाऱ्या विधानसभा सदस्यांमध्ये प्रचंड नाराजीची भावना दिसून आली. विधानसभा परिषदेचे आमदार तानाजी सावंत हे देखील करोडपती व्यक्तिमत्व असल्याने आयत्यावेळी काही मोठी आर्थिक देवाणघेवाण झाली का अशी चर्चा देखील दबक्या आवाजात होऊ लागली आहे.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
AWL Share Price | अदानी विल्मर शेअर देईल तगडा परतावा, 49 टक्के अपसाईड कमाईची संधी, अपडेट नोट करा - NSE: AWL
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर्सची जोरदार खरेदी, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL