22 February 2025 7:21 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या Railway Confirm Ticket | रेल्वेची तिकिट कन्फर्म आणि ट्रेन सुटली, तुम्ही दुसऱ्या ट्रेनने प्रवास करू शकता का? नियम लक्षात ठेवा Credit Card EMI | क्रेडिट कार्डच्या मोठ्या बिलाचे EMI मध्ये रूपांतर कसे करावे? थकीत रक्कम भरणे सोपे होईल Numerology Horoscope | नशीब आणि आकड्यांचा खेळ, अंकज्योतिषशास्त्रानुसार 16 फेब्रुवारी तुमचा रविवारचा दिवस कसा असेल IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी होईल मोठी कमाई, अशी संधी सोडू नका - IPO Watch
x

शिवसेनेचे ४ वरिष्ठ नेते पडले नाही, त्यांना पाडण्यात आलं : राज ठाकरे

Raj Thackeray, Shivaji Adhalrao Patil, Chandrakant Khaire, Anandrao Adsul, Anant Gite

मुंबई : महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकांच्या वेळेस शिवसेनेचे काही खासदार त्यांनी मंत्री म्हणून नको होते नेमके तेच लोकं पाडले गेले. अमरावतीमध्ये आनंदराव अडसुळ पडले, शिरुरमध्ये शिवाजी आढळराव पाटील, रायगड अनंत गीते पडले तसेच औरंगाबादमध्ये चंद्रकांत खैरे पडले असा दावा राज ठाकरेंनी केला आहे. तसेच काँग्रेसचा एक खासदार जो शिवसेनेत होता आणि काँग्रेसमध्ये गेला नेमका तोच खासदार निवडून आला असंही राज यांनी सांगितले.

राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीच्या निकालावरुन केंद्र सरकावर टीका केली असून ३७१ मतदारसंघात घोळ झाला त्यावर कोणी बोलत नाही अशी खंत व्यक्त केली आहे. ३७० कलमावर पेढे वाटले जात आहेत, पण ३७१ मतदारसंघात घोळ झाला त्यावर कोणी बोलत नाही असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. यावेळी राज ठाकरे यांनी सर्वात प्रथम जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यावर टीका करत या सगळ्या लोकांना माज आला आहे असा संताप व्यक्त केला.

भाजपचे लोक प्रत्येक निवडणुकीत त्यांच्या किती जागा निवडून येतील, याचा आकडा आधीच सांगतात. यांना इतका आत्मविश्वास येतो कुठून? आताही भाजपचं कोणीतरी म्हणालं आहे की आमच्या २५० जागा निवडून येतील. भाजपच्या इतक्या जागा निवडून येणार तर आम्ही काय उरलेल्या जागांवर गोट्या खेळायच्या का ?’ अशा शब्दात भाजपवर टीका केली आहे.

पुढे बोलताना त्यांनी नरेंद्र मोदी यांच्यावरही जोरदार टीका केली. माहिती अधिकार कायद्यावर बोलताना ठाकरे यांनी ‘मोदी यांना B.A. पास की नापास विचारलं म्हणून माहिती अधिकार कायदाच बदलला’ अशी टीका त्यांनी मोदी सरकारवर केली. तसेच माहिती आयुक्तांचा कार्यकाळ, त्यांचा पगार सरकारने ठरवायचा’ , असा कायदा पारित करून घेतला अस ठाकरे म्हणाले.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Raj Thackeray(53)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x