राज्यपालांकडून दुजाभाव; भाजपाला ७२ तासांचा तर सेनेला २४ तासांचा अवधी दिला: संजय राऊत

मुंबई: शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रपतींकडून आम्हाला सत्ता स्थापन करण्यास कमी कालावधी मिळाल्याचं म्हटलं आहे. राष्ट्रपतींनी भारतीय जनता पक्षाला ७२ तासांचा अवधी दिला होता. पण, शिवसेनेला केवळ २४ तासात सरकार स्थापन करण्यास सांगण्यात आले आहे. वास्तविक राज्यातील परिस्थिती पाहता, आम्हाला जास्त वेळ देणं गरजेचं होतं, पण तसं झालं नाही, असे म्हणत राऊत यांनी दुजाभाव झाल्याकडे लक्ष वेधलं.
राज्यातील जनतेने महायुतीला जनादेश दिला असताना युतीची सत्ता राज्यात स्थापन न होण्याबाबत भारतीय जनता पक्षाने शिवसेनेवर खापर फोडू नये असे राऊत म्हणाले. ही स्थिती भारतीय जनता पक्षाच्या अहंकारामुळे निर्माण झाली असल्याचे म्हणत राऊत यांनी या परिस्थितीसाठी भारतीय जनता पक्षच जबाबदार असल्याचे म्हटले आहे. शिवेसेनेविरुद्ध मोठे षडयंत्र रचले गेले असल्याचेही ते म्हणाले.
राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा आणखी वाढला आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचा होईल. शिवसेनेला मुख्यमंत्रिपद मिळू नये वेळेप्रसंगी विरोधी पक्षात बसू असं षडयंत्र भारतीय जनता पक्षचं शिवसेनेविरोधात आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे देशद्रोही नाही, सर्व पक्षाचे अन् नेत्यांचे राज्यासाठी आणि देशासाठी योगदान राहिलं आहे. सगळ्या नेत्यांच्या एकमेकांशी संवाद सुरु आहे. राजकीय स्थितीचं भान सगळ्यांना आहे. हे महाराष्ट्र राज्य आमचं आहे. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे ही राजधानी ताब्यात राहावी असं कारस्थान सुरु आहे असाही आरोप खासदार संजय राऊतांनी केला आहे.
Sanjay Raut, Shiv Sena on Governor’s invite to Shiv Sena to ‘indicate willingness to form govt in Maharashtra’: It would have been easy if Governor had given us more time.BJP was given 72 hrs;we’ve been given lesser time. It’s a strategy of BJP to impose President’s rule in state https://t.co/Je9QGtaafX pic.twitter.com/I45sOCAw6n
— ANI (@ANI) November 11, 2019
Maharashtra: Shiv Sena leader Sanjay Raut arrives at party chief Uddhav Thackeray’s residence in Mumbai. pic.twitter.com/q4enQZqU0X
— ANI (@ANI) November 11, 2019
राज्यात अस्थिरता राहू नये. राष्ट्रपती राजवटी आणण्याचा प्रयत्न होतोय. त्याला आव्हान द्यावं यासाठी शिवसेना काँग्रेस, राष्ट्रवादी यांचं एकमत आहे. तत्वाच्या गोष्टी आम्हाला सांगू नये, भाजपा पीडीपी युती लव्ह जिहाद होता का?,” असा सवाल राऊत यांनी केला आहे.
दरम्यान, राज्यपाल कोश्यारी यांनी आम्हाला अधिक वेळ देण्याची गरज होती असे सांगताना काही लोकांना राज्याला राष्ट्रपती राजवटीत ढकण्याचा प्रयत्न असल्याचे सांगत राऊत यांनी अप्रत्यक्षपणे भारतीय जनता पक्षावर टीका केली आहे. राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीचा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपल्या सद्सदविवेक बुद्धीने विचार करून योग्य निर्णय घ्यावा, असे आवाहन आपण दोन्ही पक्षांना करत असल्याचे राऊत म्हणाले.
Delhi: Senior Congress leaders Ahmed Patel, KC Venugopal, and Mallikarjun Kharge arrive for Congress Working Committee (CWC) meeting at party interim President Sonia Gandhi’s residence, over the political situation in Maharashtra. https://t.co/6AYpQXMdc0 pic.twitter.com/cLpWEeHb5X
— ANI (@ANI) November 11, 2019
आघाडीसोबत शिवसेना स्थिर सरकार देणार असून शेतकरी, शिक्षण, रोजगार अशा मुद्द्यांवर एकत्र येण्याचे काम सुरु असल्याचे संजय राऊत म्हणाले. किमान समान कार्यक्रमाच्या आधारावर सरकार स्थापन होईल असेही ते म्हणाले. भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री होऊ नये असे कालपर्यंत अनेक पक्ष म्हणत होते. आता त्यांच्यासाठी वेळ आली आहे. त्यामुळे काँग्रेस-एनसीपीने योग्य निर्णय घ्यावा असं आवाहन देखील खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
Vedanta Share Price | यापूर्वी 10,623 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: VEDL
-
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: YESBANK
-
Vodafone Idea Share Price | हा पेनी स्टॉक अजून घसरणार, ग्लोबल फर्मने दिला अलर्ट, टार्गेट जाणून घ्या - NSE: IDEA