16 April 2025 7:43 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan | एसबीआय बँकेच्या कर्जाचे दर कमी झाले, आता गृहकर्जासाठी किती व्याज द्यावे लागेल पहा Horoscope Today | 16 एप्रिल 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार बुधवार 16 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक पुन्हा तुफान तेजीत, शॉर्ट टर्म टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RPOWER Vodafone Idea Share Price | हा पेनी स्टॉक मालामाल करणार, सध्याच्या लेव्हल पासून 63 टक्के परतावा मिळेल - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँक शेअर्समध्ये तेजी, पेनी स्टॉकची जोरदार खरेदी, तज्ज्ञांनी काय म्हटलं - NSE: YESBANK Rattan Power Share Price | अप्पर सर्किट हिट, पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, संधी सोडू नका - NSE: RTNPOWER
x

उजनी पाणीसंघर्ष शांत झाला | उजनीतून इंदापूरला पाणी नेण्याचा निर्णय अखेर रद्द

Solapur Ujani Dam water

मुंबई, २७ मे | उजनी पाणी प्रश्नावरून वातावरण कालपर्यंत अधिकच तापल्याचं पाहायला मिळालं होतं. या धरणाच्या पाणी वाटपावरून काल सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बारामतीमधील गोविंदबाग या निवास्थानासमोर आंदोलनाच्या तयारीत असलेल्या नागेश वनकळसे व महेश पवार या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर शरद पवार यांच्या गोविंदबागतील निवासस्थासह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहयोग सोसायटीतील घराबाहेरील सुरक्षेत वाढ करण्यात आली होती.

करमाळ्याचे आमदार संजय शिंदे यांनी या प्रश्नी राष्ट्रवादीचे अध्या शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांची भेट घेऊन याबाबतचा पाठपुरावा केल्याचं पाहयला मिळालं होतं. त्यानंतर सोलापूरकरांसाठी एक मोठी बातमी आहे. सोलापूरच्या उजनी धरणातून इंदापूर तालुक्याच्या सिंचन योजनेसाठी ५ टीएमसी पाणी मिळाणार नाही, असे आता राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आहे. सरकारने तसे स्पष्ट आदेश आज (२७ मे) दिले आहेत. दरम्यान, यापूर्वी खरंतर उजनी धरणातून इंदापूरसाठी ५ टीएमसी पाणी देण्याला मंजुरी मिळाली होती. मात्र, सोलापूरकर आणि जिल्ह्यातील सर्व पक्षीय नेत्यांकडून ह्याला विरोध झाला. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याविरुद्ध तीव्र नाराजीचा सूर उमटू लागला. भरणे यांनी वारंवार आश्वस्त करूनही हे प्रकरण अधिकच पेटत असल्याने अखेर शासनाने इंदापूरला ५ टीएमसी पाणी न देण्याचे आदेश पत्र काढले आहे.

जलसंपदा विभागाचे उपसचिव वैजिनाथ चिल्ले यांनी या पत्रावर स्वाक्षरी केली आहे. दरम्यान, सोलापूरकरांचा हा मोठा विजय असल्याचे म्हटले जात आहे. आज झालेल्या राज्याच्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारने हा आदेश काढला आहे. दरम्यान, सोलापूरकरांसाठी हा विजय असला तरी दत्तात्रय भरणे यांच्यासाठी मात्र हा मोठा धक्का आहे.

दरम्यान. सांडपाण्याच्या नावाखाली सोलापूरच्या उजनी धरणातील ५ टीएमसी पाणी इंदापूरला वळवण्याचा निर्णय सरकारने पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याच हस्तक्षेपामुळेच घेतला गेला असून हे पाणी वळवण्यात आल्याचा गंभीर आरोप करत सोलापूरकरांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. यावेळी भाजपचे नेते सरकारविरोधात आक्रमक झालेच पण काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी असेही चित्र पाहायला मिळाले. कारण, काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदेंनी “प्राण जाए पर पानी न जाए” म्हणत आक्रमक इशारा दिला होता.

 

News English Summary: This is great news for Solapurkars. The state government has now announced that 5 TMC of water will not be available for the irrigation scheme of Indapur taluka from Ujani dam of Solapur. The government has given such clear orders today (May 27).

News English Title: Solapur Ujani Dam water conflict is over now the decision to take water from Ujani to Indapur canceled news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#MahaVikasAghadi(137)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या