महत्वाच्या बातम्या
-
'माझं नाव शिवसेना, पण लोकं माझ्याकडे का येईना'; प्रश्न घेऊन सामान्यांची धाव मनसेकडे का? सविस्तर
एक काळ असा होता की सामान्य मराठी माणूस कोणत्याही दैनंदिन समस्यांनी किंवा अन्यायाने हतबल झाला की पहिली धाव ही शिवसेनेचे तत्कालीन नेते आनंद दिघे आणि त्यांच्यासारख्या आक्रमक पणे न्याय मिळवून देणाऱ्या नेत्यांच्या कार्यालयाबाहेर रीघ लावायचे. आजच्या बदलत्या काळात आणि बदलत्या राजकीय समीकरणात शिवसैनिक देखील बदलले आहेत. सत्तेत असून देखील मराठी माणसं मातोश्रीवर समस्या घेऊन रीघ का लावत नाही हे सर्वश्रुत आहे. सध्याच्या कार्यकर्त्यांना देखील रक्तदान शिबीर आणि इतर छोट्या मोठ्या वस्तूंचे वाटप म्हणजेच लोकांच्या समस्या असा भ्रम झाल्याने ‘कार्य शिवसेनेचे’ असे टॅग वापरून नित्याची मार्केटिंग पाहायला मिळाले.
6 वर्षांपूर्वी -
'बेस्ट' निर्णयाची आजपासून अंमलबजावणी सुरू; किमान भाडं ५ रुपयांवर
मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनातील आणि खिशाला परवडणारा सार्वजनिक प्रवासी वाहतुकीचा कणा असलेल्या बेस्ट परिवहन सेवेच्या किमान प्रवासी भाड्यात कपात करण्यात आली आहे. बेस्ट बसच्या किमान भाडेकपातीला मुंबई महापालिकेची महासभा आणि आरटीएने अधिकृत मान्यता दिल्यानंतर महाराष्ट्र सराकने देखील भाडेकपातीला मान्याता दिली आहे. त्यामुळे आता प्रवाशांना बेस्टचे किमान बसभाडे हे ८ रुपयांवरून ५ रुपयांपर्यंत कमी होणार आहे. दरम्यान, सदर निर्णयाला अनुसरून महाराष्ट्र सरकारकडून परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले असून, बेस्टचे नवे दर आजपासून प्रत्यक्ष लागू होणार आहेत.
6 वर्षांपूर्वी -
रेल्वे प्रवाशांच्या समस्यांबाबत अमित ठाकरे व मनसे शिष्टमंडळ रेल्वे महाव्यवस्थापकांची आज भेट घेणार
मुंबईची जीवनवाहिनी म्हणून ओळख असलेली रेल्वेसेवा आसपासच्या शहरांमधील प्रवाशांचा देखील दैनंदिन आयुष्याचा अविभाज्य घटक आहे. दरम्यान याच सेवेचा लाभ घेणाऱ्या मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील प्रवाशांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागतो आहे. मुंबई आणि आसपासच्या शहरांमधील वाढती लोकसभा आणि त्या तुलनेत रेल्वेच्या कमी फेऱ्या देखील त्यामागील मुख्य कारण आहे. मात्र त्यात विशेष अडचणी या महिलावर्गाला आहेत.
6 वर्षांपूर्वी -
अवैध वाहन पार्किंग: अनधिकृत फेरीवाले मोकाट; तर वाहन मालकांवर नियमानुसार दरोडे
मुंबई महापालिकेतर्फे सार्वजनिक वाहनतळांलगतच्या ५०० मीटर पर्यंतच्या हद्दीत अवैधरीत्या वाहन पार्किंग करणाऱ्या वाहनांविरुद्ध आजपासून धडक दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. जी दक्षिण विभागात पहिला दंड ठोठावत पहिल्या दिवशी एकूण ५६ वाहनांविरुद्ध कारवाई करण्यात आली असल्याचं प्रशासनाकडून स्पष्ट केले आहे. यापैकी एकूण ९ वाहनमालकांनी प्रत्येकी दहा हजार रुपये दंड भरून वाहने सोडवून घेतली. तर उर्वरित ४७ वाहने महापालिकेच्या ताब्यात असून ती परत देताना दंडासह विलंब शुल्क आकारले जाणार असल्याचे देखील सांगितले आहे.
6 वर्षांपूर्वी -
मुंबई: माहिम कॉजवेवरील ३ पात्र मराठी कुटुंबांना शिवसेनाप्रणित महापालिकेने केले बेघर
वांद्रे येथील चमडावाडी नाल्यातील बाधित बेहरामपाड्यातील अपात्र कुटुंबांचेही माहुलमध्ये तात्पुरती पुनर्वसन करून झोपड्यांवर कारवाई करणार्या महापालिकेने माहिम कॉजवे येथील ३ पात्र बांधकामांवर शुक्रवारी कारवाई केली आहे. परंतु सदर कारवाई करताना या पात्र मराठी कुटुंबांचे कोणतेही पुनर्वसन न करता उलट त्यांना बेघर करण्यात आल्याचं समजतं. विशेष म्हणजे ही कारवाई जी- उत्तर विभागाऐवजी चक्क त्यांच्या हद्दीत शिरुन एच-पश्चिम येथील वांद्र्यातील महापालिकेच्या अधिकार्यांनी केल्याचं वृत्त आहे. मुंबई महापालिकेला उघडे पाडणारा हा प्रताप वांद्र्यातील अधिकार्यांनी केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
मुंबईत पुन्हा पावसाला सुरुवात; अनेक ठिकाणी पाणी तुंबलं नाही तर फक्त 'साचलं' आहे
मुंबईसह उपनगरांमध्ये पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. काल पहाटेपासून पडणाऱ्या पावसाचा जोर वाढला आहे. गोरेगाव, मीरा रोड, लालबाग, परळ, या ठिकाणी असलेल्या सखल भागांमध्ये पाणी महापौरांच्या नजरेतून केवळ ‘साचण्यास’ सुरूवात झाली आहे. अंधेरी, वांद्रे परिसरातही जोरदार पाऊस पडतो आहे. मुंबईतल्या अनेक ठिकाणी असलेल्या सखल भागांमध्ये देखील पाणी साचल्याचं वृत्त आहे. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावरची उड्डाणं देखील खराब हवामानामुळे थांबवण्यात आली आहेत. मुंबई एअरपोर्टच्या प्रवक्त्याने एएनआयला ही माहिती दिली आहे.
6 वर्षांपूर्वी -
स्वतः जागेवरचं भाडं नाकारायचं; अन घरपोच सेवा देणाऱ्या 'उबेर-ओला' बंद करा अशी मागणी?
राज्यातील रिक्षा चालकांच्या प्रलंबित मागण्यांकडे महाराष्ट्र सरकार नेहमीच दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे राज्यभरातील रिक्षाचालकांनी उद्यापासून बेमुदत संप पुकारला आहे. जोपर्यंत सरकार आमच्या सर्व मागण्या मान्य करत नाहीत तोपर्यंत संप सुरूच ठेवण्याचा निर्णय आटोरिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समितीने घेतल्याचे वृत्त आहे.
6 वर्षांपूर्वी -
प्रवाशांचे हाल होणार! विविध मागण्यांसाठी रिक्षाचालकांचा उद्यापासून बेमुदत संप
राज्यातील रिक्षा चालकांच्या प्रलंबित मागण्यांकडे महाराष्ट्र सरकार नेहमीच दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे राज्यभरातील रिक्षाचालकांनी उद्यापासून बेमुदत संप पुकारला आहे. जोपर्यंत सरकार आमच्या सर्व मागण्या मान्य करत नाहीत तोपर्यंत संप सुरूच ठेवण्याचा निर्णय आटोरिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समितीने घेतल्याचे वृत्त आहे.
6 वर्षांपूर्वी -
मुंबई पालिकेकडून बेकायदा पार्किंगवरून १०,००० दंड वसुलीला सुरुवात
मुंबई महापालिकेतर्फे सार्वजनिक वाहनतळांलगतच्या ५०० मीटर पर्यंतच्या हद्दीत अवैधरीत्या वाहन पार्किंग करणाऱ्या वाहनांविरुद्ध आजपासून धडक दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. जी दक्षिण विभागात पहिला दंड ठोठावत पहिल्या दिवशी एकूण ५६ वाहनांविरुद्ध कारवाई करण्यात आली असल्याचं प्रशासनाकडून स्पष्ट केले आहे. यापैकी एकूण ९ वाहनमालकांनी प्रत्येकी दहा हजार रुपये दंड भरून वाहने सोडवून घेतली. तर उर्वरित ४७ वाहने महापालिकेच्या ताब्यात असून ती परत देताना दंडासह विलंब शुल्क आकारले जाणार असल्याचे देखील सांगितले आहे.
6 वर्षांपूर्वी -
प्लास्टिक कचरा येतो, पण समुद्रकिनारी डंपरने 'डंप' केल्यासारखा चिखल आलाच कुठून?
एका बाजूला दादर-माहीम चौपाटीवरचा रोजचा कचरा उचलण्यासाठी प्रशासनाला २०१८ मध्येच लघुनिविदा काढण्याची वेळ आली होती. समुद्रात टाकलेला कचरा भरतीच्या लाटांमधून पुन्हा किनारपट्टीवर येत असल्याने किनारे स्वच्छ ठेवण्यासाठी पालिकेला वर्षभरात कोटय़वधी रुपये खर्च करावे लागतात. माहीम-दादरचा पाच किलोमीटरचा किनारा स्वच्छ ठेवण्यासाठी महापालिकेने निविदा मागवल्या होत्या. त्यासाठी सर्वात कमी बोली लावणाऱया मे. विशाल प्रोटेक्शन फोर्स यांना पुढील सहा वर्षांसाठी तब्बल १२ कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात येणार होते. या कंत्राटानुसार किनारा स्वच्छ ठेवण्यासाठी पावसाळय़ात दर दिवसाला ६५ हजार रुपये तर पावसाळय़ानंतरच्या दिवसांत दरदिवशी ३५ हजार रुपये देण्यात येणार होते. दरवर्षी त्यात पाच टक्क्यांनी वाढ करण्यात येणार होती.
6 वर्षांपूर्वी -
मिलिंद देवरा यांचा मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा
मुंबई काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचे वृत आहे. दरम्यान सदर राजीनामा देताना त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीपर्यंत मुंबई शहर युनिटचे निरीक्षण करण्यासाठी दिल्लीतील 3 वरिष्ठ नेत्यांच्या सामूहिक नेतृत्वाची तात्पुरती स्थापना करण्याची शिफारस देखील राजीनामा देण्यापूर्वी केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
मुंबई सीएसएमटी पूल व तिवरे धरण दुर्घटनेत अनेकांचे बळी जाऊनही उद्धव ठाकरे फिरकलेच नाही
मुंबई महापालिकेच्या मुख्यालयापासून काही अंतरावर असलेला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाजवळील दादाभाई नौरोजी मार्गावरील हिमालय पादचारी पूल गुरुवारी सायंकाळी ऐन गर्दीच्या वेळी कोसळून झालेल्या दुर्घटनेत एकूण ६ मुंबईकर मृत्युमुखी पडले, तर तब्बल ३१ जण गंभीर जखमी झाले होते. या दुर्घटनेप्रकरणी चुकीचा स्ट्रक्चरल अहवाल दिल्याचा ठपका असलेलस स्ट्रक्चरल ऑडिटर नीरजकुमार देसाई याला अटक करून वेळ मारून घेतली होती. मुंबई महानगपालिकेत सत्तेत असलेली शिवसेना मुंबैकरांप्रती किती असंवेदनशील आहे हे तेव्हाच कळाले जेव्हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या ठिकाणी किंवा बाधितांना भेटण्यासाठी फिरकले देखील नाही.
6 वर्षांपूर्वी -
स्वाभिमानीचे राजू शेट्टी व रविकांत तुपकर कृष्णकुंजवर, विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा
महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक तोंडावर आली असून पावसाळ्यात देखील सर्व पक्षाच्या नेत्यांची धावपळ सुरु झाली आहे. दरम्यान आज राज्यातील भारतीय जनता पक्ष विरोधी पक्षांनी एकत्र येत सत्ताधारी भाजपला धूळ चारण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केल्याचे पाहायला मिळत आहे. या अनुषंगाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवाजीपार्क येथील कृष्णकुंज निवासस्थानी भेट घेतली आहे. या भेटीवेळी त्यांच्यासोबत स्वाभिमानी पक्षाचे नेते रविकांत तुपकर देखील उपस्थित होते.
6 वर्षांपूर्वी -
शहर नियोजनाचा अर्थ ते सांगत राहिले; पण मुंबईकर २५ वर्ष 'अर्थ'वेड्या पक्षाच्या प्रेमात तल्लीन? सविस्तर
मागील २ दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईतील जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान या पावसामुळे मुंबईतील पायाभूत सुविधांचे अक्षरशः धिंडवडे निघाल्याचे पाहायला मिळाले. तसेच पावसाळ्यापूर्वी करोडो रुपये खर्चून १०० टक्के नालेसफाई करण्यात आल्याचा दावा देखील शिवसेनेने सामना वृत्तपत्रातून केला होता. कालच विधानसभेत कॅगचा अहवाल सादर करण्यात आला आणि त्यामध्ये मुंबई महापालिकेतील कारभाराची तसेच नालेसफाई आणि पायाभूत सुविधा उभारण्याच्या पद्धतीवर ताशेरे ओढण्यात आले होते. दरम्यान, पायाभूत सुविधा कोलमडल्याने विरोधकांपासून ते सामान्य नागरिकांनी सत्ताधारी शिवसेनेवर संताप व्यक्त करत, मागील २५-३० वर्ष शहरात सत्तेत असून देखील इथल्या पायाभूत सुविधा जैसे थे असल्याचा आरोप अनेक सामान्य लोकांनी देखील केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
विरोधक व नागरिकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचा सामनाच्या अग्रलेखात नेहमीची 'फॅशन' असा उल्लेख
मागील २ दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईतील जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान या पावसामुळे मुंबईतील पायाभूत सुविधांचे अक्षरशः धिंडवडे निघाल्याचे पाहायला मिळाले. तसेच पावसाळ्यापूर्वी करोडो रुपये खर्चून १०० टक्के नालेसफाई करण्यात आल्याचा दावा देखील शिवसेनेने सामना वृत्तपत्रातून केला होता. कालच विधानसभेत कॅगचा अहवाल सादर करण्यात आला आणि त्यामध्ये मुंबई महापालिकेतील कारभाराची तसेच नालेसफाई आणि पायाभूत सुविधा उभारण्याच्या पद्धतीवर ताशेरे ओढण्यात आले होते. दरम्यान, पायाभूत सुविधा कोलमडल्याने विरोधकांपासून ते सामान्य नागरिकांनी सत्ताधारी शिवसेनेवर संताप व्यक्त करत, मागील २५-३० वर्ष शहरात सत्तेत असून देखील इथल्या पायाभूत सुविधा जैसे थे असल्याचा आरोप अनेक सामान्य लोकांनी देखील केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
कॅग रिपोर्टमध्ये शिवसेनेची पोलखोल; कसली नालेसफाई, गटारे प्रचंड गाळाने अजूनही भरलेली
मुंबई शहरांमध्ये पावसाळ्यापूर्वी १०० टक्के नालेसफाई झाल्याच्या थेट दावा सामना वृत्तपत्रातून करण्यात आला होता. दरम्यान, पावसाळ्यापूर्वी मुंबई शहरातील नाले आणि गटारांमधील गाळ काढण्यासाठी मोठे टेंडर देखील काढण्यात आले होते. मात्र सत्ताधारी शिवसेनेची आज विधानसभेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या कॅग रिपोर्ट’मध्ये पोलखोल झाली आहे. प्रतितास केवळ २५ मि.मी पडलेल्या पावसाचे पाणी वाहण्याची मुंबईतील गटारांची क्षमता असून मुंबईतील गटारे गाळाने आजही भरली असल्याचे कॅगने आपल्या अहवालात समोर आणले आहे. मुंबईत साचणाऱ्या पाण्यास मुंबई महापालिकेचा ढीसाळ कारभार आणि हलगर्जीपणाच कारणीभूत असल्याचं कॅगने आपल्या अहवालात उघड केल्याने सत्ताधारी शिवसेना तोंडघशी पडली आहे.
6 वर्षांपूर्वी -
आदित्य ठाकरेंकडून महापालिकेच्या भोंगळ कारभारावर पांघरून घालण्याचा प्रयत्न
मुंबईची तुंबापुरी झाल्यानंतर अखेर आज आदित्य ठाकरे प्रसार माध्यमांच्या समोर प्रकट झाले आणि उणिवा स्वीकारण्यापेक्षा त्यांनी पालिकेच्या कामचुकार कारभाराची पाठराखण केल्याचे पाहायला मिळाले. मागील २ दिवसाच्या पावसामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचलं आहे. त्यामुळे मुंबईकरांना पावसाला सुरवात होताच हालपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. अशातच युवसेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी महापालिकेची पाठराखण केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
असलेलं नीट सांभाळता येत नाही आणि निघालेत स्मार्ट सिटी करायला - अजित पवार
सध्या मुसळधार पाऊसामुळे मुंबईची तुंबई झाल्याचे सर्वत्र पाहायला मिळत आहे. मुंबईत मुसळधार पावसामुळे मालाडमध्ये भिंत कोसळून दुर्घटना झाली आणि या दुर्घटनेवरून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी शिवसेना – भाजप सरकारवर जोरदार निशाणा साधत महापौरांना तुंबलेली मुंबई दिसत नाही तसेच हा सत्तेचा माज आणि सरकारचा बेजबाबदारपणा आहे, अशी टीका अजित पवार यांनी केली.
6 वर्षांपूर्वी -
अनधिकृत बांधकामामुळे अशा घटना घडतात पण त्याला पालिका जबाबदार नाही - संजय राऊत
मुंबई: मालाडमध्ये भिंत कोसळून झालेली दुर्घटना हि महापालिकेचं अपयश नाही तर तो एक अपघात आहे असं वक्तव्य सेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. मालाडमध्ये भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 18 जणांचा मृत्यू झाला असून 60 पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. संजय राऊत यांच्यामते पावसाळा सुरु होण्या आगोदर उद्धव ठाकरेंनी स्वतः मुंबईभर फिरून नालेसफाईची पहाणी केली होती.
6 वर्षांपूर्वी -
अजब उत्तर! मुंबईत पाणी तुंबलं नाही तर साचलं: महापौर विश्वनाथ महाडेश्वर
पावसाळ्यापूर्वी १०० टक्के नालेसफाई झाली असल्याचं स्पष्ट करणाऱ्या शिवसेनाप्रणित मुंबई महागरपालिकेची पावसाळा सुरु होताच पोलखोल झाली आहे. मुंबईमध्ये पावसाला सुरुवात होऊन २-३ दिवस झाले नसताना देखील काल रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसामुळे मूंबईतील अनेक भाग पूर्णपणे जलमय झाल्याचं वृत्त आहे आणि त्यासंबंधित व्हिडिओ देखील स्वतः सामान्य नागरिकच समाज माध्यमांवर शेअर करून संतप्त भावना व्यक्त करत आहेत.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP
-
Mahindra And Mahindra Share Price | 46 टक्के परतावा मिळेल, भक्कम कंपनी, यापूर्वी दिला 619 टक्के परतावा - NSE: M&M
-
RVNL Share Price | रेल्वे कंपनीचा शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीत, मल्टिबॅगर शेअरची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL