23 February 2025 2:44 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

मनसे आणि वंचित महाआघाडीमध्ये असतील तरच स्वाभिमानी येणार : राजू शेट्टी

Raju Shetty, Prakash Ambedkar, Raj Thackeray, MNS, VBA, Swabhimani Shetkari Sanghatana, Maharashtra State Assembly Election 2019

मुंबई : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि हातकणंगलेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी महाआघाडीबद्दल मोठं विधान केले आहे. राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना, प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी यांचा समावेश असेल तरच स्वाभिमानी महाआघाडीमध्ये सामील होणार असं राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी विविध राजकीय पक्षांकडून सध्या मोर्चेबांधणी सुरु आहे. या निवडणुकीत कॉंग्रेस आणि एनसीपीच्या आघाडी करून लढणार आहेत. लोकसभा निवडणुकीत राजू शेट्टी कॉंग्रेस आणि एनसीपी आघाडीसोबत होते. विधानसभा निवडणुकीविषयी बोलताना त्यांनी ‘लोकशाही टिकवण्यसाठी समविचारी पक्षांनी एकत्र येणं गरजेचे आहे. ‘त्यामुळे महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र असल्यास ते महाआघाडीचा भाग असतील अस विधान केले आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीनंतर राजू शेट्टी यांनी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. त्यानंतर शेट्टी यांनी हा निर्णय घेतला आहे. तसेच लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी राज ठाकरे यांनी कॉंग्रेस आणि एनसीपीला मदत केली होती. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेने आणि स्वाभिमानीसह वंचितही महाघाडीत सामील होऊ शकते.

मात्र राजू शेट्टी यांच्या या विधानाने भविष्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि वंचित बहुजन आघाडी यांची वेगळीच आघाडी तर होणार नाही ना, अशी चर्चा राजकीय विश्लेषकांमध्ये पाहायला मिळत आहे. काही दिवसनपूर्वी राजू शेट्टी यांनी कृष्णकुंजवर जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली होती, तसेच योग्य वेळी प्रकाश आंबेडकर देखील राज ठाकरे यांची विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भेट घेतील अशी शक्यता वर्तवली होती. त्यामुळे राजू शेट्टी यांच्या आजच्या विधानाला महत्व प्राप्त झाले आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x