16 April 2025 4:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | 180 रुपये टार्गेट प्राईस, बिनधास्त खरेदी करा, ब्रोकरेजकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL NTPC Green Energy Share Price | खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, कंपनीला मोठा भविष्यकाळ, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC JP Power Share Price | वडापाव पेक्षाही स्वस्त शेअरने 2107 टक्के परतावा दिला, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JPPOWER Vedanta Share Price | वेदांता शेअर खरेदी करावा, 53 टक्के परतावा मिळेल, ICICI सिक्युरिटीजने दिले संकेत - NSE: VEDL Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक BUY, SELL की Hold करावा? तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला - NSE: IDEA AWL Share Price | अदानी विल्मर शेअर देईल तगडा परतावा, 49 टक्के अपसाईड कमाईची संधी, अपडेट नोट करा - NSE: AWL
x

परराज्यातील मजुरांसाठी विशेष ट्रेनची व्यवस्था करा, CM ठाकरेंची केंद्राकडे मागणी

Covid 19, Corona Crisis, Lockdown, CM Uddhav Thackeray

मुंबई, २१ एप्रिल: एकट्या मुंबईत ३४५१ कोरोनाबाधित असून १५१ जणांचा मृत्यू झाला आहे. ठाणे मनपात १५० कोरोनाबाधित असून ४ जण दगावले आहेत. तर ठाण्यात २२ जण बाधित असून २ जण दगावले आहेत. नवी मुंबईत ९४ जणांना कोरोनाची लागण झाली असून तिघांचा मृत्यू झाला आहे. तर कल्याण-डोंबिवली मनपात ९३ जण कोरोनाग्रस्त आढळले असून दोघांचा मृत्यू झाला आहे. तर उल्हासनगरमध्ये एक जण कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे.

लॉकडाउनमुळे परराज्यातले जे कामगार महाराष्ट्रात अडकले आहेत त्यांची निवारा केंद्रातून उत्तम व्यवस्था केली जाते आहे. साधारणतः सहा लाख स्थलांतरित कामगार आणि मजुरांच्या जेवणाची व्यवस्था आणि इतर व्यवस्था केली आहे. त्यांची जबाबदारी महाराष्ट्र सरकारने घेतली आहे. तरीही हे लोक घरी जाऊ इच्छितात. काही वेळा ते आंदोलनाच्या पावित्र्यात येतात. ३० एप्रिल नंतर १५ मे पर्यंत विषाणुचा प्रादुर्भाव वाढण्याचा अंदाज केंद्र सरकार व्यक्त करत असेल तर आता हातात असलेला कालावधी लक्षात घेऊन परराज्यातील अडकलेल्या या कामगार आणि मजुरांना त्यांच्या मुळगावी पाठविण्यासाठी स्पेशल ट्रेनची व्यवस्था करावी अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा केंद्राकडे केली आहे.

अतिरिक्त केंद्रीय सचिव मनोज जोशी यांच्या अध्यक्षतेखाली पाच जणांचे केंद्रीय पथक महाराष्ट्रात आले आहे. आज मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून त्यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. परराज्याप्रमाणेच राज्यातील नागरिकही जिल्ह्याजिल्ह्यांत अडकले आहेत. त्यांच्यासाठीही हा निर्णय महत्वाचा ठरणार असल्याचे ठाकरेंनी सांगितले. परराज्यातील नागरिक घरी जाताना सुरुवातीपासून शेवटापर्यंत म्हणजे त्यांच्या घरापर्यंत त्यांचे निरिक्षण करता येईल, त्यांना तिथे क्वारंटाइन करता येईल व विषाणूचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची काळजी घेता येईल, अशी व्यवस्था करून त्यांना पाठवता येईल का, याचा विचार करून केंद्र सरकारने वेळेत निर्णय घ्यावा, असेही ते म्हणाले.

 

News English Summary: Chief Minister Uddhav Thackeray has once again demanded that a special train be arranged to send the stranded workers back to their hometowns if the Union government predicts an increase in the incidence of the virus from April 30 to May 15.

News English Title: Story arrange special train for labours in other states who stuck in Maharashtra because of lockdown demands Chief Minister Uddhav Thackeray to Modi government News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या