22 February 2025 2:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | नशीब आणि आकड्यांचा खेळ, अंकज्योतिषशास्त्रानुसार 16 फेब्रुवारी तुमचा रविवारचा दिवस कसा असेल IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी होईल मोठी कमाई, अशी संधी सोडू नका - IPO Watch SBI Home Loan | SBI बँकेतून 25 लाखांचे होम लोन 15 वर्षांसाठी घेतले तर, किती रुपयांचा मासिक EMI भरावा लागेल, येथे पहा Smart Investment | पगारदारांनो, पैसे बँकेत ठेऊन वाढत नसतात, या योजनेत महीना 5000 रुपये बचत देईल 2.5 कोटी रुपये परतावा Improve Credit Score | प्रत्येक बँक कर्ज देण्यास टाळाटाळ करतेय, करा केवळ एक काम, मिनिटांत मिळेल कर्ज Home Loan Charges | 90 टक्के पगारदारांना माहित नाही, बँकेतून गृह कर्ज घेताना कोणकोणते चार्जेस वसूल केले जातात 5G Mobile Under 10000 | स्मार्टफोन सॅमसंग Galaxy F06 5G ची भारतात सेल सुरू, किंमत फक्त 10,000 रुपये, इथे पहा ऑफर्स
x

मुंबई पावसाळ्यात तुंबणार, सेना-भाजपमध्ये आतापासूनच खडाजंगी ?

मुंबई : शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखातून उद्धव ठाकरेंनी भाजपावर निशाणा साधला आहे. अग्रलेखातील टीकेमुळे भाजप शिवसेनेमध्ये पुन्हां जुंपण्याची शक्यता आहे. मुंबईमध्ये मेट्रोचे काम मोठ्या प्रमाणावर सुरु असून त्यासाठी मोठयाप्रमाणावर खोदकाम करण्यात येत आहे. परंतु एक दीड महिन्यावर येऊन ठेपलेल्या पावसामुळे मुंबई महानगरपालिका टीकेचे लक्ष होऊ शकते हे ध्यानात घेऊन शिवसेनेने भाजपला आधीच लक्ष करायला सुरुवात केली आहे.

येत्या पावसाळ्यात मुंबई २०० ठिकाणी तुंबणार हे सत्य बाहेर आल्याने नंतर मुंबई महापालिकेला दोष नको म्हणून शिवसेनेने आता पासूनच सर्व जवाबदारी राज्यसरकारच्या मेट्रो प्रकल्पाच्या कामावर ढकलली आहे. परंतु मेट्रो प्रकल्प सुद्धा भाजप शिवसेना सरकारचाच प्रकल्प आहे याकडे पद्धतशीर कानाडोळा केला आहे. मुंबई मेट्रोच्या खड्ड्यांमुळे शहरात पाणी तुंबल्यास त्याची संपूर्ण जवाबदारी मुख्यमंत्री आणि महापालिका आयुक्तांना घ्यावी लागेल असं अग्रलेखात मत व्यक्त करण्यात आलं आहे. मुंबई शहरावर लादलेले मेट्रोचे स्वप्न सुद्धा अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेनप्रमाणे फसवे आहे. कोणतीही गरज नसताना भाजपने हे उद्योग सुरु केल्याचे सामनात म्हटले आहे.

काय म्हटलं आहे सामना अग्रलेखात?

मुंबईच्या खड्डय़ांची चर्चा सुरू होते व खड्डय़ांचे खापर मुंबई महानगरपालिकेवर फोडून इतर सर्व बाजारबुणगे आडास तंगडय़ा लावून बसतात. पण आता या सगळय़ांच्या कानाखाली मुंबई हायकोर्टानेच आवाज काढला आहे आणि ‘मुंबईचे रस्ते कोणाच्या आदेशाने खोदताय’, असा सवाल त्या मेट्रोवाल्यांना केला आहे. विकासाच्या नावाखाली आधी मोनो रेलने मुंबईत जागोजागी खड्डे केले व आता मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या मेट्रो प्रकल्पाने मुंबईभर भर उन्हाळय़ात चिखल व खड्डय़ांचे साम्राज उभे केले आहे.

त्यामुळे सामान्य मुंबईकरांची दिवसभर जी वाहतूककोंडी हेत आहे त्या कोंडीचे रूपांतर पावसाळय़ात जबडा वासलेल्या अक्राळविक्राळ मगरीत होणार अशी भीती आम्हास वाटते. एम.एम.आर.डी.ए. नावाची बाजारबसवी मुंबई महानगरपालिकेच्या छाताडावर आणून बसवल्यापासून मुंबईचे हाल हे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांप्रमाणे झाले. म्हणजे मुंबईकरांना जगणे कठीण झाले आहे.

गरज नसताना सुरू केलेले हे नसते उद्योग आहेत. विकासाच्या नावाखाली मुंबईच्या रस्त्यांवर सरकारने अराजक निर्माण केले आहे. मेट्रोचे स्वप्न हे अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेनप्रमाणेच फसवे आहे. पालघरच्या शेतकऱ्यांनी बुलेट ट्रेनच्या जमीन संपादनासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना पळवून लावले. असा हिसका मेट्रोच्या अधिकाऱ्यांना आम्हीही मुंबईत दाखवू शकलो असतो, पण काही घडतंय ते बिघडवण्याची आमची वृत्ती नाही. पावसाळय़ात तुंबणाऱ्या मुंबईची जबाबदारी सरकार, त्यांचे मेट्रो कॉर्पोरेशन घेणार नसेल तर महापालिका आयुक्त अजोय मेहता कर्तव्यदक्षतेची किती उसळी मारतात ते आता पाहायचे. मेट्रेाच्या खड्डे शाहीविरोधात आयुक्तांनी आवाज द्यावा, शिवसेना त्यांच्या पाठीशी राहील.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x