22 February 2025 9:46 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Home Loan Charges | 90 टक्के पगारदारांना माहित नाही, बँकेतून गृह कर्ज घेताना कोणकोणते चार्जेस वसूल केले जातात 5G Mobile Under 10000 | स्मार्टफोन सॅमसंग Galaxy F06 5G ची भारतात सेल सुरू, किंमत फक्त 10,000 रुपये, इथे पहा ऑफर्स VIDEO | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या त्या कृत्याने टाळ्यांचा कडकडाट, शरद पवारांसोबत कार्यक्रमात हजेरी Bonus Share News | 1 वर 1 फ्री बोनस शेअर देणार ही कंपनी, स्टॉक खरेदीला गर्दी, रेकॉर्ड डेट पूर्वी गुंतवणूकदारांची धावपळ UPI ID | आता UPI द्वारे पेमेंट करताना मोजावे लागतील एक्सट्रा चार्जेस, या गुगल-पे ने केली सुरुवात, अपडेट जाणून घ्या Railway Ticket Booking | ऑनलाइन की काऊंटर रेल्वे टिकीट, दोघांमधील स्वस्त तिकीट कोणते, हे माहित असु द्या Home Loan with SIP | पगारदारांनो, होम लोन EMI सह 15% एसआयपी करा, लोन फिटताच संपूर्ण व्याज वसूल होईल
x

कोरोनाविरुद्धचा लढा गंभीरपणे घ्या; मुख्यमंत्र्यांची विनंती आणि इशारा देखील

CM Uddhav Thackeray, Corona Crisis

मुंबई, २३ मार्च: कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सरकार शर्थीचे प्रयत्न करत असूनही यावर नियंत्रण मिळवणे दिवसेंदिवस कठीण जाताना दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी देशभरात ‘जनता कर्फ्यू’चे आवाहन केले होते. त्याला चांगला प्रतिसादही मिळाला होता. दरम्यान, राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली आहे. राज्यात रविवारी कोरोना विषाणूचे १५ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री कार्यालयाने देखील लोकांना गंभीर इशारा दिला आहे. ट्विट करताना मुख्यमंत्री कार्यालयाने म्हटलं आहे की, “कोरोनाविरुद्धचा लढा गंभीरपणे घ्या. स्वतःच्या आणि दुसऱ्यांच्या आरोग्याशी खेळू नका. १४४ कलम लावले आहे त्यामुळे केवळ अत्यावश्यक सेवाच सुरू राहतील. रस्त्यांवर वाहने आणून गर्दी करून कायदा मोडू नका.

दरम्यान, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नागरिकांनी शिस्तीचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. यापूर्वीचे जे कोरोना विषाणूचे रुग्ण होते. त्यांचे निकटवर्तीयच नवे रुग्ण आहेत, असे राजेश टोपे यांनी म्हटले आहे. हा विषाणू समाजात पसरलेला नाही, त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन ही त्यांनी केली आहे.

 

News English Summery:  Despite the government’s diligent efforts to prevent the Corona virus infection, controlling it seems increasingly difficult. Prime Minister Narendra Modi on Sunday called for a ‘Janata curfew’ across the country. He also had a good response. Meanwhile, the number of coroners in the state has increased. The state has reported 15 new cases of corona virus on Sunday. So there is only one excitement. Meanwhile, the Chief Minister’s Office has also given serious warning to the people. In the tweet, the Chief Minister’s office said, “Take the fight against Corona seriously. Don’t play against yourself and others’ health. The 144 clause is imposed so that only essential services will continue.

 

News English Title:  Story Chief Minister Uddhav Thackeray made alert to Peoples over Corona Crisis issue News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x