शेतकऱ्यांच्या वादळाच्या तडाख्याने सरकारचा पालापाचोळा उडून गेला असता : सामाना

मुंबई : शेतकऱ्यांच्या वादळाच्या तडाख्याने सरकारचा पालापाचोळा उडून गेला असता अशी भीती सत्ताधाऱ्यांमध्येमोर्चेकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्याशिवाय दुसरा मार्ग सरकारकडे राहिला नसल्याची टीका सामानातून फडणवीस सरकारवर करण्यात आली आहे.
महाराष्ट्राच्या राजधानीत थडकलेल्या शेतकरी वादळाचा तडाखा खूप मोठा होता आणि त्यामुळेच सरकारला लेखी आश्वासन देणे भाग पडलं. शेतकऱ्यांनी मुंबईत येऊन दिलेली ‘थप्पड की गुंज’ फडणवीस सरकारच्या कायमचीच स्मरणात राहील असा सणसणीत टोला शिवसेनेच्या मुखपत्रातून सत्ताधाऱ्यांना लागण्यात आला आहे.
मुंबईत थडकलेल्या शेतकऱ्यांच्या वादळाला पुढे आश्वासनांची लेखी हमी देण्याशिवाय फडणवीस सरकारकडे दुसरा मार्गच उरला नव्हता. आता तरी दिलेलं आश्वासन पाळा नाहीतर शेवटची संधी ‘शेवटची काडी’ ठरेल असा इशाराही सेनेच्या मुखपत्रातून फडणवीस सरकारला देण्यात आला.
आजच्या सामना अग्रलेखातून शिवसेनेने भाजपवर बोचरी टीका केली असून त्यात त्यांनी म्हटले आहे की, नाशिकहून १८० किमीच अंतर कापत शेतकरी आणि आदिवासींचा मोर्चा राजधानी मुंबईत परतला आणि सरकारकडून लेखी आश्वासन घेऊनच माघारी परतला. शेतकरी आणि आदिवासींच्या या अभूतपूर्व मोर्चातून सेनेला फडणवीस सरकारवर सामानातून निशाणा साधण्याची नामी संधीच मिळाली आहे.
पुढे असेही म्हटले आहे की कालपर्यंत जे सरकार शेतकरी आणि आदिवासींच्या मोर्च्याबाबत ढिम्म होते ते सोमवारी अचानक संवेदनशील झालं. शेतकरी आणि आदिवासींच्या आक्रोशाचा आवाजच ज्यांच्या कानापर्यंत पोहोचत नव्हता ते एकदम त्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक झाले असं नमूद करत फडणवीस सरकारला टोला लगावला आहे.
सरकारच्या ऑनलाईन आणि पारदर्शक गोंधळामुळेच संपूर्ण कर्जमाफीचा प्रश्न आजही पेटलेलाच आहे. शेतकऱ्यांचा संपूर्ण सातबारा कोरा करण्याच्या शिवसनेच्या मागणीचेच ऐतिहासिक रूप गेल्या वर्षी शेतकरी संपात दिसले होते आणि त्यावरच शिवसेनेने जे रान पेटवले होते त्यामुळेच सरकारला शेतकरी कर्जमाफीची घोषणा करावी लागली होती. परंतु शेतकऱ्यांना प्रत्यक्ष अंमलबजावणीत घातलेल्या जाचक अटी आणि शर्तीं मुळेच संपूर्ण कर्जमाफी हा केवळ एक फार्सच ठरला होता असं ही अग्रलेखात म्हटले आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल