23 February 2025 1:55 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

अजब उत्तर! मुंबईत पाणी तुंबलं नाही तर साचलं: महापौर विश्वनाथ महाडेश्वर

Shivsena, Mumbai Rain, Uddhav Thackeray

मुंबई : पावसाळ्यापूर्वी १०० टक्के नालेसफाई झाली असल्याचं स्पष्ट करणाऱ्या शिवसेनाप्रणित मुंबई महागरपालिकेची पावसाळा सुरु होताच पोलखोल झाली आहे. मुंबईमध्ये पावसाला सुरुवात होऊन २-३ दिवस झाले नसताना देखील काल रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसामुळे मूंबईतील अनेक भाग पूर्णपणे जलमय झाल्याचं वृत्त आहे आणि त्यासंबंधित व्हिडिओ देखील स्वतः सामान्य नागरिकच समाज माध्यमांवर शेअर करून संतप्त भावना व्यक्त करत आहेत.

दरम्यान, आज मुंबईत प्रवासादरम्यान प्रसार माध्यमांनी मुंबई महानगरपालिकेचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना याविषयी प्रश्न विचारले असता त्यांनी हा दावा पूर्णपणे व कॅमेरा अमान्य केल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्यांनी थेट तुंबलं आणि साचलं यातील फरक स्पष्ट करण्याचा पाढाच वाचण्यास सुरुवात केली. त्यांच्या म्हणण्यानुसार मुंबईत सर्वकाही सुरळीत असून वाहतूक सेवा देखील उत्तम असून, सामान्य मुंबईकरांचे दैनंदिन व्यवहार देखील रोजच्या प्रमाणे सुरु असल्याचं म्हटलं आहे. तसेच पावसाळ्यापूर्वी संपूर्ण नालेसफाई झाल्याने कोणत्याही समस्या उद्भवणार नसल्याचा दावा यावेळी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना केला.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अनेक फलदायी ठरू शकतील अशा विषयांवर पत्रकार परिषदा आयोजित करणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सध्या या विषयावर समोर आलेले नाहीत. कदाचित पाऊस पूर्णपणे थांबल्यावर आणि परिस्थिती पूर्वपदावर आल्यावर ते कॅमेरासमोर येतील जसं ते प्रत्येक पावसाळ्यात करतात. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी मुंबई शहरातील नालेसफाईची कामं १००% टक्के झाल्याचं सामनातून भाष्य करणाऱ्या उद्धव ठाकरेंची पोलखोल झाली आहे असंच नागरिकांचं मत आहे.

पावसाळ्यापूर्वी नालेसफाईवरून सामनातून नेमकी कोणती बातमी आली होती?

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)#udhav Thakarey(405)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x