23 February 2025 12:12 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

Marathwada Flood | मराठवाड्याला प्रसंगी कर्ज काढून 4 हजार कोटींची नुकसान भरपाई - उपमुख्यमंत्री

Marathwada Flood

बारामती, 10 ऑक्टोबर | अतिवृष्टीने मराठवाड्यातील ४८ लाख हेक्टरपैकी ३२ ते ३६ लाख हेक्टरचे नुकसान झाले आहे. एनडीआरएफच्या निकषानुसार हिशेब केल्यास नुकसान भरपाईसाठी साधारणत: चार हजार कोटी रुपये लागणार (Marathwada Flood) आहेत. केंद्राच्या मदतीची वाट न पाहता प्रसंगी कर्ज काढून ही भरपाई देण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी येथे विभागीय बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत केली.

Marathwada Flood. Out of 48 lakh hectares in Marathwada, 32 to 36 lakh hectares have been damaged due to heavy rains. If calculated as per NDRF norms, it will cost around Rs 4,000 crore to compensate :

उपमुख्यमंत्री म्हणाले, ४ पालकमंत्र्यांनी मराठवाड्याला मदतीची मागणी केली. मंत्रिमंडळ बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब होईल. ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीनंतर माहिती घेण्याची सूचना पुनर्वसन विभागाला दिली. निर्णय मुख्यमंत्री घेतील. खरिपात पीक कर्ज घेऊन वेळेत फेडणाऱ्यांना शून्य टक्के व्याज लावायचे, असा निर्णय घेतला होता. मात्र, अतिवृष्टीमुळे वेळेत कर्जफेड कठीण आहे. त्यांचे पीकच राहिले नाही. दुष्काळात कर्जाचे पुनर्गठन करून पुढील कर्जासाठी पात्र ठरवतो. तो निर्णयही घेतला जाणार आहे.

केंद्राने पीक विम्याचा हप्ता भरल्यानंतर भरपाई वाटप:
मंत्री अजित पवार म्हणाले की, पीक विम्याच्या पहिला हप्त्यापोटी राज्य सरकारने ९७४ कोटी रुपये दिले आहेत. केंद्र सरकारचा हप्ता येणे बाकी आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांची काल बैठक झाली. त्यात राज्य सरकारने हप्ता भरल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले. तीन दिवसांत केंद्राकडून सुमारे एक हजार कोटींचा हप्ता भरला जाईल. त्यानंतर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यास सुरुवात होईल.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Marathwada Flood it will cost around Rs 4000 crore to compensate.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Ajit Pawar(192)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x