महत्वाच्या बातम्या
-
मंत्रिमंडळाचा प्रस्ताव परत पाठवता येत नाही अन् फेटाळताही येत नाही | त्यात हायकोर्टाचे ताशेरे | राज्यपालांची कोंडी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ६ नोव्हेंबर २०२० रोजी १२ नावांची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सुपूर्द केली आहे. यात राष्ट्रवादीचे एकनाथ खडसे, राजू शेट्टी, यशपाल भिंगे आणि आनंद शिंदे. तर काँग्रेसचे रजनी पाटील, सचिन सावंत, सय्यद मुझफ्फर हुसेन आणि अनिरुद्ध वनकर आणि शिवसेनेकडून ऊर्मिला मातोंडकर, चंद्रकांत रघुवंशी, विजय करंजकर आणि नितीन पाटील यांच्या नावांची शिफारस आहे.
4 वर्षांपूर्वी -
केंद्रीय नेतृत्वाने महाराष्ट्रसह इतर राज्यांमध्ये मुख्यमंत्री लादले | त्याच राज्यांमध्ये पक्षाचं नुकसान | भाजपा नेत्याचा घणाघात
देशातील सर्वोच्य पदावरील जो जनतेचं म्हणणं ऐकून घेत नाही, त्याला हुकुमशाह म्हणतात’, असा घणाघात भारतीय जनता पक्षाचे राजस्थानमधील माजी आमदार आणि कट्टर वसुंधरा राजे समर्थक नेते रोहिताश्व शर्मा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अप्रत्यक्षपणे लक्ष केलं आहे. ‘आपण कुणालाही घाबरत नाही. जे चुकीचे आहे, त्याविरोधात बोलू कारण यामुळे पक्षाचे नुकसान होत आहे. भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने राज्यांवर नेतृत्व लादलं. जिथे जिथे नेते लादण्यात आले, तिथे तिथे भारतीय जनता पक्षाचं सरकार गेलं’, अशा शब्दात शर्मा यांनी भारतीय जनता पक्षाला घरचा आहेर दिला.
4 वर्षांपूर्वी -
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ | स्थानिक माध्यमांच्या आणि राजकीय टीकेनंतर अदानी समूहाची माघार
मागील दोन दिवसांपासून समाज माध्यमांवरील आणि स्थानिक माध्यमांच्या टीकेनंतर मुंबई आंतरराष्ट्रीय विमातळाच्या मुख्य कार्यालयावरून अदानी समूहाला खुलासा करणं भाग पडलं आहे. माध्यमांमध्ये वृत्त पसरल्यानंतर राजकीय प्रतिक्रिया देखील उमटण्यास सुरुवात झाली होती.
4 वर्षांपूर्वी -
MAHA TET EXAM | राज्यात 40 हजार शिक्षकांची भरती | कालावधीही निश्चित
महाराष्ट्रातील शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. आता शिक्षक भरतीस पात्र ठरण्यासाठी होणारी परीक्षा घेण्याचा शिक्षण विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय झाला आहे. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHA TET) 15 सप्टेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत होणार आहे. तर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील अंदाजे 27 हजार, आणि माध्यमिक शाळेतील अंदाजे 13 हजार अशी एकूण 40 हजार शिक्षकांची पदे रिक्त आहेत. शिक्षण विभाग टप्प्याटप्प्याने या जागा भरणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
जन्म नोंद दाखला ऑनलाईन कसा काढायचा? जाणून घ्या सविस्तर
जन्म-मृत्यूचा दाखला आता ऑनलाइन पद्धतीने जगात कुठेही मिळू शकेल. सुमारे 80 लाख जन्म-मृत्यू दाखले ऑनलाइन देण्याचा मार्ग खुला होणार आहे. देश-विदेशांतील मुंबईकरांना जन्म-मृत्यू दाखला सहजपणे मिळू लागेल. प्रमाणपत्रे ऑनलाइन देताना या सर्व प्रमाणपत्रांवर “क्यूआर कोड’ (क्विक रिस्पॉन्स कोड) नमूद केला जाईल. त्यामुळे या प्रमाणपत्रांची अधिकृतता ऑनलाइन पद्धतीनेच तपासता येईल. त्याअंतर्गत जन्म-मृत्यूविषयक प्रमाणपत्रावरील “क्यूआर कोड’ ऍण्ड्रॉईड आधारित भ्रमणध्वनीमधील “क्यूआर कोड रीडर’ या ऍपच्या साह्याने कॅमेऱ्याद्वारे स्कॅन केल्यास भ्रमणध्वनीवर इंटरनेट ब्राऊजरवर संबंधित संकेतस्थळावरील प्रमाणपत्राचे पान उघडले जाईल.
4 वर्षांपूर्वी -
बदनामीसाठी चाईनीज फंडिंग घेत असल्याचा फडणवीसांचा माध्यमांवर आरोप | PM केअरने चायनीस फंडिंग घेतल्याचा विसर?
फोन टॅपिंगच्या मु्द्दयावरून विरोधक संसदेत गोंधळ घालत आहेत. पण केंद्र सरकारने कुणाचेही फोन टॅप केले नाहीत. विरोधकांचे आरोप दिशाभूल करणारे आहेत, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. तसेच फोन टॅपिंग मोदींच्या नव्हे तर मनमोहन सिंग यांच्याच काळात झाल्याचा दावाही देवेंद्र फडणवीस यांनी केला.
4 वर्षांपूर्वी -
तरुणांनो, सरकारच्या मध केंद्र योजनेचा फायदा घेण्यासाठी मंडळाकडे अर्ज कसा कराल? - वाचा माहिती
मध केंद्र योजना करिता अर्ज करण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळच्या वतीने करण्यात आले आहे. शेती करत असतांना केवळ शेतीच्या भरवशावर अवलंबून राहिलात तर शेतीमध्ये नुकसान होण्याची शक्यात असते त्यामुळे शेतीला पूरक व्यवसाय केला तर नक्कीच शेती फायद्याची होऊ शकते. शेतकरी बंधुंनो शेतीपूरक व्यवसाय म्हटले कि लगेच आपल्या डोळ्यासमोर दुग्धव्यवसाय किंवा कुक्कुटपालन योजना विषयी चित्र निर्माण होते. मित्रांनो दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन किंवा शेळीपालन हे व्यवसाय फायद्याचे असले तरी देखील इतरजन करतात म्हणून आपणही तोच व्यवसाय करावा हि काही मोठी बाब नाही.
4 वर्षांपूर्वी -
मुंबईचे अहमदाबाद करण्याचे काम सुरू आहे | त्यापेक्षा अहमदाबादला स्वतंत्र राज्याचा दर्जा द्या - विनायक राऊत
मुंबई विमानतळाच्या मुख्यालयाच्या वादावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. ही अत्यंत निषेधार्ह बाब आहे. मुंबईचे अहमदाबाद करण्याचे हे काम सुरू आहे. मुंबई विमानतळाचे महत्व कमी करून अहमदाबादचे महत्व वाढवण्याचे हे काम आहे. त्यापेक्षा अहमदाबादला स्वतंत्र स्टेट्सचा दर्जा देऊन त्याचं महत्व वाढावा. आयजीच्या जिवावर बायजीचा उद्धार आणि सासूच्या जीवावर जावई सुभेदार अशी वागणूक केंद्र सरकारच्या माध्यमातून केली जातेय. शिवसेना हे सहन करणार नाही.
4 वर्षांपूर्वी -
एकाचवेळी मिळणार १०'वीचे गुणपत्रक आणि सनद | विद्यार्थ्यांना सनदसाठी वर्षभर वाट पाहावी लागणार नाही
राज्यातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावी बोर्ड परीक्षेच्या निकालनंतर आजवर ८ दिवसाच्या अंतराने गुणपत्रक विद्यार्थ्यांना देण्यात येत होते. मात्र आता निकालानंतर मिळणाऱ्या गुणपत्रिकारबरोबरच सनद देखील मिळणार असल्याची माहिती बोर्डातील अधिकाऱ्यांनी दिली. दरवर्षी मार्च-एप्रिल महिन्यात दहावीच्या परीक्षा घेण्यात येतात.
4 वर्षांपूर्वी -
SSC निकाल झाला | 11'वी प्रवेशासाठी CET परीक्षेची तारीख जाहीर | प्रवेश प्रक्रिया कशी असेल?
इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर 11 वी प्रवेशासाठी ऐच्छिक सीईटी परीक्षा होणार असल्याचं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं होतं. त्यानुसार आता 11 वी प्रवेशासाठी होणाऱ्या सीईटी परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. 21 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेच्या दरम्यान ही सीईटी परीक्षा होणार आहे. राज्यभरात एकाच वेळी ही परीक्षा घेतली जाईल, असं राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळे 10वी परीक्षा पास झालेल्या विद्यार्थ्यांनी आता सीईटीसाठी तयारीला लागण्याची गरज आहे.
4 वर्षांपूर्वी -
High Alert | पुढचे 5-6 दिवस अतिमुसळधार पावसाचा IMDचा अंदाज
भारतीय हवामान विभागाच्या वतीनं हवामानाचा सुधारित अंदाज जारी करण्यात आला आहे. सुधारित अंदाजानुसार राज्यात पुढील ५ ते ६ दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. शनिवारपासून राज्यातील अनेक भागात तुफान पाऊस कोसळत असल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. त्यानंतर आता भारतीय हवामान विभागानं पुढील पाच ते सहा दिवस राज्यात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस होण्याचा इशारा दिला आहे.
4 वर्षांपूर्वी -
घरबसल्या शॉप ॲक्ट लायसेन्स ऑनलाईन कसे काढायचे? | जाणून घ्या सविस्तर
नगरपालिका महानगरपालिका क्षेत्रात व्यवसाय करते वेळी व्यवसाय अधिकृत असल्याचे प्रमाणपत्र म्हणजे शॉप अधिनियम लायसेन्स होय.कोणत्याही व्यवसायाची कायदेशीर सुरुवात शॉप अधिनियम लायसेन्सने होते.दुकानाच्या नावाने बँकेत खाते उघडण्यासाठी व व्यायसायिक कर्ज प्रकरणे करण्यासाठी शॉप अधिनियम महत्वाचे दाखला ठरतो. व्यावसायिकाला विविध शासकीय व खाजगी टेंडर / निविदा भरते वेळी व्यवसायच अधिकृत असल्याचे प्रमाणपत्र जरुरी असते.
4 वर्षांपूर्वी -
अनिल देशमुख नॉट रिचेबल असल्याचं वृत्त चुकीचं | सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर ED समोर चौकशीला जाणार
भ्रष्टाचाराच्या प्रकरणात ईडीने देशमुख यांची ४ कोटींची मालमत्ता जप्त केली असून, रविवारी देखील त्यांच्या निवासस्थानी छापे टाकले. या छाप्यानंतर देशमुख यांना अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, अनिल देशमु ‘नॉट रिचेबल’ असल्याची माहिती समोर आली होती. अटकेच्या भीतीने देशमुख गायब झाले असल्याचं बोललं जात असून, ईडीकडून त्यांचा शोध घेतला जात आहे असं वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं होतं.
4 वर्षांपूर्वी -
Pegasus Hacking | फडणवीसांच्या काळात महाराष्ट्रात पेगासस कांड घडले का याची चौकशी करा - काँग्रेस
संसदेचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झालं आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर होत असलेल्या या अधिवेशनात २० बैठका होतील. अधिवेशन १३ ऑगस्टपर्यंत चालण्याची शक्यता आहे. या अधिवेशनात सरकार १७ नवीन विधेयके आणणार असून ती मंजूर करून घेण्याचा पूर्ण प्रयत्न करेल. दुसरीकडे, विरोधकही कोरोना, शेतकरी आणि संरक्षण सेवांमध्ये संपाला गुन्हा जाहीर करण्यासंबंधी अध्यादेशावर सरकारला घेरण्याच्या तयारीत आहे.
4 वर्षांपूर्वी -
'लाव रे तो व्हिडिओ' नंतर राज ठाकरेंचं आता 'बघा रे माझे व्हिडिओ' | 'ते' व्हिडिओ भाजपाला पाठवणार
२०१९ मधील लोकसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जवळपास १० जंगी सभा घेत मोदी सरकारविरोधात ‘लाव रे तो व्हिडिओ’ म्हणत त्यांची पोलखोल केली होती. विशेष म्हणजे मनसेने १० सभांच्या आयोजनावर जेवढी मेहनत आणि पैसा खर्च केला असेल, तेवढा त्यांनी स्वतःच्या पक्षातील किमान २ जागांसाठी जरी जोर लावला असता तर मनसेचा किमान एक खासदार आज लोकसभेत असला असता. मात्र त्यांनी तसे न करता केवळ मोदी विरोधात प्रचार करण्यासाठी जी ताकद आणि अर्थकारण खर्ची घातलं, त्याने त्यांच्याविरोधातच प्रश्न चिन्हं निर्माण झालं होतं.
4 वर्षांपूर्वी -
मुंबईचं गुजरातीकरण? | अदानी एअर पोर्ट होल्डिंगचं मुख्यालय मुंबईत नव्हे तर अहमदाबादमध्ये असेल
गौतम अदानी यांच्या मालकीच्या अदानी समूहाने मुंबई विमानतळाचा कारभार हातात घेतला आहे. गौतम अदानी यांनी ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. मुंबई विमानतळाची शान आणखी वाढवणे हे आमचे आश्वासन आहे आणि ते आम्ही यशस्वीरित्या पूर्ण करु, असे अदानी यांनी ट्विटमध्ये म्हटले. या माध्यमातून देशभरात मोठ्याप्रमाणावर रोजगारनिर्मिती होईल, असा दावाही गौतम अदानी यांनी केला आहे. त्यामुळे भविष्यात का बदल होतात हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
मुंबई चेंबूर, विक्रोळी दुर्घटना | राज्य सरकारकडून मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाखांची मदत जाहीर
देशात मान्सून अधूनमधून सक्रिय होत आहे. या पावसामुळे देशातील अनेक शहरांत कहर निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे, अनेक लोक या पावसाच्या प्रतिक्षेत आहे. मुंबईत गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु आहे. यामुळे शहरातील अनेक भागात पाणीच पाणी साचले असून बस, ट्रेन आणि विमानाच्या उड्डाणावर याचा मोठा परिणाम झाला आहे.
4 वर्षांपूर्वी -
Alert | राज्यांत 2-3 दिवस जोरदार पावसाचा अंदाज | अनेक ठिकाणी पूर, दरडी कोसळण्याचा धोका
देशात मान्सून अधूनमधून सक्रिय होत आहे. या पावसामुळे देशातील अनेक शहरांत कहर निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे, अनेक लोक या पावसाच्या प्रतिक्षेत आहे. मुंबईत गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु आहे. यामुळे शहरातील अनेक भागात पाणीच पाणी साचले असून बस, ट्रेन आणि विमानाच्या उड्डाणावर याचा मोठा परिणाम झाला आहे. मुंबईत सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे चेंबूर आणि विक्रोळी येथे दरड कोसळल्याने यामध्ये 22 लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, 5 घरेही कोसळली आहेत. बचाव कार्य वेगाने सुरु आहे.
4 वर्षांपूर्वी -
राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र येण्याची स्वप्नं पडणं हा आजार आहे - संजय राऊत
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदशाध्यक्षा शरद पवार यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप असं नवीन समीकरण उदयास येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तशा चर्चांनी जोरही धरला आहे. त्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनीच खुलासा केला आहे. अशी स्वप्नं पडणं हा आजार आहे. असे काही होणार नाही. महाविकास आघाडीचं सरकार 5 वर्ष चालेल, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस आणि हायटाईड | दोन भूस्खलनांमध्ये 14 जणांचा मृत्यू
मुंबईत सुरु असलेल्या पावसामुळे शनिवारी रात्री उशिरा झालेल्या दोन भूस्खलनांमध्ये 14 जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी 11 जणांचा चेंबूर भागात तर 3 जणांचा मृत्यू विक्रोळी येथे झाला. 16 लोकांना सुखरूप वाचवण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार पाच घरे कोसळली आहेत. दोन घरांचा ढिगारा काढण्यात आला असून तीन घरांचा मलबा काढणे सुरु आहे. घटनास्थळी उपस्थित एनडीआरएफ टीमचे बचाव कार्य सुरू आहे. पावसामुळे मदत कार्यात अडचणी येत आहेत.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
Reliance Share Price | 31 टक्के परतावा कमाईची संधी, ग्लोबल फर्मने दिले संकेत, पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
-
Vodafone Idea Share Price | हा पेनी स्टॉक अजून घसरणार, ग्लोबल फर्मने दिला अलर्ट, टार्गेट जाणून घ्या - NSE: IDEA