17 April 2025 1:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा शेअर्समध्ये हलकी तेजी, लॉन्ग टर्ममध्ये 400% रिटर्न दिला, अपडेट जाणून घ्या - NSE: GTLINFRA Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: ASHOKLEY Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्सबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, BUY, SELL की Hold करावा? - NSE: SUZLON Tata Power Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा पॉवर शेअर मालामाल करणार, कमाईची संधी सोडू नका - NSE: TATAPOWER NTPC Green Energy Share Price | खरेदीनंतर संयम ठेवा, श्रीमंत करू शकतो हा शेअर, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN Vodafone Idea Share Price | तब्बल 66 टक्के परतावा मिळेल, पेनी स्टॉक फोकसमध्ये, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा
x

मतदारांनो वाजवा टाळ्या-थाळ्या! मोदी सरकारच्या काळात महागाई कंगाल करतेय, मैदा, तेल, डाळींच्या किमती 123 टक्क्यांनी वाढल्या

Inflation in India

Inflation in India | मोदी सरकार सत्तेत आल्यापासून महागाई नवनवे विक्रम रचते आहेत. विशेष म्हणजे याच महागाईच्या मुद्द्यावरून आंदोलनं करत मोदी सरकार सत्तेत विराजमान झालं आणि देशाचं अर्थकारण आणि राजकारण पूर्णपणे गुजराती लॉबीच्या हातात गेल्याची चर्चा सर्वत्र सुरु झाली आहे. विशेष म्हणजे लोकांनी महागाईवर चर्चा करू नये नये म्हणून प्रसार माध्यमं देखील आदेशाप्रमाणे मोदींना धार्मिक मुद्द्यांवरून सतत केंद्रस्थानी ठेवत असल्याचं पाहायला मिळतंय.

पण दुसऱ्या बाजूला महागाईमुळे सामान्य मतदारांचा खिसा खाली होण्याचं थोडंच थांबणार आहे. मोदी सरकार सत्तेत येऊन आता १० वर्ष झाली आहेत, पण आता मागील ५ वर्षातील महागाईची आकडेवारी समोर आली आहे. त्यामुळे आता लोकं खऱ्या अर्थाने राम भरोसे झाले आहेत असंच म्हणावं लागेल.

गेल्या काही महिन्यांपासून महागाईच्या मुद्दयांवर विरोधक आक्रमक होतं असले तरी सरकार पुरस्कृत प्रसार माध्यमं लगेच धार्मिक विषय झळकवतात आणि लोकांचे मूळ मुद्दे केंद्रस्थानी येणार नाहीत याची काळजी घेताना दिसतात. तरी गेल्या ५ वर्षांत पीठ, तेल, डाळींपासून मीठ ते मीठ यांच्या दरात ५० ते १२३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. हे आम्ही म्हणत नाही, तर ग्राहक मंत्रालयाची आकडेवारी आहे. भारताच्या दरडोई उत्पन्नातही लक्षणीय वाढ झाली असली, तरी जीवनावश्यक वस्तूंमध्ये झालेली वाढ म्हणजे महागाईच्या तुलनेत ज्यांचे उत्पन्न कमी वाढले आहे, त्यांच्यासाठी जादूटोणा करण्यासारखे आहे.

ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या (https://fcainfoweb.nic.in) संकेतस्थळावर दिलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या पाच वर्षांत तांदळाचा सरासरी दर २९.६८ रुपयांवरून ४६.५३ टक्क्यांनी वाढून ४३.४९ रुपये झाला आहे. या काळात गव्हाच्या दरात सुमारे ३८ टक्के तर गव्हाच्या पिठाच्या दरात ४३ टक्के वाढ झाली आहे.

मोदी सरकारच्या काळात हरभरा डाळ ७०.५४ रुपयांवरून १५७.८० रुपयांवर पोहोचली
डाळींबद्दल बोलायचे झाले तर अरहर किंवा तूरडाळीत सर्वाधिक वाढ झाली आहे. गेल्या पाच वर्षांत हरभरा डाळ ७०.५४ रुपयांवरून १५७.८० रुपयांवर गेली आहे. या कालावधीत त्यात १२३.६७ टक्के वाढ झाली आहे. याशिवाय चणाडाळ २७.४० टक्के, उडीद डाळ ७६.६६ टक्के, मूग डाळ ५६.०४ टक्क्यांनी वधारली आहे. गेल्या पाच वर्षांत डाळ ५४.५५ टक्क्यांनी महागली असून ६१.२३ रुपयांवरून ९४.६३ रुपये झाली आहे.

खाद्यतेल सर्वसामान्यांचे तेल काढते
गेल्या वर्षीच्या तुलनेत खाद्यतेलाच्या दरात दिलासा मिळाला असला तरी पाच वर्षांपूर्वीच्या दराच्या तुलनेत मोहरीचे तेल (पॅक) १०५.५५ रुपयांवरून सरासरी १३८.४७ रुपये प्रतिलिटर पर्यंत ३१.१९ टक्क्यांनी महाग झाले आहे. वनस्पती तेलात ५३.५७ टक्के, तर सूर्यफूल तेलात सुमारे ३१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. सोया तेलाच्या दरात ३५.२९ टक्के तर पाम तेलाच्या दरात ३२.२७ टक्के वाढ झाली आहे.

साखर, दूध आणि चहा
गेल्या पाच वर्षांत साखरेच्या दरात केवळ १५.१६ टक्के वाढ झाली आहे. दुधाच्या दरात ३४.६१ टक्के तर खुल्या चहाच्या दरात ३०.४४ टक्के वाढ झाली आहे. तर मीठ १५.३६ रुपयांवरून २२.९८ रुपयांवर पोहोचले आहे. या कालावधीत त्यात सुमारे ५० टक्के वाढ झाली आहे.

बटाटा, कांदा आणि टोमॅटोही प्रचंड महाग झाले
बटाटा, कांदा आणि टोमॅटो दरवर्षी लोकांना रडवतात आणि हसवतात. महागाईच्या उंबरठ्यावर कधी टोमॅटोने द्विशतके, तर कधी कांदा शतक तर कधी बटाट्याचे अर्धशतक झळकावले. मात्र, गेल्या पाच वर्षांत बटाट्याच्या दरात केवळ १३.६८ टक्के, तर कांद्याच्या दरात १६६.११ टक्क्यांनी वाढ झाली आहे. टोमॅटोही ७५.२४ टक्क्यांनी महागला आहे.

उपचार खर्चासाठी खिसा रिकामा होतोय
भारतात उपचारांचा खर्च झपाट्याने वाढला आहे. भारतातील वैद्यकीय महागाईचा दर आशियातील सर्वात वेगवान १४ टक्क्यांवर पोहोचला आहे. उपचारांचा खर्च वाढल्याचा थेट परिणाम सुमारे नऊ कोटी लोकांवर होतो, ज्यांचा मासिक खर्च १० टक्क्यांहून अधिक केवळ उपचारांवर जातो. ५१ वर्षांवरील लोक विम्याबाबत अधिक विचार करतात ही चिंतेची बाब आहे. ज्यांना गंभीर आजार आहे, त्यापैकी ८५ टक्के लोकांना वाटते की, त्यांना कंपनीकडून कोणताही आधार मिळत नाही.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Inflation in India prices of flour oil pulses have increased by 123 pc in 5 years 27 November 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Inflation in India(10)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या