8 September 2024 7:08 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | स्वस्त IPO आला रे! पहिल्याच दिवशी मिळेल मोठा परतावा, मोठ्या कमाईची संधी सोडू नका - Marathi News Numerology Horoscope | रविवार 08 सप्टेंबर 2024 | जन्म तारीख आणि अंकज्योतिषशास्त्रानुसार दिवस कसा असेल? - Marathi News Ajay Devgn | 'या' चित्रपटामुळे अजयचं करीयर डुबता-डुबता राहिलं; स्वतः बद्दलचा एक खुलासा - Marathi News Horoscope Today | रविवार 08 सप्टेंबर, 'या' 4 राशींना मिळू शकते खुशखबर, वाचा तुमचं 8 सप्टेंबरचं राशीभविष्य -Marathi News Reliance Share Price | रिलायन्स शेअर्स गुंतवणूकदार मालामाल होणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - Marathi News Credit Card | क्रेडिट कार्डला कंटाळले आहात? फॉलो करा या 5 स्टेप्स, क्रेडिट कार्ड बंद होईल - Marathi News Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर काय परिणाम होणार? - Marathi News
x

मुळ घरी परतण्यासाठी वांद्रे स्थानकाबाहेर हजारोंच्या संख्येने कामगारांची गर्दी

Corona Crisisi, Covid 19

मुंबई, १४ एप्रिल: देशभरात लॉकडाऊन सुरु असताना आणि कोरोना व्हायरसची दहशत असताना मुंबईतील वांद्रे स्थानकाबाहेर मात्र दुपारनंतर हजारोंच्या संख्येने कामगारांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. मुळचे उत्तर प्रदेश, बिहार येथील हे कामगार त्यांच्या मुळ ठिकाणी पोहोचण्यासाठी येथे जमले होते.

पंतप्रधानांनी २१ दिवसांपूर्वी लागू केलेल्या देशव्यापी लॉकडाऊनचा आजचा शेवटचा दिवस. पण, कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता देशातील लॉकडाऊनचा कालावधी आणखी काही दिवसांसाठी वाढवण्यात आला आहे. आता ३ मे रोजी लॉकडाऊन शिथिल केला जाईल असं सांगण्यात आलं. त्यामुळे घरी जाण्याची आशा मनी बाळगून आलेल्या या कामगारांचा उद्रेक यावेळी उडाल्याचं पाहायला मिळालं.

सायंकाळी चार वाजताच्या सुमारास हजारो मजुरांनी वांद्रे स्टेशनबाहेर जमा होत ठिय्या दिला व आम्हाला गावी जाण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी लावून धरली. सुमारे दीड तास या मजुरांचे ठिय्या आंदोलन सुरू होते. ही स्थिती चिघळू नये म्हणून पोलिसांची अतिरिक्त कुमक मागवण्यात आली. गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी प्रथम आवाहन केले. त्यानंतर सौम्य लाठीमारही केला. तुम्ही जिथे आहात तिथेच राहणं तुमच्या हिताचं आहे. राज्य सरकार तुमची सर्व व्यवस्था करत आहे आणि यापुढेही करणार आहे, असे सांगत पोलिसांनी लोकांची समजूत घातली.

लॉकडाऊनमुळे सर्व प्रकारची प्रवासी वाहतूक सध्या बंद आहे. रेल्वेसेवा ठप्प आहे. राज्यांच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आधीपासूनच अन्य राज्यांतून रोजगारासाठी मुंबईत आलेले हजारो मजूर मुंबईत अडकून पडलेले आहेत. आज मध्यरात्रीनंतर किमान राज्यांच्या सीमा उघडतील वा इथे अडकलेल्यांना आपापल्या गावी जाण्याची परवानगी मिळेल, अशी आशा अनेकांना होती.

 

News English Summary: Thousands of laborers gathered outside Bandra station around 4 pm and demanded that we be allowed to go to the village. About an hour and a half, these laborers start their agitation. Additional police were called in to prevent the situation. Police first appealed to the crowd to be controlled. Subsequently, he made gentle sticks. It is in your best interests to stay where you are. The state government is making all your arrangements and will continue to do so, police said.

News English Title: Story Mumbai crowd laborers gathered at Bandra station to way back home amid Corona virus outbreak Covid 19 News Latest updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x