महत्वाच्या बातम्या
-
राष्ट्रवादी जोमात | भाजप समर्थक आमदार करणार राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश
सध्या सगळे राजकीय पक्ष स्वतः ला सक्षम करत असून आपलं बळ वाढवताना दिसत आहेत. अशात पंढरपूर-मंगळवेढा येथील राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांचं काही महिन्यापूर्वी निधन झालं होतं. त्यामुळे येथे पोटनिवडणूक लावण्यात आली होती. ज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार भगीरथ भालके यांचा पराभव झाला होता. परंतु, आता एक आमदार राष्ट्रवादीच्या वाटेवर असून राष्ट्रवादीचं संख्याबळ पुन्हा वाढलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
कलानगर उड्डाणपुल दुसऱ्या मार्गिकेचे आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन | विरोधी पक्षनेते फडणवीसांना वगळले
वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी वांद्रे- कलानगर जंक्शन येथे उभारलेल्या उड्डाणपुलाच्या तीन मार्गिकांपैकी दुसरी मार्गिका आज (सोमवार) खुली केली जाणार आहे. तसेच करोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी मालाड येथे दोन हजार रुग्णांच्या क्षमतेचे करोना केंद्राचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सह विविध खात्याचे मंत्री, अधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत. मात्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना या कार्यक्रमाला निमंत्रित करण्यात आलेले नाही. यावरून मनापमानाचा वाद चिघळण्याची शक्यता आहे.
4 वर्षांपूर्वी -
फडणवीसांनी असा त्रागा करुन घेऊ नये | संन्यास घेतील त्यांचे दुष्मन, शिवसेनेचा टोला
ओबीसींचे राजकीय आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द केल्यानंतर राजकीय पक्ष या आरक्षणासाठी आक्रमक झाले आहेत. राज्यातील प्रमुख विरोधीपक्ष भारतीय जनता पक्षाने (भाजपा) राजर्षी शाहू महाराज जयंती दिनी राज्यभर चक्का जाम आंदोलन करुन ओबीसींचे राजकीय आरक्षण पुन्हा लागू करण्याची जोरदार मागणी केली. यावेळी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘सत्ता द्या तीन महिन्यांत ओबीसींना आरक्षण देईन; नाहीतर राजकीय संन्यास घेईन’ अशी राणा भीमदेवी थाटात घोषणा केली आहे. यावरुन शिवसेनेने फडणवीसांना जोरदार फटकारले आहे. तसेच फडणवीसांनी त्रागा करुन घेऊ नये. सर्वकाही सुरळीत व त्यांच्या मनाप्रमाणे होईल. संन्यास घेतील त्यांचे दुष्मन! असा चिमटाही काढला आहे.
4 वर्षांपूर्वी -
वेगळा विदर्भ होत नाही तोपर्यंत लग्नगाठ बांधणार नाही | तुमको ना भुल पायेंगे - आ. अमोल मिटकरी
विदर्भ स्वंतत्र राज्य होत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही, अशी प्रतिज्ञा २००४ साली देवेंद्र फडणवीस यांनी ते मुख्यमंत्री नसताना केली होती. आता त्यांचे लग्न होऊन कित्येक वर्षे उलटली, ते पाच वर्षे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. मात्र स्वतंत्र विदर्भाबाबत त्यांनी चक्कार शब्दसुद्धा काढला नाही.
4 वर्षांपूर्वी -
गोपीचंद पडळकर बांडगुळ, अशी बांडगुळं वाढत आहेत - आ. मनिषा कायंदे
ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून राज्यातील राजकारण तापले आहे. दरम्यान भाजप आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आरक्षणाच्या विषयावर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. या वादात आता भाजपचे गोपीचंद पडळकरांनी उडी घेत शिवसेनेचे खासदार संजय राऊतांवर विखारी शब्दात टीका केली आहे. यासोबतच त्यांनी राज आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वादाल संजय राऊतच जबाबदार असल्याचा गंभीर आरोपही केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
Alert | उद्यापासून राज्यात लागू होणार कठोर निर्बंध | काय सुरू आणि काय बंद सविस्तर घ्या जाणून
राज्यात कोरोनाच्या डेल्टा, डेल्टा प्लस या नव्या व्हेरिएंट्समुळे 4 ते 6 आठवड्यांत तिसरी लाट पसरण्याची दाट शक्यता आहे. हा धोका लक्षात घेता संपूर्ण राज्यात किमान तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू राहतील. 4 जूनला अनलॉकबाबत 5 टप्पेनिहाय नियमावली जारी करण्यात आली होती. त्यातील तिसऱ्या टप्याचे निर्बंध राज्यात लागू राहतील. उद्यापासून हे नवीन निर्बंध लागू राहणार आहेत.
4 वर्षांपूर्वी -
ओबीसींचा कळवळा असेल तर प्रश्न कसा सोडवायचा ते सांगा | सत्तेत येण्याची गरज नाही - जयंत पाटील
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपनं शनिवारी राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन केलं. त्यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर मुनगंटीवार आदी भाजप नेत्यांच्या नेतृत्वात हजारो भाजप कार्यकर्ते विविध ठिकाणी रस्त्यावर उतरले होते.
4 वर्षांपूर्वी -
राज्यातील सरकार पाच वर्षे टिकेल, तिन्ही पक्षांमध्ये योग्य समन्वय - शरद पवार
काही मुद्द्यांवर एकत्र येत राज्यातील महाविकासआघाडी सरकार स्थापन झाले. सरकार चालवताना काही प्रश्न उपस्थित होत असतात. त्यावर मार्ग काढण्यासाठी एक यंत्रणा काम करत आहे. त्यामुळे हे सरकार पाच वर्ष टिकेल, असा विश्वास राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केला. पवार आज(रविवारी) बारामतीतील गोविंदबाग या त्यांच्या निवासस्थानी होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
4 वर्षांपूर्वी -
वडिलोपार्जित संपत्तीवर मुलींचाही मुलांएवढाच हक्क असतो का? | माहिती असणं आवश्यक - वाचा सविस्तर
जर तुम्हाला वाटत असेल तुमच्या वडिलोपार्जित मालमत्तेवर केवळ तुमचाच अधिकार आहे तर थोडं थांबा! खरी परिस्थिती थोडी वेगळी आहे. वडिलोपार्जित संपत्तीच्या अधिकारासंदर्भात अनेक नियम आणि कायदे अस्तित्वात आहेत. प्रकरण इतकं साधं-सरळ नाही. दिल्ली हायकोर्टात नुकतीच एक खटल्याची सुनावणी झाली. त्यावेळी कोर्टाने सांगितलं की वडिलांच्या मालमत्तेवर पूर्णपणे मुलाचाच हक्क नसतो. कारण आई अजून जिवंत आहे आणि मालमत्तेवर मुलीचाही तेवढाच हक्क आहे.
4 वर्षांपूर्वी -
एखाद्याने तुमच्या घरावर किंवा मालमत्तेवर ताबा घेतल्यास काय करावे? | माहिती असणं आवश्यक - वाचा सविस्तर
सध्या दुकानं, घरं किंवा प्लॉटवर कब्जा करणाऱ्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येत आहे. एखादा व्यक्ती घर किंवा दुकान भाड्याने घेतो आणि मग काही काळानंतर त्यावर कब्जा करतो. अशा परिस्थितीत या व्यक्तींना बाहेर काढणं कठिण जातं. जर तुमच्यावर पण अशीच परिस्थिती ओढवली असेल, तर घाबरून जाऊ नका. जाणून घ्या अशा परिस्थितीत तुम्ही काय करायला हवं आणि याचे नियम काय आहेत ते.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | २-३ महिन्यात? OBC समाजाने प्रथम फडणवीसांनी धनगर समाजाला आरक्षणाचं दिलेलं हे वचन ऐकावं
माझ्या हातामध्ये सूत्रं दिल्यास ओबीसी समाजाला आरक्षण मिळवून देईन, अशी गर्जना करणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी टोला हाणला. यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाबाबतही असेच वक्तव्य केले होते. ते मला चांगले आठवत आहे. त्यामुळे फडणवीस यांनी आरक्षणाच्या विषयावर राजकारण करु नये, असे संजय राऊत यांनी म्हटले.
4 वर्षांपूर्वी -
आमदार-खासदारांना शरण आणण्याची ताकद ईडी आणि सीबीआय'मध्ये आहे - संजय राऊत
भारतीय जनता पक्षासोबत पुन्हा जुळवून घेतल्यास बरं होईल, अशी आग्रही मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे करत शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी एकच खळबळ उडवून दिली होती. सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलंल पत्र चर्चेचा विषय ठरला आहे. या पत्राचा धागा पकडून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ईडी, सीबीआयच्या गैरवापरावरून केंद्रातील भाजप सरकारला लक्ष्य केलं आहे. केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून कधीकाळी नरेंद्र मोदी, अमित शहांनादेखील त्रास सहन करावा लागला. त्यामुळे यंत्रणांमुळे होणाऱ्या मनस्तापाची त्यांना कल्पना असावी, असं राऊत यांनी शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या आजच्या (२७ जून) ‘सामना’मधील ‘रोखठोक’ सदरात म्हटलं आहे
4 वर्षांपूर्वी -
तिसरी लाट | मुलांची काळजी घेण्याच्या केंद्र व राज्य सरकारच्या सूचना | नागपूर भाजपकडून लहान मुलं आंदोलनात
ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मागणीसाठी भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहे. आज राज्यभरात भाजप नेते कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे. भाजप नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी सरकारविरोधात आज रस्त्यावर उतरले आहेत. नागपुरात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन पार पाडलं. यावेळी फडणवीसांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला.
4 वर्षांपूर्वी -
वाझेची अनावश्यक मालमत्ता प्रकरणी महाराष्ट्र एसीबीकडून चौकशी सुरु | वाझेच्या खात्यात आढळले दीड कोटी
महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) बेमुदत मालमत्ता प्रकरणी सचिन वाझे यांच्याविरूद्ध तपास सुरू केला आहे. एसीबीच्या महासंचालकांच्या आदेशानुसार ही चौकशी सुरु असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. एसीबी सचिन वाझेची जंगम आणि स्थावर मालमत्ता प्रकरणी चौकशी करत असून मालमत्तेच्या स्त्रोतांची चौकशी करणार असल्याचे ते म्हणाले. सचिन वाझेला एनआयएने गेल्या मार्च महिन्यात अँटिलिया प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्याप्रकरणी संशयित आरोपी म्हणून अटक केली होती. त्यामुळे सचिन वाझे यांच्या अडचणीतही दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.
4 वर्षांपूर्वी -
पोलखोल | ओबीसी राजकीय आरक्षणात कपात करण्याचा अध्यादेश फडणवीस सरकारने २ ऑगस्ट २०१९ ला काढला होता
भाजपने सध्या ओबीसी आरक्षणावरून राज्यात आंदोलन उभी करत महाविकास आघाडीवर आरोप करण्यास सुरुवात केली आहे. मात्र आता फडणवीसांच्या काळातील मोठी पोलखोल झाली आहे. राज्यातल्या ओबीसींच्या राजकीय आरक्षणात कपात करण्याचा निर्णय तत्कालीन फडणवीस सरकारने २ ऑगस्ट २०१९ रोजी घेतला होता आणि त्याबाबतचा अध्यादेश जारी केला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले होते. इतर मागासवर्गीयांना (ओबीसी) राज्यात सरसकट 27 टक्के आरक्षण दिले जाते. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेत 50 टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण असू नये, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्यामुळे ही चौकट पाळताना सरकारने 31 जुलैला अध्यादेश जारी करत ओबीसींच्या आरक्षणात कपात करण्यात येत असल्याचे जाहीर केले होते.
4 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षणाला कोर्टात विरोध करणारे अनुप मरार भाजपचे पदाधिकारी कसे? | उत्तर न देता OBC आरक्षणाचे खरे मारेकरी कोण? असे प्रश्न
ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मागणीसाठी भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहे. आज राज्यभरात भाजप नेते कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे. भाजप नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी सरकारविरोधात आज रस्त्यावर उतरले आहेत. नागपुरात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन पार पाडलं. यावेळी फडणवीसांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला.
4 वर्षांपूर्वी -
मुंबई, पुणे महापालिकेत महाविकास आघाडी एकत्र? - सविस्तर वृत्त
एकीकडे प्रदेश काँग्रेस स्वबळाचा नारा देत असताना वरिष्ठ पातळीवर मात्र, भाजपला रोखण्यासाठी महाराष्ट्रात महाविकास आघाडीशिवाय जमणार नाही. यासाठीच काँग्रेसच्या वरिष्ठ पातळीवर पुणे, मुबंई आणि अन्य महानगरपालिकांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याबाबत खलबते सुरू आहेत. याबाबत शुक्रवारी उच्चस्तरीय बैठक झाली असून यात विधानसभा अध्यक्षपदाबाबतही चर्चा झाली.
4 वर्षांपूर्वी -
केवळ चर्चा नाही, निर्णयही झाला, सारथी उपकेंद्राला जमीन मिळाली | ठाकरे सरकारचे कौतुक व आभार - संभाजीराजे
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भारतीय जनता पक्षाने छेडलेल्या राज्यव्यापी आंदोलनावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. संघर्ष कधी करायचा अन् संवाद कधी साधायचं, हे ज्याला कळतं तोच खरा नेता असतो. गर्दी करून ताकद दाखवता येते. मात्र, त्यामुळे कोरोनाची साथ पसरण्याचा धोका आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.
4 वर्षांपूर्वी -
सध्या अनेकांकडून आदळआपट | पण संघर्ष कधी करायचा, संवाद कधी करायचा हे ज्याला कळतं तोच नेता - मुख्यमंत्री
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भारतीय जनता पक्षाने छेडलेल्या राज्यव्यापी आंदोलनावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. संघर्ष कधी करायचा अन् संवाद कधी साधायचं, हे ज्याला कळतं तोच खरा नेता असतो. गर्दी करून ताकद दाखवता येते. मात्र, त्यामुळे कोरोनाची साथ पसरण्याचा धोका आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.
4 वर्षांपूर्वी -
फडणवीस बरळले | म्हणाले, यांच्या बायकांनी यांना मारलं, तरी ते मोदीजींनी केलं असं म्हणतील
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे. ओबीसी आरक्षणासाठी राज्यभरात 1 हजार ठिकाणी भाजपकडून 26 जून अर्थात आज शनिवारी जेलभरो आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलीय. त्या पार्श्वभूमीवर आज राज्यभरात ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल