कोरोना काळजी! मुंबईकरांचं दुर्लक्ष, समूहात मॉर्निंग वॉक आणि सूट्टीतलं क्रिकेट सुरूच

मुंबई, २१ मार्च: देशात, तसेच राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशा परिस्थितीत केंद्र आणि राज्य सरकारने अनेक महत्त्वाची पावले उचलली आहे. राज्यातही सरकारनं महत्त्वाच्या सेवा सोडून सर्वकाही बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, राज्यात करोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होऊन ती ६३ वर पोहोचल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार, महाराष्ट्रात आज २१ मार्च रोजी एकूण रुग्णांची संख्या ही ६३ वर पोहोचली आहे. शुक्रवारीही संख्या ५२ वर होती. त्यामुळे गेल्या २४ तासांत ११ नवीन रुग्ण आढळून आल्याची बाबसमोर आली आहे. भारतात देखील कोरोना व्हायरस हळूहळू पाय पसरवत आहे. आतापर्यंत भारतात जवळपास २५० लोकांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. या महामारीला रोखण्यासाठी भारतातील अनेक शहरांमध्ये मॉल, सिनेमागृह आणि गर्दीची ठिकाणं बंद ठेवण्यात आली आहेत. अनेक शहरं पुढील काही दिवस बंद राहणार आहेत.
कोरोना व्हायरसवर अजून कोणतीही लस मिळालेली नाही. जगभरातील देश यावर लस शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे सध्या तरी या व्हायरसच्या संपर्कात येवू नये इतकंच करता येवू शकतं. भारतात कोरोना सध्या दुसऱ्या टप्प्यात आहे. दुसऱ्या टप्प्यातच याचा नाश करण्याचा भारत सरकारचा प्रयत्न आहे. कारण तिसऱ्या टप्प्यात हा पोहोचला तर याला थांबवणं कठीण होणार आहे.
मात्र मुंबईकर अनेक ठिकाणी सरकारच्या सूचनांना पायदळी तुडवत असल्याचं पाहायला मिळत आहे. अगदी मुंबईतील प्रसिद्ध छत्रपती शिवाजी पार्क मैदानाभोवती देखील मोठ्या प्रमाणावर स्थानिक लोकं सकाळी मॉर्निंग वॉक करताना दिसले तर सुट्टीच्या बहाण्याने कंपनीतील मित्र मंडळी क्रिकेटचा आनंद लुटणं दिसत आहेत. त्यामुळे लोकांना या भीषण आपत्तीबद्दल किती गांभीर्य आहे याचा प्रत्यय येतो. त्यामुळे सरकारने आता धाडसी निर्णय घेऊन कोरोना राज्यात तिसऱ्या टप्प्यात पोहोचण्यापासून रोखणं गरजेचं आहे असंच मत व्यक्त होताना दिसत आहे.
Maharashtra: People walked, did physical exercise & played cricket at Chhatrapati Shivaji Maharaj Park in Mumbai today morning even as Prime Minister Narendra Modi & Chief Minister Uddhav Thackeray have appealed to people to avoid gathering at public places. #CoronavirusPandemic pic.twitter.com/Tbpd0dDo8b
— ANI (@ANI) March 21, 2020
News English Summery: According to a PTI news release, the total number of patients has reached 63 on March 21 in Maharashtra. Friday was also at 52. Therefore, in the last 24 hours, 11 new patients have been reported. In India too, the corona virus is spreading slowly. So far, around 250 people have been reported to have coronary infection in India. In many cities of India, malls, cinemas and crowded places have been closed to prevent this epidemic. Many cities will be closed for the next few days. However, in many places, it is seen that the suggestions of the government are being disobeyed. Even around the famous Chhatrapati Shivaji Park grounds in Mumbai, a large number of locals were seen doing Morning Walk in the morning while the friends of the company were seen enjoying the cricket with holiday excuses. So people realize how serious this disaster is. Therefore, it seems that the government is taking bold decisions and preventing them from reaching the third stage in the state of Corona.
News English Title: Story even after state government instructions Mumbaikars never following request News latest updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल