23 February 2025 8:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

अन्यथा सुशांतसिंह प्रकरणावरून राज्य सरकार बरखास्त होईल हे लक्षात ठेवा : आ. भातखळकर

Maharashtra government, CBI, Supreme Court, Sushant Singh Rajput, MLA Atul Bhatkhalkar

मुंबई, 8 ऑगस्ट : सुशांत प्रकरणावरून भाजपने महाविकास आघाडीला कात्रीत पकडण्याची योजना आखल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपचा रोख महाविकास आघाडीवर त्यांचं मुख्य लक्ष हे शिवसेनेचे नेते आणि मंत्री आदित्य ठाकरे हेच असल्याचं म्हटलं जातं आहे. त्यामुळे समाज माध्यमांवर देखील मागील दिवसांपासून आदित्य ठाकरे यांना मोठ्या प्रमाणावर लक्ष करण्यात आलं आहे. तसेच सुशांत प्रकरणात केंद्राने सीबीआय चौकशीला मान्यता दिल्यानंतर त्याचे संकेत देखील मिळत आहेत. त्यामुळे राज्य सरकारने देखील सुप्रीम कोर्टात याच विषयावरून स्वतःची भूमिका आधीच मांडण्यास सुरुवात केली आहे.

समाज माध्यमांवर आदित्य ठाकरे यांच्या विरुद्ध तर अभियान सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातील काही अभियानं ही ट्विटरवर सलग काही दिवस ट्रेंडिंगवर होती हे देखील पाहायला मिळालं. मात्र मागील काही दिवसांपासून राज्यातील भाजप नेत्यांचं आदित्य ठाकरे हे एकमेव लक्ष असल्याचं पाहायला मिळत असून सुशांत प्रकरणच त्यांच्या केंद्रस्थानी आहे.

दरम्यान, अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येच्या पोलिस तपासात कोणालातरी वाचविण्यासाठी संपूर्ण राज्य सरकार काम करीत असल्याची लोकांची भावना आहे. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे आदेश पाळले नाहीत, तर राज्य सरकार बरखास्त होईल, एवढे लक्षात ठेवावे, असा इशारा भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी दिला आहे.

सुशांतसिंहच्या आत्महत्याप्रकरणी रोजच आरोप- प्रत्यारोप, खुलासे प्रतिखुलासे होत असून आज महापौरांच्या विधानानंतर भाजपनेही पलटवार केला आहे. तसेच यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु असूनही सीबीआय वा बिहारच्या तपासी अधिकाऱ्यांना क्वारंटाईन करण्याची शिवसेना नेत्यांची धडपड सुरुच आहे, असा आरोपही भाजपने केला आहे. अशी दडपशाही चालवून घेणार नाही, असेही भाजप नेते सांगत आहेत. पण या वादावादीमुळे यात खरेच कोणालातरी वाचविण्याचा प्रयत्न सुरु आहे का, तसेच उलटपक्षी कोणाला उघडे पाडण्याचा भाजपचा प्रयत्न सुरु आहे का, एवढी लपवालपवी सुरु आहे म्हणजे कोठेतरी पाणी मुरते आहे का, अशीही चर्चा लोकांमध्ये असल्याचे मत भातखळकर यांनी व्यक्त केले.

 

News English Summary: People feel that the entire state government is working to save someone in the police investigation into the suicide of actor Sushant Singh Rajput. BJP MLA Atul Bhatkhalkar has warned that if the Supreme Court order is not complied with in this case, the state government will be sacked.

News English Title: Maharashtra government will be dismissed if Supreme Court orders not followed in Sushant Singh Rajput case said MLA Atul Bhatkhalkar News latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#SushantSinghRajput(113)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x