22 April 2025 6:39 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांच्या HRA मध्ये बदल होणार, हिशेबही नवीन बेसिक प्रमाणे, अपडेट जाणून घ्या EPFO Pension News | खाजगी कंपनी पगारदारांसाठी मोठी बातमी, EPFO ची महिना 7500 रुपये मिनिमम पेन्शन मिळणार SBI Mutual Fund | पगारदारांनो, बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 1 लाखांच्या गुंतवणुकीवर 1.27 कोटी परतावा मिळेल Horoscope Today | 22 एप्रिल 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या HFCL Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या स्वस्त शेअर्सची जोरदार खरेदी, 5 दिवसात 12.59% तेजी - NSE: HFCL Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 22 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

आमच्या उमेदवारांना मुस्लिम मते मिळाली नाहीत म्हणून पराभूत : प्रकाश आंबेडकर

Prakash Ambedkar, MIM

अकोला : लोकसभा निवडणुकीच्या पराभवाची समीक्षा सर्वच विरोधी पक्षाकडून सुरु आहे. त्यात अनेकांनी आपला पराभव नेमका कशामुळे झाला त्याचा शोध घेण्यास सुरुवात झाली आहे. त्यावर चिंतन केल्यावर प्रकाश अमीबेडकर म्हणाले की, दलित आणि मुस्लिम हे समीकरण जसे औरंगाबादमध्ये जमून आले, तसे इतरत्र जमून आले नाही, इतर ठिकाणी मुस्लिम मते न मिळाल्यानेच वंचित बहुजन आघाडीचा मोठा पराभव झाला, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला.

आज अकोला येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती त्यावेळी त्यांनी ही माहिती प्रसार माध्यमांना दिली. दलित आणि मुस्लिम यांनी एकगठ्ठा मतदान केल्यामुळे औरंगाबादमध्ये एमआयएमचे इम्तियाज जलील निवडून आले. परंतु इतर ठिकाणी असे झाले नाही. मुस्लिम मतदारांनी वंचित बहुजन आघाडीला मते दिली नाहीत, म्हणून आघाडी हरली, असे आंबेडकर म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तब्बल १० आमदार आपल्या संपर्कात असून, संपूर्ण काँग्रेस पक्ष वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करण्यासाठी इच्छूक आहे, असा टोला त्यांनी हाणला. आगामी विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांना पुनरागमनाची सुवर्णसंधी आहे. अशी संधी पुन्हा येणार नाही. १५३ विधानसभा मतदारसंघांत मनसेच्या चांगली कामगिरी करू शकते, अशी अशा त्यांनी व्यक्त केली.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Prakash Ambedkar(119)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या