महत्वाच्या बातम्या
-
कोरोना काळात औद्योगिक वीज वापरात घट | तर घरगुती-कृषी वापर वाढल्याने महावितरणला 7,500 कोटी रुपयांचा फटका
कोविड काळात एका बाजूला महागडी वीज खरेदी करणाऱ्या औद्योगिक-वाणिज्यिक ग्राहकांच्या (सबसिडायजिंग ग्राहक) अपेक्षित वीज वापरात राज्यात मोठी घट झाली, तर दुसऱ्या बाजूला कमी दराने वीज खरेदी करणाऱ्या घरगुती आणि कृषी ग्राहकांच्या (अनुदानित ग्राहक) वीज वापरात मोठी वाढ हाेती. परिणामी सन २०२०-२१ कोविड काळात महावितरण कंपनीला तब्बल ७ हजार ५०० कोटींचा फटका बसल्याची माहिती पुढे आली आहे.
3 वर्षांपूर्वी -
राजकीय हेतू साध्य करण्यासाठी न्यायालयाचा वापर होऊ नये | अनिल परब यांचे म्हणणे सुद्धा ऐकू - हायकोर्ट
परब यांच्यासह परिवहन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून भ्रष्टाचार होत आहे, असा आरोप करून सीबीआय किंवा अन्य स्वतंत्र तपास यंत्रणेमार्फत चौकशी करण्याचे निर्देश देण्याची विनंती करणारी याचिका निलंबित आरटीओ अधिकारी गजेंद्र पाटील यांनी ॲड. व्ही. पी. राणे यांच्यामार्फत काही महिन्यांपूर्वी केली. याविषयी बुधवारी प्राथमिक सुनावणी झाली.
3 वर्षांपूर्वी -
Tirumala Tirupati Devasthanams | शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांची तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यपदी नियुक्ती
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे लाडके आणि शिवसेनेचे नेते मिलिंद नार्वेकर यांना आता एक मोठी जबाबदारी मिळाली आहे. देशातील सर्वाधिक श्रीमंत देवस्थान असलेल्या तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यांची यादी आंध्र प्रदेश सरकारने जाहीर केली. या देवस्थानाच्या ट्रस्ट सदस्यपदी नियुक्ती व्हावी यासाठी देशभरातून मोठी चढाओढ असते. मात्र प्रत्येक राज्याचे मुख्यमंत्री थेट आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधून ही नियुक्ती सुचवत असतात.आणि याच पार्श्वभूमिवर देशातून 24 व्यक्तींची नियुक्ती केली जाते.
3 वर्षांपूर्वी -
व्हाटसऍप युनिव्हर्सिटीच्या या टॉपर ताईं | दहशतवादी पकडले दिल्लीत अन महाराष्ट्रात पकडल्याचं बरळत आहेत - रुपाली चाकणकर
एकही दहशतवादी मुंबईत आला नाही, त्यांचा कुणी साथीदारही आला नाही, महाराष्ट्रात कोणतेही स्फोटक सापडलेले नाहीत, असं स्पष्टीकरण महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाचे (एटीएस) प्रमुख विनित अग्रवाल यांनी दिले. मुंबईतील धारावीचा रहिवासी असलेला समीर कालिया उर्फ जान मोहम्मद शेख याचे 20 वर्ष जुने दाऊद कनेक्शन उघड झाल्याचेही त्यांनी सांगितले. एटीएस प्रमुखांनी पत्रकार परिषद घेत यासंदर्भात माहिती दिली. देशात बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा मोठा कट दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने उधळून लावला आहे.
3 वर्षांपूर्वी -
कोकण तौत्के, निसर्गवादळ आणि अतिवृष्टी | कोकणला 3 हजार कोटी | राज्य सरकारचा मोठा निर्णय
तौत्के, निसर्गवादळ तसेच अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर कोकण तसेच पश्चिम महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अनेकांचे प्राण गेले. ही बाब लक्षात घेता राज्य सरकारने मोठा निर्ण घेतला आहे. राज्य सरकारने चक्रीवादळांचा बंदोबस्त तसेच कायमस्वरुपी उपायोजना करण्यासाठी 3 हजार कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. या निधीच्या मदतीने पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये पूरस्थितीशी सामना करण्यासाठी कायमस्वरुपी उपायोजना करण्यात येणार आहेत.
3 वर्षांपूर्वी -
OBC Reservation | ओबीसी आरक्षणासाठी राज्य सरकार अध्यादेश काढणार | मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय
ओबीसी आरक्षणासाठी राज्य सरकार अध्यादेश काढणार, अशी माहिती अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडणार नाही. तामिळनाडू आणि इतर राज्यांच्या धर्तीवर हे आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे भुजबळ म्हणाले. न्यायालयात आव्हान दिले तर अध्यादेश टिकेल, असेही त्यांनी सांगितले.
3 वर्षांपूर्वी -
दरेकरांना महिलांचा सन्मान करता येत नसेल तर करु नका | पण महिलांची अवहेलना करण्याचा अधिकार त्यांना कुणी दिला? - सुरेखा पुणेकर
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर काल शिरुर दौऱ्यावर होते. राजे उमाजी नाईक यांच्या 230व्या जयंती निमित्ताने जय मल्हार क्रांती संघटनेने एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. यावेळी दरेकर यांनी हे विधान केलं होते. प्रसिद्ध लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर आणि शांताबाई फेम गायक संजय लोंढे राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. या पार्श्वभूमीवर बोलताना दरेकर यांनी राष्ट्रवादीवर हल्ला चढवला होता. राष्ट्रवादी काँग्रेसला गरीब लोकांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ नाही.
3 वर्षांपूर्वी -
Delhi Terrorist Arrest | महाराष्ट्र ATS प्रमुखांची सविस्तर माहिती | आशिष शेलार यांचा उतावळेपणा देखील उघड?
एकही दहशतवादी मुंबईत आला नाही, त्यांचा कुणी साथीदारही आला नाही, महाराष्ट्रात कोणतेही स्फोटक सापडलेले नाहीत, असं स्पष्टीकरण महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाचे (एटीएस) प्रमुख विनित अग्रवाल यांनी दिले. मुंबईतील धारावीचा रहिवासी असलेला समीर कालिया उर्फ जान मोहम्मद शेख याचे 20 वर्ष जुने दाऊद कनेक्शन उघड झाल्याचेही त्यांनी सांगितले. एटीएस प्रमुखांनी पत्रकार परिषद घेत यासंदर्भात माहिती दिली. देशात बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा मोठा कट दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने उधळून लावला आहे.
3 वर्षांपूर्वी -
सोमय्यांकडे भाजपचे प्रतिनिधी एवढंच पद आहे | भाजपने त्यांना ईडीचे प्रवक्ते पद तरी द्यावं - आ. रोहित पवार
भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी आघाडीतील नेत्यांना टार्गेट करून त्यांचे भ्रष्टाचार काढण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे अनेक नेत्यांच्यामागे ईडीचा ससेमिरा लागला आहे. त्यावरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सोमय्या यांना टोला लगावला आहे. भारतीय जनता पक्षाने किरीट सोमय्या यांना ईडीचं प्रवक्तेपद द्यावं, असा टोला राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी काढला आहे.
3 वर्षांपूर्वी -
Terror Plan Politics | दहशतवाद्यांचं लक्ष दिल्ली, महाराष्ट्र आणि युपी | शेलारांना योगी सरकारच्या ATS'चा विसर?
दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने मुंबईत येऊन जान मोहम्मद शेख याला अटक केल्यानंतर या मुद्द्यावरून वातावरण तापू लागलं आहे. एकीकडे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी यासंदर्भात उच्चस्तरीय बैठक बोलावली असताना दुसरीकडे आता भाजपाकडून या प्रकरणी तीव्र टीका केली जाऊ लागली आहे. “हे दहशतवादी महाराष्ट्रात, मुंबईत वास्तव्य करून दहशतवादी कट करत असताना राज्याचं एटीएस झोपलं होतं का? या दहशतवाद्यांच्या बाबतीत राज्यातले पोलीस काय करत होते?” असा सवाल भाजपा आमदार आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारला केला आहे.
3 वर्षांपूर्वी -
OBC Reservation | ओबीसी नेतृत्व संपुष्टात आणण्याचे पाप भाजपाचे | सत्तेत असताना झोपा काढल्या, आता आंदोलन - नाना पटोले
राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज (बुधवार) दुपारी साडेतीन वाजता सह्याद्री अतिथीगृह येथे होणार आहे. या बैठकीमध्ये काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार असल्याची माहिती आहे. ओबीसी राजकीय आरक्षण संपुष्टात आल्यानंतर राज्य सरकारसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. याबाबत या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच सण उत्सवाच्या दिवसात कोरोना रुग्णांची वाढती संख्या याबाबत देखील चर्चा होणार आहे.
3 वर्षांपूर्वी -
Magnetic Maharashtra | राज्यात 35 हजार 500 कोटींची गुंतवणूक | 1879 हेक्टरचा पवनऊर्जा प्रकल्प, 5 हजार रोजगार
देशातील ऊर्जा क्षेत्रातील अग्रगण्य उद्योग समूह जेएसडब्ल्यू एनर्जी राज्यात सुमारे ३५,५०० कोटींची गुंतवणूक करणार असून नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे दीड हजार मेगावॅट क्षमतेचा जलविद्युत प्रकल्प तर उस्मानाबाद, सोलापूर, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात ५ हजार मेगावॅट क्षमतेेचे पवनऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहेत.
3 वर्षांपूर्वी -
Anil Parab Vs Somaiya | अनिल परब सोमैयांच्या विरोधात 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार | नोटीस पाठवली
माजी खासदार आणि भाजपाचे नेते किरीट सोमैया यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सोमैया यांच्याकडून वारंवार होणाऱ्या आरोपांना प्रत्युत्तर म्हणून अनिल परब आता सोमैया यांच्यावरती 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहेत. या प्रकरणी परब यांचे वकील सुषमा सिंग यांनी सोमैय्यांना एक बिनशर्त माफी मागण्याची नोटीस पाठवली आहे. त्यानुसार आता सोमैय्या यांना 72 तासात उत्तर देण्यास सांगतिले आहे. सोमैया यांनी परब यांच्यावर कोकणात दापोली येथे बेकायदा हॉटेल बांधल्याचा आरोप केला होता. या बरोबर त्यांच्या खात्याअंतर्गत परिवहन विभागात बदल्याचे रॅकेट परब यांनी चालवल्याचा जाहीर आरोपही सोमैय्या यांनी केला होता.
3 वर्षांपूर्वी -
Udayanraje Vs Shivendra Raje | आम्ही नुसता शब्द देत नाही तर पाळतोही | उदयनराजेंचा शिवेंद्रराजेंना अप्रत्यक्ष टोला
खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यातील शीतुयद्ध सर्वश्रुत आहे. सध्या दोघेही भाजपमधून प्रतिनिधित्व करत असले तरी स्थानिक राजकारणात मात्र वारंवार एकमेकांना शह-काटशह देताना दिसून येतात. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शीतयुद्धाचा प्रत्यय पुन्हा एकदा सातारकरांना पाहायला मिळाला आहे. ‘महाराष्ट्रात सातारा विकास आघाडी एकमेव अशी आघाडी असेल जी केलेली कामे लोकांपुढे जाहीरपणे मांडते. कारण, आम्ही केवळ शब्द देत नाही, तर तो पाळतो देखील, असा टोला खासदार उदयनराजे भोसले यांनी पालिका निवडणुकांच्या तोंडावर आमदार शिवेंद्रसिंहराजे यांचे नाव न घेता लगावला आहे.
3 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | ठाणे महानगरपालिकेत 13 पदांची भरती | थेट मुलाखत
ठाणे महानगरपालिका भरती 2021. ठाणे महानगरपालिकेने अधिकृत भरती अधिसूचना जारी केली आहे आणि 13 MSW, आरोग्य निरीक्षक, CSSD सहाय्यक, फार्मासिस्ट आणि नाभिक पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार TMC भरती 2021 साठी 27 सप्टेंबर 2021 रोजी आयोजित मुलाखतीसाठी येऊ शकतात.
3 वर्षांपूर्वी -
करोनामध्येही सरकारला सावकारासारखी वसुली करायचीय | उर्जामंत्र्यांच्या विधानानंतर फडणवीसांचं टीकास्त्र
विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर हल्ला केला आहे. “एकीकीडे करोनामुळे शेतकरी असो की सामान्य नागरिक असो तो अडचणीत आहे आणि तो अडचणीत असताना त्यांना मदत करण्याच्या ऐवजी, त्याच्याकडून जबरदस्ती वसूली या सरकारला करायची आहे. सावकारासारखी वसूली करायची आहे. म्हणून हे सगळं नाटक सुरू आहे.
3 वर्षांपूर्वी -
दरेकरांनी 24 तासात माफी मागितली नाही तर त्यांच्या तोंडाला काळे वंगण फासणार | सक्षणा सलगर यांचा इशारा
भाजप नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर केलेल्या आक्षेपार्ह टीकेनंतर राष्ट्रवादीचे नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी प्रवीण दरेकरांनी माफी मागावी अशी मागणी केलीय.
3 वर्षांपूर्वी -
महिलेला विनयभंग केल्याची खोटी तक्रार द्यायला लावत शिवसेना नगरसेवकाकडे खंडणीची मागणी | २ पत्रकारांना अटक
महिलेला विनयभंग केल्याची तक्रार द्यायला लावून शिवसेनेच्या नागरसेवकाकडे बदनाम करण्याची धमकी देत 15 लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली. याप्रकरणी माजी उपसरपंच, पत्रकारांविरोधात चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन पत्रकारासह साथीदाराला अटक करण्यात आली आहे.
3 वर्षांपूर्वी -
फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस देखील कलाकार आहेत | मग तुम्ही सर्वच महिलांच्या बाबत असे बोलणार का? - प्रिया बेर्डे
लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर येत्या १६ सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. याच पार्श्वभूमीवर, विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केलेल्या एका विधानामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. “राष्ट्रवादी हा रंगलेल्या गालाचे मुके घेणारा पक्ष आहे”, असं विधान प्रवीण दरेकर यांनी केलं. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीकडून संतप्तजनक प्रतिक्रिया येत असताना नुकतंच प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आणि राष्ट्रवादीच्या नेत्या प्रिया बेर्डे यांनीही भाजपवर टीका केली आहे. “भाजपमध्येही अनेक दिग्गज कलाकार आहेत. हेमा मालिनी, स्मृती इराणी, अमृता फडणवीस, मग या सर्व महिलांबद्दलही तुम्ही असचं बोलणार आहात का?” असा संतापजनक सवाल प्रिया बेर्डे यांनी केला आहे.
3 वर्षांपूर्वी -
कोरोनामुळे केंद्राच्याही सूचना आहेत | भातखळकरांचं डोकं फिरलं आहे, त्यांचं डोकं ठिकाणावर नाही - आ. मनीषा कायंदे
भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. महाराष्ट्रात घडणाऱ्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर परप्रांतीयांची नोंद ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. त्यावर अतुल भातखळकर यांनी आक्षेप घेत, तक्रार दाखल केली आहे. कांदिवलीतील समता नगर पोलिसात ही तक्रार दाखल करण्यात आली.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Multani Mitti Face Pack | तुमचा 'हा' स्किन टाईप असल्यास कधीही मुलतानी मातीचा वापर करू नका, तज्ज्ञांचा सल्ला - Marathi News
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell? - Marathi News
- Love and War Movie | 'लव्ह अँड वॉर' ला धडकणार किंग खानचा 'किंग', चित्रपटात झळकणार लग्नाच्या 'या' जोड्या
- Bigg Boss Marathi | दोघींची मैत्री 4 दिवस सुद्धा नाही टिकली; आर्या आणि जानवीची पुन्हा एकदा खडाजंगी - Marathi News
- True Beauty | रेडियंट ग्लो मिळवण्यासाठी फॉलो करा अभिनेत्री शरवरी वाघच्या ब्युटी टिप्स, चेहऱ्यावर वेगळेच तेज येईल
- Business Idea | बेकरी व्यवसाय करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी! या तरुणीने उभारला मोठ्या उद्योग, तुमची सुद्धा सुरु करा
- Bigg Boss Marathi | आर्याने फोडलं निक्कीचं थोबाड! रडत म्हणाली 'बिग बॉस हिला बाहेर काढा'; बिग बॉस काय निर्णय घेणार?
- Deepika Padukone | छोट्या बाहुलीचं वेलकम करण्यासाठी रणवीर सज्ज, कालच मिळाला दीपिकाला डिस्चार्ज - Marathi News
- Bigg Boss Marathi | निक्कीला मारलेली चापट आर्याला पडली महागात; भाऊंच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष, आता पुढे काय?
- Bigg Boss Marathi | संग्रामची अरबाजला ताकदीची धमकी; दोन बॉडी-बिल्डरची आपापसात झुंज, प्रोमो पाहिलात का?