गांधी घराण्याची गरीबी हटली; लोकांची नाही: उद्धव ठाकरे

मुंबई : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी गरीबी हटावची घोषणा करताहेत. खरंतर याआधी त्यांच्या आजीबाईंनी याची सुरूवात केली होती. त्यांची गरीबी हटली, परंतु लोकांची नाही. काँग्रेस देशद्रोहाचे कलम हटवू पाहत आहे. हाच सर्वात मोठा देशद्रोह आहे. हे कलम काढल्यास दाऊद येऊन काँग्रेसचा नेता बनेल, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला.
दक्षिण मध्य मुंबईचे शिवसेना उमेदवार अरविंद सावंत यांच्या प्रचारासाठी महालक्ष्मी रेसकोर्सजवळ आयोजित जाहीर सभेत उद्धव ठाकरे बोलत होते. ते पुढे म्हणाले, देशद्रोह्यांना गोंजारणारे, क्रांतीकारकांना कायर म्हणणाऱ्यांच्या हाती देश देऊ नका. मी अमित शहांचा अर्ज भरायला गेलो, तर माझ्यावर टीका झाली. एनसीपीवाले म्हणतात, तुम्ही यांच्या शामियानात कसे? त्यांच्या पोटात का दुखतय? अरे याच तंबूत तुम्ही आधी झाडलोट करायला गेला होता, असा सवालही त्यांनी केला.
मिलिंद आमच्या अंगावर येताना जरा जपून ये. तुझ्या वडिलांना ओळख माझ्या वडिलांनी दिली. बाळासाहेबांनी मुरली देवरा यांना महापौर केले नसते, तर आज मुंबईकरांना ते कोण? हे कदाचीत माहित नसते, अशी टीका पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. मराठवाड्यातील जुलमी निजामाची राजवट संपविण्यासाठी सरदार वल्लभभाई पटेल खंबीरपणे पाठिशी राहिले. तसे इथल्या जनतेला आणि महाराष्ट्रातील सरकारला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाठबळ द्यावे, असे आवाहन उद्घव ठाकरे यांनी केले. लातूर-उस्मानाबाद लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांच्या प्रचारसभेत ते बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे निवडणुकीच्या प्रचारसभेत पहिल्यांदाच औसा येथे मंगळवारी एकत्र आले. ठाकरे म्हणाले, भारतीय जनता पक्षाने केलेला जाहीरनामा वाचून आनंद झाला. कलम ३७०, राममंदिर आणि शेतकरी हा केंद्रबिंदू मानला आहे. युती होण्याचे हेच कारण आहे. काँग्रेसचा जाहीरनामा मात्र थापा आहेत. राहुल यांच्या आजींपासून गरिबी हटावचा नारा सुरु आहे. त्यांची गरिबी हटली मात्र लोकांचे काय
झाले, अशी टीका ठाकरे यांनी केली.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल