16 April 2025 1:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vedanta Share Price | वेदांता शेअर खरेदी करावा, 53 टक्के परतावा मिळेल, ICICI सिक्युरिटीजने दिले संकेत - NSE: VEDL Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक BUY, SELL की Hold करावा? तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला - NSE: IDEA AWL Share Price | अदानी विल्मर शेअर देईल तगडा परतावा, 49 टक्के अपसाईड कमाईची संधी, अपडेट नोट करा - NSE: AWL Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER Trident Share Price | संयम ठेवल्यास हा पेनी स्टॉक श्रीमंत करू शकतो, यापूर्वी दिला 5322 टक्के परतावा - NSE: TRIDENT SBI Home Loan | एसबीआय बँकेच्या कर्जाचे दर कमी झाले, आता गृहकर्जासाठी किती व्याज द्यावे लागेल पहा
x

फडणवीसांना जमलं नाही ते आदित्य ठाकरेंनी करून दाखवलं | मुंबई आरे'तील ८१२ एकर जागा वन विभागाकडे | जंगल कायम राहणार

Save Aarey

मुंबई, ०८ जून | मुंबईसारख्या महानगरात आता मध्यभागी जंगल उभं राहणार आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळची आरे ची ८१२ एकरची जागा जंगल म्हणून घोषित करण्यात आली आहे. त्यानुसार २८६ हेक्टर अधिसुचित जागेचा ताबा आरे दुग्ध वसाहतीने वन विभागाला प्रत्यक्ष सोपवला आहे. त्यामुळे आरे मधली ही जमिन आता अधिकृतरित्या Indian Forest Act च्या सुरक्षेत आली आहे.

आरेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी या जमिनीचा ताबा मुख्य वनसंरक्षक यांच्याकडे सोपवला. या जमिनीचा ताबा मिळाल्यामुळे मुंबईसारख्या शहरात मध्यभागात जंगल निर्माण करण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात आरेमधील जागेत मेट्रो कारशेड बांधण्यावरुन चांगलाच गदारोळ माजला होता. राज्यात उद्धव ठाकरे सरकार आल्यानंतर त्यांनी हा निर्णय रद्द केला होता.

गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्याच्या काळात दुग्धविकास मंत्री सुनील केदार, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत या प्रस्तावावर चर्चा झाली होती. यासंदर्भातील राखीव वन क्षेत्राबाबत कलम ४ नुसार नागरिकांकडून सूचना आणि हरकती मागवण्यात येणार असून त्यावर सुनावणीनंतर अंतिम अधिसूचना काढण्यात येईल. राखीव वन क्षेत्राचा निर्णय घेत असताना आदिवासी समाजाचे हक्क अबाधित राहतील याची काळजी घेण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

आरेमधील जागेव्यतिरीक्त बोरिवली, गोरेगाव, मरोळ-मरोशी येथील जमिनीचा ताबाही वनविभागाकडे सोपवण्यात आला आहे. त्यामुळे या जमिनीवर मुंबईत भविष्यकाळात जंगल फुलवलं जाऊ शकतं.

यासंदर्भात राखीव वन क्षेत्राबाबत कलम ४ नुसार नागरिकांकडून सूचना आणि हरकती मागवण्यात येऊन त्यावर सुनावणीनंतर अंतिम अधिसूचना काढण्यात येणार आहे. राखीव वन क्षेत्राचा निर्णय घेताना आदिवासी समुदाय तसेच इतर संबंधितांचे योग्य हक्क अबाधित ठेवावेत, असेही मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आहेत.

 

News English Summary: In a metropolis like Mumbai, the forest will now stand in the middle. Aarey’s 812 acres of land near Sanjay Gandhi National Park has been declared a forest. Accordingly, 286 hectares of notified land has been handed over to the Forest Department by Aarey Dairy Colony. Therefore, the land in Aarey is now officially protected by the Indian Forest Act.

News English Title: Mumbai Aarey handed over 286 hectare land of to Forest Department CMO uddhav thackeray tweeted news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#AadityaThackeray(40)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या