22 February 2025 1:13 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Home Loan Charges | 90 टक्के पगारदारांना माहित नाही, बँकेतून गृह कर्ज घेताना कोणकोणते चार्जेस वसूल केले जातात 5G Mobile Under 10000 | स्मार्टफोन सॅमसंग Galaxy F06 5G ची भारतात सेल सुरू, किंमत फक्त 10,000 रुपये, इथे पहा ऑफर्स VIDEO | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या त्या कृत्याने टाळ्यांचा कडकडाट, शरद पवारांसोबत कार्यक्रमात हजेरी Bonus Share News | 1 वर 1 फ्री बोनस शेअर देणार ही कंपनी, स्टॉक खरेदीला गर्दी, रेकॉर्ड डेट पूर्वी गुंतवणूकदारांची धावपळ UPI ID | आता UPI द्वारे पेमेंट करताना मोजावे लागतील एक्सट्रा चार्जेस, या गुगल-पे ने केली सुरुवात, अपडेट जाणून घ्या Railway Ticket Booking | ऑनलाइन की काऊंटर रेल्वे टिकीट, दोघांमधील स्वस्त तिकीट कोणते, हे माहित असु द्या Home Loan with SIP | पगारदारांनो, होम लोन EMI सह 15% एसआयपी करा, लोन फिटताच संपूर्ण व्याज वसूल होईल
x

बलात्काराच्या घटना दुप्पट, सरकारला महिलांच्या 'मन की बात' कधी कळणार ?

मुंबई : किती ही सरकार बदलली तरी स्त्रियांवरील बलात्काराच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. विशेष म्हणजे पहिल्या पेक्षा बलात्काराच्या घटनांमध्ये दुपटीने वाढ झाली आहे. तर छेदछाडीच्या घटनेत तब्बल १६५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ही आकडेवारी दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाही तर खुद्द मुंबई पोलिसांनीच दिली आहे.

‘प्रजा’ या एनजीओने हे माहिती अधिकारात उघड केलं आहे. त्यामुळे स्त्रियांसाठी आणि मुलींसाठी परिस्थिती दिवसेंदिवस भयानक होत चालली आहे असेच चित्र आहे. एकट्या मुंबई शहरात २०१२-१३ मध्ये बलात्काराच्या २९३ आणि छेडछाड-विनयभंगाच्या ७९३ घटना घडल्या होत्या. परंतु ५ वर्षात अशा घटनांमध्ये प्रचंड वाढ झाल्याचे आकडेवारी सांगत आहेत. २०१६-१७ या कालखंडात मुबईसारख्या शहरात ५७६ बलात्कार तर २१०३ विनयभंगाच्या घटना घडल्याची धक्कदायक माहिती उजेडात आली आहे. बलात्काराच्या बळी ठरलेल्या एकूण आकडेवारी पैकी ७२ टक्के पीडित मुली ह्या अल्पवयीन आहेत.

मुंबईत गेल्या वर्षीच्या तुलनेत घट झाली असली तरी गेल्या ५ वर्षांमधील आकडेवारीचा विचार करता बलात्काराच्या घटनांमध्ये दुपटीने वाढ झाल्याचे समजते. मिळालेल्या आकडेवारीनुसार २०१२-२०१३ मध्ये बलात्काराच्या एकूण २९४ घटना घडल्या होत्या, तर २०१५-१६ मध्ये हे प्रमाण ७२८ पर्यंत पोहोचलं आहे. परंतु २०१६-१७ मध्ये त्यात घट होऊन ते ५७६ पर्यंत येऊन ठेपले आहे. विशेष म्हणजे बलात्काराच्या बळी ठरलेल्या एकूण आकडेवारी पैकी ७२ टक्के पीडित मुली ह्या अल्पवयीन म्हणजे १२ ते १६ या वयोगटातील आहेत.

एकूणच ही आकडेवारी पाहता सरकार आणि समाज हा स्त्रियांच्या सुरक्षेसंबंधात किती उदासीन आहे हेच या आकडेवारीतून दिसत आहे. पालकांनी त्यांच्या अल्प आणि किशोरवयीन मुलींना घराबाहेर पाठवायचे की नाही हेच पालकांच्या समजण्यापलीकडे गेलं आहे.

बुलेट ट्रेन आणि पुतळ्याचं राजकारण करण्यात व्यस्त असलेल्या सरकारला ‘जिवंत स्त्रियांचं’ दुःख कळणार तरी कधी असा प्रश्न विचारला जात आहे. किंबहुना स्त्री सुरक्षेचा प्रश्न गांभीर्याने बघणारा असा नेता आहे का कुणी राज्यात असा प्रश्न अनेक स्त्रिया करत आहेत.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x