महत्वाच्या बातम्या
-
राज्य सरकारची दिशाभूल करून गृहविभागाकडून फोन टॅपिंगची परवानगी - अहवाल सादर
राज्य गुप्तवार्ता विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांनी सार्वजनिक सुरक्षेला धोका असल्याचे कारण देऊन गृहविभागाकडून फोन टॅपिंगची परवानगी घेतली. मात्र प्रत्यक्षात खासगी व्यक्तींचे फोन टॅप केले. ही बाब उघड होताच शुक्ला यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे माफी मागितली. तसेच फोन टॅपिंगचा अहवाल परत घेण्याची इच्छा व्यक्त केली हाेती. मात्र हा अत्यंत गोपनीय अहवाल शुक्ला यांनीच फोडला, असा संशय असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या अहवालात केला आहे. दरम्यान, याप्रकरणी आता शुक्ला यांच्यामागेच चौकशीचे ‘शुक्लकाष्ठ’ लागण्याची शक्यता आहे.
4 वर्षांपूर्वी -
मुंबईत रहिवाशी इमारतीत लसीकरण मोहिम राबवण्याचा महापालिकेचा विचार
कोरोनाचे रुग्ण वाढत असताना आरोग्य मंत्रालयाने बुधवारी महाराष्ट्र आणि दिल्लीत कोरोनाचा नवा ‘डबल म्युटंट’ व्हेरियंट (प्रकार) सापडल्याचे सांगितले. १८ राज्यांत कोरोनाच्या ३ व्हेरियंटचे ७७१ रुग्ण आढळले आहेत. त्यात ७३६ रुग्ण यूके व्हेरियंट, ३४ रुग्ण दक्षिण आफ्रिकन आणि १ रुग्ण ब्राझिलियन व्हेरियंटचा आहे. हे प्रकार अनेक राज्यांतील १०,७८७ पॉझिटिव्ह नमुन्यांच्या तपासणीत आढळले.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | सचिन वाझे आणि मनसुख 17 फेब्रुवारीला CST स्टेशनच्या बाहेर भेटले
अँटिलिया प्रकरण आणि मनसुख हिरेन यांच्या मृत्यूच्या प्रकरणात कड्या जोडणारे एक CCTV फुटेज समोर आले आहे. यामध्ये दिसतेय की, 17 फेब्रुवारीला वाझे आणि मनसुख यांची भेट झाली होती. CCTV फुटेज CST रेल्वे स्टेशनच्या बाहेरचे आहे. आता तपास यंत्रणांनुसार, या भेटीदरम्यानच मनसुखने स्कॉर्पियोची चावी वाझेला सोपवली होती.
4 वर्षांपूर्वी -
अपक्ष आमदार येड्रावकर यांनी भाजपासोबत राहण्यासाठी रश्मी शुक्लांनी त्यांची भेट घेतली होती
पोलिस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी केलेल्या फोन टॅपिंगमध्ये पोलिसांच्या बदल्या आणि बढत्यांमध्ये आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केल्यामुळे सरकार अडचणीत आल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होती. मात्र, हा डाव आता भाजपवरच उलटणार असल्याची शक्यता डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या ट्वीटमुळे निर्माण झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
फडणवीस म्हणजे तपास यंत्रणा आहेत का? | त्यांनी आरोप केल्यावर कोणालाही दोषी ठरवायचे का?
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शरद पवारांनी युपीएचं नेतृत्व करावं असं विधान केलं आहे. त्यानंतर संजय राऊत यांच्या विधानावर काँग्रेस नेत्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली असून टीका केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीदेखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
4 वर्षांपूर्वी -
त्यांच्याकडून अभ्यास सुरु आहे | बहुधा ते 12 आमदारांच्या नियुक्तीविषयी PhD करत असावेत
महाविकास आघाडी सरकारमधील नेते आज (२५ मार्च) राज्यपालांची भेट घेणार होते. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ही माहिती दिली होती. मात्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी मुंबईत नसल्याने ही भेट टळणार आहे. राज्यपाल कोश्यारी आजपासून २८ मार्चपर्यंत देहरादून येथे असणार आहेत. दरम्यान, राज्यपालांचा हा दौरा पूर्वनियोजित होता. ते २८ मार्चला मुंबईत परततील असे राजभवनाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, त्यामुळे विरोधकांची भेट घेतल्यानंतर सत्ताधारी नेत्यांसोबत राज्यपालांची भेट होऊ शकणार नाही.
4 वर्षांपूर्वी -
फडणवीस हे सह्याद्री आणि मोदींपेक्षाही मोठे नेते | पण मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत
महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे अत्यंत मोठे नेते आहेत. त्यांची उंची सह्याद्री आणि नरेंद्र मोदी यांच्यापेक्षाही मोठी आहे. बहुतेक त्यामुळेच देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री व्हायला जमलं नाही, असा खोचक टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लगावला. देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षनेतेपदाची प्रतिमा मलीन होईल, नष्ट होईल, असे वर्तन करु नये. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार बरखास्त करण्याची वारंवार मागणी करुन ते विरोधी पक्षाचं हसं करत आहेत, अशी टीका देखील खासदार संजय राऊत यांनी केली.
4 वर्षांपूर्वी -
राज्यपालांमार्फत भाजप सत्ता गाजवू इच्छिते | मग लोकशाहीचा मुडदा पडला तरी चालेल - शिवसेना
राज्यपाल हेच सरकार चालवतील असं नवं राष्ट्रीय राजधानी क्षेत्र सुधारणा विधेयक म्हणत असेल तर मग दिल्लीची विधानसभा आणि मुख्यमंत्री हवेतच कशाला ? अशी विचारणा शिवसेनेने केली आहे. महाराष्ट्र असो वा दिल्ली, राज्यपालांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्ष सत्ता गाजवू इच्छिते. त्यासाठी लोकशाहीचा मुडदा पडला तरी चालेल हेच त्यांचे धोरण आहे. दिल्ली विधानसभा आणि मुख्यमंत्र्यांच्या अधिकारांचा कचरा करून केंद्र सरकार एकाधिकारशाहीच्या युगाची तुतारी फुंकत आहे. देशासाठी हे घातक आहे, असं म्हणत आजच्या (२५ मार्च) सामना अग्रलेखातून भारतीय जनता पक्षावर टीका करण्यात आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
परमबीर सिंग यांचे आरोप | निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी होणार - राज्य सरकार
देशमुख यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना महिन्याला १०० कोटी रुपये गोळा करण्याचे टार्गेट दिले होते, असा आरोप परमबीर सिंग यांनी केला होता. त्याप्रकरणी बैठकीत चर्चा झाली. अनिल देशमुख यांनी राजीनामा देण्याची किंवा त्यांचा राजीनामा घेण्याची गरज नसल्याचे मत बैठकीत सर्व मंत्र्यांनी व्यक्त केल्याचे समजते. तसेच या आरोपांत किती तथ्य आहे, याचीही सत्यता आयोगामार्फत तपासली जाणार आहे. ‘कमिशन ऑफ एन्क्वॉयरी ॲक्ट’अंतर्गत ही चौकशी होणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
दूध का दूध, पाणी का पाणी करावे | गृहमंत्री अनिल देशमुख यांचं ट्विट
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांची चौकशी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय. निवृत्त न्यायमूर्तींमार्फत गृहमंत्र्यांची चौकशी केली जाणार आहे. राज्य शासना्च्या या निर्णयानंतर गृहमंत्री देशमुख यांनी ट्विट करत ‘दूध का दूध, पाणी का पाणी करावे’, असं म्हटलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
Covid 19 Updates | देशातील टॉप 10 मध्ये 9 शहरं महाराष्ट्रातील | देशातही रुग्ण वाढ सुरु
महाराष्ट्र आणि गुजरातमधील वाढती रुग्णसंख्या चिंतेचा विषय ठरत चालली आहे. देशात पुन्हा एकदा करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने चिंता वाढली असताना यामध्ये दोन राज्यांमधील परिस्थिती जास्त चिंताजनक आहे. यामध्ये महाराष्ट्राच पहिल्य क्रमांकावर असून देशात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण असणाऱ्या १० जिल्ह्यांपैकी ९ जिल्हे महाराष्ट्रात आहेत. आरोग्य मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांची पत्रकार परिषद पार पडली.
4 वर्षांपूर्वी -
आमदार फुटत नव्हते | अनपेक्षितपणे निवडक IPS अधिकाऱ्यांचं बंड समोर आलं | आधीच भविष्यवाण्या?
राज्य सरकारशी छुपा वाद झाल्याने तीन अतिवरिष्ठ पोलिस अधिकारी गेल्या अडीच महिन्यात प्रतिनियुक्ती तथा डेप्यूटेशनवर केंद्रात गेले आहेत. त्यात राज्याचे पोलिस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल, महासंचालक (नागरी संरक्षण दल) रश्मी शुक्ला आणि डीआयजी मनोजकुमार शर्मा यांचा समावेश आहे. तर, त्यांच्यापेक्षा उघड आणि मोठा जाहीर वाद नाही तर संघर्ष परमबीरसिंह यांचा झाला, असल्याने ते ही केंद्रात डेप्यूटेशनवर जाणार का याकडे लक्ष लागले आहे.
4 वर्षांपूर्वी -
मनसुखच्या मृत्यूचा तपास NIA ला सोपवावा | सेशन कोर्टाचा ATS ला आदेश
अँटिलिया प्रकरणासंबंधीत मनसुख हिरेनच्या मृत्यूच्या प्रकरणात ठाणे सेशन कोर्टाने बुधवारी महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाला (ATS) आदेश दिला की, या प्रकरणाचा तपास थांबवून हा राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA)ला सोपवावा. या प्रकरणात एनआयएने कोर्टाला अपील केले की केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आदेशानंतरही एटीएसने त्याकडे तपास हस्तांतरित केला नाही.
4 वर्षांपूर्वी -
फडणवीसांच्या काळात ते स्वत: न्यायाधीश होते | मंत्र्यांवर आरोप होताच ते क्लीन चीट द्यायचे
फोन टॅपिंग प्रकरणावरुन भाजपकडून राज्य सरकारवर सातत्याने निशाणा साधला जात आहे. दरम्यान आज विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल कोश्यारींची भेट घेत फोन टॅपिंगसह राज्यात सुरू असलेल्या इनतर प्रकरणांमध्ये हस्तक्षेप करण्याची मागणी केली होती. यानंतर पत्रकार परिषदेत फडणवीसांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला होता. तसेच काँग्रेसला या प्रकरणांमध्ये किती हिस्सा मिळतोय असा सवाल त्यांनी केला होता. आता त्यांच्या या सवालाला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
4 वर्षांपूर्वी -
रिपब्लिकला धक्का | यापूर्वीचा दिलासा रद्द | गोस्वामींना अटकेपूर्वी ३ दिवस आधी नोटीस द्यावी - हायकोर्ट
देशातील बहुचर्चित TRP घोटाळ्याप्रकरणी १२ आठवड्यांत तपास पूर्ण करु अशी ग्वाही महाराष्ट्र सरकारने मुंबई हायकोर्टाला दिली आहे. दरम्यान यावेळी हायकोर्टाने रिपब्लिक वाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेसंबंधी महत्वाचे आदेश दिले. मुंबई उच्च न्यायालयाने न्यायालयाने अर्णब गोस्वामी आणि त्यांच्या वृत्त वाहिनीची मालकी असलेल्या एआरजी आउटलियर मीडिया या कंपनीची याचिका दाखल करुन घेतली. मात्र सुनावणीदरम्यान आतापर्यंत कारवाईपासून दिलेला दिलासा न्यायालयाकडून रद्द करण्यात आला. त्यामुळे हा अर्णब गोस्वामींना धक्का मानला जात आहे.
4 वर्षांपूर्वी -
सुप्रीम कोर्टाचा परमबीर सिंग यांच्या याचिकेवर सुनावणीस नकार | हायकोर्टात जाण्याचा सल्ला
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गैरकारभाराविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पदरी निराशा आली आहे. याप्रकरणी तुम्ही मुंबई हायकोर्टात का गेला नाही, असा सवाल करतानाच आधी हायकोर्टात जा, असा सल्ला सुप्रीम कोर्टाने सिंग यांना दिला आहे.
4 वर्षांपूर्वी -
फोन टॅपिंग प्रकरण | भाजपाच्या शिष्टमंडळाकडून राज्यपालांना हस्तक्षेप करण्याची विनंती
अँटिलिया प्रकरण, मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण, मुंबई पोलिसचे माजी कमिश्नर परिमबीर सिंह यांच्या 100 कोटीच्या वसुलीचा आरोप आणि ट्रान्सफरच्या नावावर लाचखोरीच्या आरोपांदरम्यान भारतीयाजनात पक्षाच्या नेत्यांनी राज्यपाल कोश्यारींची भेट घेतली आहे. परमबीर सिंह, ट्रान्सफर वाद आणि सचिन वाझेंच्या प्रकरणात भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी राज्यपालांना हस्तक्षेप करण्यास सांगितले आहे.
4 वर्षांपूर्वी -
...आता फडणवीस पुन्हा कधीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार नाहीत याची मला पूर्ण खात्री आहे - कुणाल कामरा
राज्यातील पोलीस यंत्रणेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या राजकीय व्यक्तींप्रमाणे सुरु असलेल्या हालचाली आणि कृत्यांवरून महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालं आहे. महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्यासाठी राज्याचे माजी मुख्यमंत्री हेच यामागील करविते असल्याचा आरोप सत्ताधारी करत आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात वातावरण निर्माण करताना भाजपने आणि विशेष करून देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेविरुद्ध टोकाच्या भूमिका घेतल्याने शिवसेनेत संताप आहे.
4 वर्षांपूर्वी -
फडणवीस बॉम्ब घेऊन आले | तो भिजलेला लवंगी फटाका निघाला - संजय राऊत
शिवसेना नेते संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहसचिवांना दिलेल्या बदल्यांच्या रॅकेटच्या अहवालाची अक्षरश: खिल्ली उडवली. फडणवीस दिल्लीत बॉम्ब घेऊन आले होते. परंतु तो भिजलेला लवंगी फटका निघाला. त्याला वातही नव्हती, अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी खिल्ली उडवली. तसेच राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख हेच महाराष्ट्राचे गृहमंत्री राहणार असल्याचं स्पष्ट केलं.
4 वर्षांपूर्वी -
ज्या राज्याचे मीठ खातात त्याच राज्याची बदनामी | राजकीय वृत्तीच्या अधिकाऱ्यांवर सेनेचं टोकास्र
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग यांच्या लेटरबॉम्बनंतर फडणवीस यांनी पोलिस बदल्यांसाठी झालेल्या फोन टॅपिंगचा डेटा दिल्याने या डेटा बॉम्बचे हादरे महाविकास आघाडी सरकारला बसले आहेत. मंगळवारी सकाळी भाजप कार्यालयातील पत्रकार परिषद आटोपताच फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना झाले होते. काल त्यांनी केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांची भेट घेऊन अधिकाऱ्यांमधील पत्रव्यवहार असलेला एक बंद लखोटा आणि ६.३ जीबीचा पेनड्राइव्ह त्यांना सूपर्द केला.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Mahindra And Mahindra Share Price | 46 टक्के परतावा मिळेल, भक्कम कंपनी, यापूर्वी दिला 619 टक्के परतावा - NSE: M&M
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL