महत्वाच्या बातम्या
-
मिशन महाराष्ट्र | भाजपच्या 'जन आशीर्वाद यात्रे'ला आजपासून सुरुवात | मुंबई-कोंकण ते मराठवाडा
भाजपकडून आजपासून देशभरात ‘जन आशीर्वाद’ यात्रा सुरु करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील केंद्रीय मंत्र्यांनीही आपल्या ‘जन आशीर्वाद’ यात्रेची सुरुवात केली आहे. पंतप्रधान मोदींनी आतापर्यंत केलेल्या कामांना सामान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ही यात्रा भाजपने काढली आहे.
4 वर्षांपूर्वी -
मुंबई आणि कुडाळमध्ये पराभूत झालेल्या नारायण राणेंवर मुंबई महापालिका निवडणुकीची जवाबदारी? | भाजपचं मिशन 114
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन पोहोचल्या आहेत. त्यात मुंबईमध्ये भारतीय जनता पक्षाकडे कोणताही चेहरा नसल्याचं पाहायला मिळतंय. कारण गुजराती, मारवाडी आणि जैन या पारंपरिक मतदारांपलीकडे मुंबईतील शिवसेनेचा मतदार असलेल्या मराठी, भंडारी ते मालवणी मतदारांपुढे कोणता चेहराच नाही हे स्पष्ट झालं आहे. तसेच फडणवीसांना मुंबईत तास कोणीही चाहता वर्ग नाही. तसेच मुंबईतील भाजपचे बरेच विद्यमान आमदार हे मोदी लाटेवर निवडून आले आहेत आणि ते देखील ट्विटरवर वारंवार ट्विट करत स्वतःच्या बातम्या कशा झळकतील यावर केंद्रित असल्याने जमिनीवर त्यांची कोणतीही ओळख झालेली नाही.
4 वर्षांपूर्वी -
राजकारणात सपशेल अपयशी ठरलेला हा माणूस स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी आता राज्यात संघर्ष उभा करतोय - प्रवीण गायकवाड
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना बाबासाहेब पुरंदरे यांच्यापलीकडे इतिहासाचे आकलन नाही, अशी टीका संभाजी ब्रिगेकडून करण्यात आली आहे. राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात अलीकडच्या काळात जातींमधील संघर्ष वाढायला लागल्याचे वक्तव्य केले होते. विशेषत: राष्ट्रवादी काँग्रसेच्या उदयानंतर जातीचा मुद्दा मोठा होत गेला, असा थेट आरोप राज ठाकरे यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून राज ठाकरे यांचा समाचार घेतला.
4 वर्षांपूर्वी -
मंगळवारपासून लोकलच्या ट्रेन धावणार पूर्ण क्षमतेने | कालपासून लसवंतांना लोकल प्रवास सुरु
कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना कालपासून लोकल सेवा सुरू केली आहे. आता लोकलमधून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांमध्ये कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या प्रवाशांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुविधेसाठी मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेकडून पूर्ण क्षमतेने लोकल सुरू करण्याचे नियोजन केले आहे.
4 वर्षांपूर्वी -
काही लोक काहीतरी विधान करून लोकांचे लक्ष वेधण्याचे काम करतात, त्यांच्याकडे लोक दुर्लक्ष करतील - जयंत पाटील
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासूनच राज्यात जातीयवादी राजकारण वाढल्याची टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केली होती. या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले असून, काही लोक काहीतरी बोलून केवळ लोकांचे लक्ष वेधण्याचे काम करीत असतात. त्याकडे राज्यातील लोक दुर्लक्ष करतील, असे मत त्यांनी व्यक्त केले. सांगली येथे ध्वजारोहण कार्यक्रमानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
4 वर्षांपूर्वी -
संजय राठोड प्रकरणात चौकशीअंती वस्तुस्थिती समोर येईल, अनेकदा बिनबुडाचे आरोप होत असतात - अजित पवार
पुण्यात एका तरुणीने आत्महत्या केल्यानंतर मंत्रिपद गमावलेल्या संजय राठोड यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. माजी मंत्री संजय राठोड यांनी शरीरसुखाची मागणी केल्याची तक्रार यवतमाळ पोलिसांकडे दाखल करण्यात आली आहे. इतकच नाही, तर अजूनही तीच मागणी करून छळत असल्याचा आरोपही त्या पीडित ३० वर्षीय महिलेने केला होता.
4 वर्षांपूर्वी -
75 वा स्वातंत्र्यदिन | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते ध्वजारोहण | आरोग्य सुविधांसंबंधित माहिती दिली
75 व्या स्वातंत्र्यदिनी आठव्यांदा लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्राला संबोधित करत आहेत. लाल किल्ल्यावरून मोदी म्हणाले, ’75 व्या स्वातंत्र्यदिनी तुम्हाला आणि भारतावर प्रेम करणाऱ्या आणि जगातील लोकशाहीवर प्रेम करणाऱ्या सर्वांना अनेक शुभेच्छा. आज स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पवित्र पर्वावर देश सर्व स्वातंत्र्य सैनिक आणि राष्ट्राच्या रक्षणासाठी स्वतःचे बलिदान देणाऱ्या शूर वीरांना श्रद्धांजली अर्पण करत आहे.’
4 वर्षांपूर्वी -
१२ आमदारांच्या नियुक्तींसदर्भात राज्यपालांवर अदृश्य दबाव - छगन भुजबळ
आमदारांच्या रखडलेल्या नियुक्तीवरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारीवर दबाव असल्याचा आरोप केला आहे. याबाबत राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना पत्रकारांनी विचारले असता, राज्यपालांचा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे. त्यामुळे ते सकारात्मक निर्णय घेतील. परंतू त्यांच्यावर अदृश्य दबाव असल्याचा टोला लगावत भुजबळांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.
4 वर्षांपूर्वी -
मुंबई महानगरपालिका निवडणुक २०२२ | भाजपची जोरदार तयारी | 'समर्थ बूथ अभियाना'साठी विशेष रणनीती
शिवसेनेला कोंडीत पकडायचे असेल तर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेला धक्का देणे गरजेचे आहे. हे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना चांगलेच ठाऊक आहे. त्यामुळे येणारी महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीला भाजप लागलेली आहे. याबाबत विधानसभा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज एक महत्वाची बैठक आपल्या शासकीय निवासस्थानी बोलावली होती.
4 वर्षांपूर्वी -
नितीन गडकरींच्या पत्रावर बच्चू कडूंची प्रतिक्रिया आली, म्हणाले नितीन गडकरी...
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले आहे. या पत्रावरून राजकीय वातावरण तापले आहे. या पत्रामुळे शिवसेनेच्या शिस्तबद्ध पदाधिकाऱ्यांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. याबाबत मात्र, अकोल्याचे पालकमंत्री आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत मुख्यमंत्री ठाकरे हे योग्य भूमिका घेतील, असे ते म्हणाले. तसेच गडकरी साहेबांचा मी पण एक चाहता आहे, असेही ते म्हणाले.
4 वर्षांपूर्वी -
25 वर्षे शिवसेना -भाजप एकत्र होती | तेव्हा गडकरींना शिवसेना कशी काम करते हे माहिती नव्हतं का?
केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून तक्रार केली आहे. राज्यातील महामार्गाच्या कामांमध्ये शिवसेना कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी अडथळे आणत असल्याचे त्यांनी या पत्रात म्हटले. तसेच शिवसेनेच्या नियमबाह्य कामामुळे आणि दहशतीमुळे राष्ट्रीय महामार्गाची कामे बंद पडतील. असा इशाराच मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला आहे. तसेच त्यांनी उद्धव मुख्यमंत्र्यांकडे महामार्गाच्या कामात येणाऱ्या अडचणींची दखल घेण्याची विनंती केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
१२ आमदारांच्या नियुक्ती | ८ महिन्यांचा काळ म्हणजे राज्यपालांचे वागणं घटनाबाह्य आहे - घटनातज्ञ उल्हास बापट
राज्यात महाविकासआघाडीची सत्ता आल्यापासून 12 नामनिर्देशित आमदारांच्या नियुक्तीवरुन राज्य सरकार आणि राज्यपालांमध्ये वाद सुरू आहे. दरम्यान शुक्रवारी उच्च न्यायालयाने याविषयी सुनावणी केली आहे. जास्त काळ राज्यपाल या जागा रिक्त ठेवू शकत नसल्याचे हायकोर्टाने म्हटले आहे. त्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी तातडीने दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. ही केवळ सदिच्छा भेट असल्याचे सांगण्यात येत असले तरीही या भेटीत 12 आमदारांच्या नियुक्तीवर चर्चा झाल्याची शक्यता आहे.
4 वर्षांपूर्वी -
तुम्ही उभ्या देशात नियम फाट्यावर मारता, ते धंदे आम्हाला इथे शिकवू नका | शेलारांना झापलं
भाजप आमदार आशिष शेलार कायम शिवसेनेवर कायम निशाणा ठेऊन असतात. मुंबई महापालिकेत कार्यरत असलेल्या मराठी अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीवरून वादाची ठिणगी पडली आहे. भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीवरून शिवसेनेवर बाण डागल्यानंतर शिवसेनेकडून पलटवार करण्यात आला आहे. शिवसेनेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी शेलारांना नागरिकशास्त्र वाचण्याचा सल्ला देत टोला लगावला आहे.
4 वर्षांपूर्वी -
उर्मिला मातोंडकरांवर कोरोना निर्बंधांचे उल्लंघन केल्याचा आरोप | जिल्हा प्रशासनाचे चौकशीचे आदेश
बॉलिवूड अभिनेत्री आणि शिवसेनेच्या नेत्या उर्मिला मातोंडकर यांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. त्या उपस्थित असलेल्या एका कार्यक्रमात कोरोनाच्या निर्बंधांचे उल्लंघन झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही घटना झारखंडमधील पलामू जिल्ह्यातील आहे.
4 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्रात डेल्टा प्लसमुळे 5 जणांनी जीव गमावला | लसींचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच राज्यात एंट्री
कोरोना विषाणूच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या वाढत्या धोक्यात 15 ऑगस्टपासून महाराष्ट्रात अनलॉक 3.0 सुरू होत आहे. व्हायरसच्या ‘डेल्टा प्लस’ प्रकारामुळे आतापर्यंत राज्यात 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतांपैकी एक मुंबईचा, 2 रत्नागिरीचे, एक बीडचा आणि एक रायगडचा आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सर्व मृतांचे वय सुमारे 65 वर्षे आहे. यापैकी 2 लोकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले होते. तर दोघांनी प्रत्येकी एक डोस घेतला होता. राज्यात आतापर्यंत डेल्टा प्लस व्हेरिएंटची एकूण 66 प्रकरणे नोंदवली गेली आहेत.
4 वर्षांपूर्वी -
12 आमदारांच्या नियुक्तीवरुन हायकोर्टाने कान टोचले | राज्यपालांनी लगेच घेतली अमित शहांची भेट
राज्यात महाविकासआघाडीची सत्ता आल्यापासून 12 नामनिर्देशित आमदारांच्या नियुक्तीवरुन राज्य सरकार आणि राज्यपालांमध्ये वाद सुरू आहे. दरम्यान शुक्रवारी उच्च न्यायालयाने याविषयी सुनावणी केली आहे. जास्त काळ राज्यपाल या जागा रिक्त ठेवू शकत नसल्याचे हायकोर्टाने म्हटले आहे. त्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी तातडीने दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. ही केवळ सदिच्छा भेट असल्याचे सांगण्यात येत असले तरीही या भेटीत 12 आमदारांच्या नियुक्तीवर चर्चा झाल्याची शक्यता आहे.
4 वर्षांपूर्वी -
आजच्या घडीला दिल्लीपेक्षा महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचाराच्या घटना अधिक - देवेंद्र फडणवीस
दिल्लीत लहान मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली आहे. काँग्रेसने याघटनेच्या विरोधात दिल्लीत जोरदार आंदोलन केलं आहे. या आंदोलनात महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री नितीन राऊत हे देखील त्या आंदोलनात उपस्थित होते. यावर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली असून, दिल्लीत डोकं वर काढून आंदोलन करायचं मात्र महाराष्ट्रात तोंड लपवत फिरायचं, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला आहे.
4 वर्षांपूर्वी -
अकरावीसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु | 'या' ५ मनपा क्षेत्रातील प्रवेश ऑनलाईन पद्धतीने
राज्यात अकरावी सीईटी परीक्षा रद्द झाल्यानंतर आता अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक शिक्षण विभागाकडून जारी केले आहे. त्यानुसार राज्यातील मुंबई महानगर क्षेत्र, पुणे, पिंपरी चिंचवड तसेच नागपूर, नाशिक, व अमरावती या पाच मनपा क्षेत्रातील इ.11 वी चे सर्व प्रवेश केंद्रीय ऑनलाईन प्रवेश पद्धतीने करण्यात येणार आहेत. पाच क्षेत्र वगळता उर्वरित महाराष्ट्रातील प्रवेश स्थानिक परिस्थितीनुसार प्रचलित पद्धतीने केले जातील.
4 वर्षांपूर्वी -
राज्यपाल 6 वर्षात कधीही या यादीवर निर्णय घेऊ शकतात | 6 वर्षात नेमका कधी ते राज्यपाल ठरवतील - दरेकर
विधानपरिषदेतील 12 नामनिर्देशित आमदारांच्या नियुक्तीबाबतचा वाद कोर्टाने निकाली काढला आहे. “या जागा दीर्घकाळ रिकाम्या राहू शकत नाहीत. राज्यपालांच्या अधिकारांच्याबाबतीत आम्ही काही गोष्टी विचारात घेतल्या आहेत. जर काही गोष्टी विशिष्ट कारणांसाठी होत असतील तर त्याची कारणीमिमांसा होणं गरजेचं आहे”, असं हायकोर्टाने नमूद केलं.
4 वर्षांपूर्वी -
भाजपसोबत युती करावी | अन्यथा 2024 मध्ये शिवसेनेचं मोठं नुकसान होणार - आठवलेंचा इशारा
भारतीय जनता पक्ष एकाबाजूला राज्यातील २०२४ मधील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागल्याचं चित्र आहे. त्यासाठी राज्यातील नवनियुक्त केंद्रीय मंत्र्यांच्या जनआशीर्वाद यात्रा काढण्याचं नियोजन आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
Suzlon Share Price | मार्केट क्रॅशमध्ये सुझलॉन शेअर 6.54 टक्क्यांनी घसरला, टार्गेट प्राईस अपडेट जाणून घ्या - NSE: SUZLON
-
Tata Consumer Share Price | टाटा तिथे नो घाटा, 5219 टक्के परतावा देणारा शेअर मालामाल करणार - NSE: TATACONSUM