महत्वाच्या बातम्या
-
त्या अधिकाऱ्यांना PoK'वर पाठवा म्हणाले होते; अन राज्याच्या प्रधान सचिवपदी बढती दिली
राज्यात सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडीच्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार सोमवारी पार पडला. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने आज मुंबई मेट्रो -३ च्या संचालक अश्विनी भिडे यांच्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. अश्विनी भिडे यांना आता प्रधान सचिवपदी बढती देण्यात आली आहे. तसेच एमएमआरसीएल आणि मेट्रो -३ चे संचालकपदही अश्विनी भिडे यांच्याकडे कायम ठेवण्यात आले आहे. आरे येथील मेट्रो-३ च्या कारशेडच्या मुद्द्यावरून अश्विनी भिडे आणि शिवसेना यांच्यात तीव्र मतभेद झाले होते. मात्र हे मतभेद बाजूला ठेवत अश्विनी भिडे यांना पदोन्नती देण्यात आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
मूळ आडनाव बदलून 'भारतीय' केलं, पण गुजराती-मारवाडी-युपीच्या नेत्यांमध्येच भाजपचा भारत?
‘कंबोज हे स्वतःच मूळ आडनाव बदलून ‘भारतीय’ करून त्यावर मोठा इव्हेंट देखील भारतीय जनता पक्षाचे मुंबईतील नेते मोहित कंबोज यांनी भरवून आणला होता. मात्र या महाशयांच्या ‘भारतीय’ या व्याख्येत अजून गुजराती, मारवाडी आणि उत्तर भारतीय एवढ्याच समाजाचा भारत सामावलेला आहे असंच म्हणावं लागेल. त्यात असे प्रश्न भाजपच्या नेत्यांना केवळ महाराष्ट्रातील मंत्रिमंडळाबाबतच पडत असल्याने काळाच्या मंत्रिमंडळात गुजराती, मारवाडी आणि उत्तर भारतीय नेत्यांना स्थान मिळालं नसल्याने त्यांना वेगळीच पोटदुखी होऊ लागल्याचं दिसतं.
5 वर्षांपूर्वी -
उद्धवा, अजब तुझे सरकार... किरीट सोमय्यांचे मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र
सोमवारी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. यावेळी काँग्रेसचे आमदार अस्लम शेख यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. मात्र या मुद्द्यावरून विरोधी पक्षानं महाविकास आघाडीच्या सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये किरीट सोमय्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. ‘देशद्रोही आता देशभक्त झाले… उद्धवा, अजब तुझे सरकार’ असं सोमय्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र डागले आहे.
5 वर्षांपूर्वी -
या वर्षातील इंटरटेनिंग ट्विट; 'देवेंद्रजी आणि अजित पवारजी तुम्ही करून दाखवलं'
राजकारण म्हटलं की नेते मंडळी नेहमीच स्वतःला समाज माध्यमांवरून एखाद्या घटनेवरून प्रतिक्रिया किंवा मत व्यक्त करत असतात. राज्याच्या राजकारणात अनेक मुख्यंमत्री होऊन गेले, मात्र त्यांच्या अर्धांगिनी कधीच झगमगत्या दुनियेत दिसल्या नाहीत. अर्थात याला अपवाद ठरल्या त्या अमृता फडणवीस.
5 वर्षांपूर्वी -
२ लाखांवरच्या कर्जधारकांसाठी नवीन योजना आणणार - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
महाराष्ट्रात सत्तेत आलेल्या शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या महाआघाडीच्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार पार पडला आहे. कोणालाही नाराज न करता हा ३ मित्रपक्षांचा मंत्रिमंडळ विस्तार असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. मंत्रिमंळ विस्तारानंतर झाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी जाहीर पत्रकार परिषद घेत दिली. या विस्तारांनंतर आता २-३ दिवसांमध्ये खातेवाटप होईल असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
मंत्रिमंडळात भावाला स्थान न मिळाल्याने संजय राऊतांचं नाराजी नाट्य
महाविकास आघाडीच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या शिवसेनेच्या मंत्र्यांची यादी समोर आली आहे. अनिल परब, उदय सामंत, अब्दुल सत्तार यांच्यासह १३ जण मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. मात्र शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांचे धाकटे बंधू आमदार सुनील राऊत राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. मंत्रिपद न मिळाल्यामुळे ते आमदारकीचा राजीनामा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
5 वर्षांपूर्वी -
मंत्रिमंडळ विस्तार; राष्ट्रवादीकडून कोणाला मिळणार संधी
महाविकास आघाडीच्या सरकारचा रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार अखेर होत आहे. या विस्तारात आघाडीमधील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या तीन पक्षांच्या मिळून एकूण ३६ नव्या मंत्र्यांचा समावेश असणार आहे. सोमवारच्या शपथविधीनंतर सर्व मंत्र्यांना खातेवाटप होईल, अशी अपेक्षा आहे. ठाकरे सरकारच्या पहिल्याच मंत्रिमंडळात आमदार आदित्य ठाकरेंना स्थान मिळालंय. आदित्य ठाकरे सुद्धा मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळात २५ कॅबिनेट मंत्री असणार आहेत.
5 वर्षांपूर्वी -
अपरिपक्वपणा! वर्षा बंगला सोडताना देखील भिंतीवर 'विकृत-प्रवृत्ती' दर्शन?
महाराष्ट्रात सत्तापालट झालाय. आता महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आहे. उद्धव ठाकरे आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेत. अशातच मुंबईतील मुख्यमंत्री बंगल्यावर म्हणजेच वर्षावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपार्ह वाक्य लिहिण्यात आली आहेत.
5 वर्षांपूर्वी -
ठाणे नंतर मुंबई पालिका? अमृता फडणवीस यांच्या ट्विटमुळे AXIS बँक मोठे ग्राहक गमावणार
शिवसेना विरूद्ध अमृता फडणवीस वाद दिवसेंदिवस टोकाला पोहोचत चालला आहे. अमृता फडणवीस यांच्या टीकेनंतर शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेतली आहे. पोलीस दलाची खाती एक्सिस बँकेतून वळवल्यानंतर आता ठाणे महानगरपालिकेनं मोठा निर्णय घेतला आहे. ठाणे महानगरपालिकेतील सर्व कर्मचाऱ्यांचे एक्सिस बँकेत खाती आहे. आता या बँकेतील खाती सरकारी बँकेमध्ये ताबडतोब वळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिवसेनेचे महापौर नरेश म्हस्के यांनी आज तातडीची बैठक घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहे.
5 वर्षांपूर्वी -
डिटेन्शन कँपची पद्धत ब्रिटिशांनी आणलेली; तीच मोदी आणत आहेत: प्रकाश आंबेडकर
“अरे हिंमत असेल तर मला अटक करुन दाखवा”, असं आव्हान प्रकाश आंबेडकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिले. प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात आज नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी प्रकाश आंबेडकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि काँग्रेसवर टीका केली.
5 वर्षांपूर्वी -
आशिष शेलार यांची Y दर्जाची सुरक्षा काढली; यापुढे त्यांच्यासोबत केवळ २ हवालदार
भारतीय जनता पक्षाच्या सत्ताकाळात अनेक व्यक्तींना विशेष सुरक्षा पुरवली होती. त्यात आपलंच सरकार असल्याने अनेक भाजप नेत्यांनी गरज नसताना केवळ स्टेटस दाखविण्यासाठी मोठ्या दर्जाच्या पोलीस सुरक्षा घेतल्या होत्या. सध्या ठाकरे सरकारने त्यासर्व सुरक्षेचा आढावा घेण्यास सुरुवात केली असून अनेकांची सुरक्षा घटवून राजकीय टिमक्या मिरवण्यापासून रोखले आहे. त्याचा विशेष फटका भारतीय जनता पक्षाच्या आमदारांना देखील बसत आहे.
5 वर्षांपूर्वी -
शहांचं अभिनंदन! लोकांचं मंदी, महागाई, बेरोजगारीवरून लक्ष हटवण्यात ते यशस्वी
सर्व देशांच्या लोकांना सामावून घेण्यासाठी भारत ही काय धर्मशाळा आहे का? असा सवाल मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मोदी सरकारला केला आहे. १३५ कोटी लोकसंख्या असेलेल्या देशाला आणखी लोकांची काय आवश्यकता आहे असा सवालही त्यांनी यावेळी केला. ते पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. देश म्हणून आपण आणखी ओझं वाहू शकत नाही, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
5 वर्षांपूर्वी -
मुंबई कोस्टल रोड प्रकल्प; मुख्यमंत्र्यांच्या ड्रीम प्रोजेक्टवरील बंदी सुप्रीम कोर्टाने उठवली
मुंबई महापालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या कोस्टल रोडच्या कामावरील स्थगिती सर्वोच्च न्यायालयानं उठवली आहे. प्रकल्पाचे काम सुरू करा, असे निर्देश न्यायालायनं दिले आहेत. या निर्णयामुळं मुंबई महापालिका व राज्य सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयानं १६ जुलै रोजी कोस्टल रोडच्या कामास मनाई केली होती.
5 वर्षांपूर्वी -
लवकरच राजकीय भूकंपाचे आठवलेंकडून संकेत, पण कसा ते त्यांना सुद्धा माहित नाही
नागपुरात विधानमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. यातच राज्यात राजकीय पुन्हा राजकीय भूकंप होण्याची शक्यता असल्याचे विधान सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मात्र नेमका भूकंप कसा शक्य आहे ते देखील त्यांना माहित नसल्याचं दिसलं आणि त्यामुळे केवळ कोणाच्यातरी सांगण्यावरून राजकीय वातावरण दूषित करण्याऱ्या टीममध्ये ते देखील असल्याचं प्रथम दर्शनी दिसत आहे.
5 वर्षांपूर्वी -
वृक्षतोडूवरून सेनेवर कमिशनचा आरोप; पण फडणवीस सरकारच्या आरे वृक्षतोडीवरच भ्रष्टाचाराचं वलय?
मुंबई मेट्रोच्या कारशेडसाठी आरेमध्ये ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात एकूण २०११ झाडं तोडण्यात आली. मात्र त्यासाठी फडणवीस सरकारने तब्बल २ कोटी ७० लाख १६ हजार ८९८ रुपयांचा खर्च आल्याची माहिती माहितीच्या अधिकारात उघड झाली आहे. म्हणजे सदर आकडेवारीनुसार एक झाड तोडण्यासाठी एकूण १३, ४३४ रुपये एकदा खर्च करण्यात आला होता. आरटीआय कार्यकर्ते कार्यकर्ते आनंद भंडारे यांनी आरेतील वृक्षतोडीसाठी नेमका किती खर्च करण्यात आला, याबद्दलची सविस्तर विचारणा माहिती अधिकाराच्या माध्यमातून एमएमआरसीएलकडे केली होती. त्यानंतर सदर धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
GST वाद चिघळला! तुम्ही व्यापारी असाल तुमच्या घरचे, मोदी सरकारवर शिवसेनेची टीका
केंद्र सरकारकडून राज्यांना देणे असलेला वस्तू व सेवा कर अर्थात, जीएसटी (GST) परतावा रखडल्यामुळं संतापलेल्या शिवसेनेनं केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. ‘जीएसटी परताव्यावरून राज्यांची मुस्कटदाबी व आर्थिक नाड्या आवळण्याचा प्रकार सुरू असेल तर केंद्रातील ठकसेनांविरुद्ध राज्यांना आवाज उठवावा लागेल,’ असं ठणकावतानाच, ‘तुम्ही व्यापारी असाल तुमच्या घरचे, राज्यांचे पाकीट का मारता,’ असा खडा सवाल शिवसेनेचं मुखपत्र दैनिक ‘सामना’तून करण्यात आला आहे.
5 वर्षांपूर्वी -
विधानसभेत मतदारसंघाचे प्रश्न न विचारण्याचे विक्रम रचणाऱ्या आ. कदमांचे राष्ट्रवादीला तारांकित प्रश्न
भाजपचे घाटकोपरचे आमदार राम कदम यांनी राष्ट्रवादीचे आमदार आणि प्रवक्ते नवाब मलिक यांना सभागृहाची नियमावली आणि कायदे समजून न घेताच तारांकित ट्विटचे प्रश्न करत आरोप केले आहेत. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, “राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक महाराष्ट्राची दिशाफ़ुल करत आहेत. विधानसभेचे नियम जगजाहिर आहेत. आमदारना तारांकित प्रश्न विचारण्यापासून रोखले. ही सरकारची नियोजन शून्यता. आणि BAC तारांकित प्रश्नांपासून आमदारना रोखण्यासाठी नव्हती. मात्र त्यावर सभागृहाचे नियम सांगून आ. राम कदम तोंडघशी पडले आहेत आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी जे स्वीकारलं आहे त्यावर आ. राम कदमांनी हरकत घेतल्याचे समोर आलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
मंत्रिमंडळ विस्तारानंतर सर्व खात्यांचे यथोचित खातेवाटप होईल: अर्थमंत्री जयंत पाटील
राज्यातील शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस महाआघाडी सरकारच्या मंत्र्यांचे बहुप्रतीक्षित खातेवाटप अखेर आज जाहीर करण्यात आले. शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे यांच्यावर गृहमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांच्याकडे अर्थमंत्रीपद तर काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरातांकडे महसूल मंत्रीपद आले आहे.
5 वर्षांपूर्वी -
गुपचूप भाजपमध्ये गेलेल्या हाजी अरफात शेख यांचं महामंडळ सुद्धा गुपचूपपणे रद्द
फडणवीस सरकारने निवडणुकीच्या तोंडावर घेतलेल्या निर्णयांचा पंचनामा करतानाच काही वादग्रस्त निर्णयांना स्थगिती देण्याचा धडाका लावणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने बुधवारी महामंडळांवरील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द करीत भाजपला धक्का दिला.
5 वर्षांपूर्वी -
काहीजण 'जनपथला' घाबरुन सभागृहातून पळाले: आशिष शेलार
राज्यसभेत बुधवारी नागरिकत्व दुरुस्ती विधेयक मंजूर झाले. त्याअगोदर ते लोकसभेतही मंजूर झाले होते. या विधेयकाला दोन्ही सभागृहात विरोधकांनी विरोध केला होता. शिवसेनेने लोकसभेत फारसा विरोध केला नाही. परंतु, राज्यसभेत शिवसेनेने विरोध केला. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सभागृहात या विधेयकावर स्पष्ट मत मांडले. या विधेयकाच्या माध्यमातून मतांचे राजकारण व्हायला नको, असे राऊत म्हणाले. एवढेच काय तर या विधेयकाला विरोध करण्यासाठी शिवसेनेने सभात्याग केला. परंतु, तरीही राज्यसभेत नागरिकत्व दुरुस्ती विधेयक मंजूर झाले. दरम्यान, शिवसेनेच्या याच भूमिकेवरुन भारतीय जनता पक्ष नेते आशिष शेलार यांनी टीका केली आहे.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Mahindra And Mahindra Share Price | 46 टक्के परतावा मिळेल, भक्कम कंपनी, यापूर्वी दिला 619 टक्के परतावा - NSE: M&M
-
RVNL Share Price | रेल्वे कंपनीचा शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीत, मल्टिबॅगर शेअरची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL