20 April 2025 3:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस किती परतावा देईल? - NSE: ADANIPOWER IRB Share Price | 46 रुपयांचा आयआरबी इन्फ्रा शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून BUY रेटिंगसह टार्गेट अपडेट - NSE: IRB Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्समध्ये मोठ्या अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: JIOFIN Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मिळेल मोठा परतावा, अपडेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्स गुंतवणूकदारांसाठी महत्वाची अपडेट, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON HDFC Mutual Fund | पगारदारांनो, ही फंडाची योजना गुंतवणूकदारांचे पैसे 4 ते 5 पटीने वाढवत आहे, इथे पैसा वाढवा Horoscope Today | 20 एप्रिल 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

फक्त जाहिरातबाजी? राज्यातील तब्बल ५३ नद्या प्रदूषितच

मुंबई : काही महिन्यांपूर्वी ‘मुंबई रिव्हर अँथम’ गाण्यातील जाहिरातीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अमृता फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांचा अभिनय संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला होता. त्यानंतर त्यांच्यावर प्रचंड टीका सुद्धा करण्यात आली होती. कारण, केवळ जाहिरातबाजी करणाऱ्या सरकारकडून प्रत्यक्ष नद्यांच्या प्रदूषणात घट करण्यासाठी प्रत्यक्ष जमिनीवर काहीच होताना दिसत नाही. त्याच्या पुरावा आता समोर आला आहे. कारण, जाहिरातीत स्वतःची चमकोगिरी करून, प्रत्यक्ष जमिनीवर लोकांच्या तसेच स्थानिकांच्या प्रबोधनासाठी काहीच होताना दिसत नाही.

राज्यातील तब्बल ५३ नद्या प्रदूषित असून, गोदावरी, मिठी, मोरना, वैनगंगा या सर्वांत प्रदूषित आहेत, तर पंचगंगा, उमोडी आणि वशिष्टी नद्या स्नानास योग्य असल्याचा दावा प्रदूषण नियंत्रण मंडळाने केला आहे. बीओडी’चे प्रमाण ३ पेक्षा जास्त असल्यास पाणी अत्यंत प्रदूषित मानले जाते. राज्यातील नद्यांत बीओडीचे प्रमाण ३ ते ३० पर्यंत आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मते गोदावरी, मिठी, मोरना, वैनगंगा या सर्वाधिक प्रदूषित नद्या आहेत. तर भीमा, कालु, कुंडलिका, मुठा नद्या त्याखालोखाल असून, त्यानंतर इंद्रायणी, कन्हन, मुळा, मुळा-मुठा, पवना, पेढी, पूर्णा, वर्धा यांचा क्रमांक लागतो.

तुलनेने कमी प्रदूषित नद्यांत दारणा, गिरणा, गोमाई, कान, कोलार, कृष्णा, नीरा, पांझरा, पातळगंगा, पेनगंगा, रंगावली, सीना, तापी, तितूर, वेल तर त्याहून कमी प्रदूषित नद्यांत अंबा, भातसा, बिंदूसार, बोरी, चंद्रभागा, घोड, हिवरा, कोयना, मांजरा, मोर, पेल्हार, सावित्री, सूर्या, तानसा, उल्हास, वैतरणा, वेण्णा, वाघूर या नद्या आहेत. दरम्यान, पंचगंगेत सातत्याने सांडपाणी सोडले जात आहे. जी नदी वाहती असते; त्या नदीत प्रदूषणाचे प्रमाण कमी असते. पंचगंगेचा विचार करता जेथे शहराचे, गावाचे सांडपाणी नदीत सोडले जाते आहे, त्या ठिकाणी प्रदूषण आढळते. इचलकरंजीपासून पुढील भागात प्रदूषणाची समस्या आहे. इचलकरंजीपर्यंत मागील वर्षी फारसे प्रदूषण आढळले नाही, अशी माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे देण्यात आली.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या