17 April 2025 11:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | पैसे बचत करून वाढणार नाहीत, तर अशाप्रकारे स्मार्ट बचत करून वाढवा, मिळेल 1 कोटी रुपये परतावा Gratuity Money Alert | तुमचा पगार किती आहे? तुमच्या शेवटच्या पगारानुसार कंपनी एवढी ग्रॅच्युटी रक्कम देणार, अपडेट जाणून घ्या EPFO Money Alert | खाजगी कंपनी पगारदारांसाठी अपडेट, EPFO खात्यातून 5 लाखांपर्यंतची रक्कम ऑटो सेटलमेंट काढता येणार Horoscope Today | 18 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 18 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Yes Bank Share Price | येस बँकेचा पेनी स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी सांगितली टार्गेट प्राईस - NSE: YESBANK Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिली महत्वाची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATAMOTORS
x

वेळ निघून गेली आहे, तेव्हा त्या हाताला प्रेमानं थोपटण्याऐवजी झिडकारण्याचा प्रयत्न झाला - सुभाष देसाई

MahaVikas Aghadi, Industrial Minister Subhash Desai, BJP

मुंबई, ३१ जुलै : आपल्याला कोरोनासोबत जगावं लागेल. कोरोनाचं एका बाजूला व्यवस्थापन करावं लागणार आहे तर दुसऱ्या बाजूला अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत, असं उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी म्हटलं आहे. ते एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझा व्हिजन या कार्यक्रमात बोलत होते. सगळ्या बाजारपेठा खुल्या करा अशी मागणी व्यापारी करत आहेत, त्यांची ही मागणी चुकीची नाही. कोरोनाचं संकट गंभीर मात्र उद्योग सुरु करावे लागतील, असं सुभाष देसाई यांनी म्हटलं आहे.

यावेळी सुभाष देसाई म्हणाले की, उद्योग विभागानं उद्योगांना चालना देण्यासाठी चांगल्या सुविधा द्यायला सुरु केल्या आहेत. एमआयडीसीने उद्योजकांना तयार शेड देण्याची तयारी केली आहे. नवीन गुंतवणूकदारांना उद्योगमित्र उपलब्ध करुन देणार आहोत. महापरवाना ही योजना सुरु केली आहे. ४८ तासात उद्योगासाठी परवानगी देण्यात येईल, म्हणजे तात्काळ त्यांना उत्पादन घेता येऊ शकेल. महाजॉब्स ही देखील चांगला उपक्रम आपण सुरु केला आहे. याला युवकांचा प्रतिसाद करतोय.

दरम्यान, राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी करण्यात येणाऱ्या औद्योगिक उपाययोजनांची माहिती सुभाष देसाई यांनी एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझं व्हिजन या कार्यक्रमात दिली. यावेळी देसाई यांना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानासंबंधी प्रश्न विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना देसाई म्हणाले, “नाही. ती वेळ आता निघून गेली. जेव्हा हात पकडलेलाच होता, तेव्हा त्या हाताला प्रेमानं थोपटण्याऐवजी त्या हाताला झिडकारण्याचा प्रयत्न झाला. त्रास देण्याचा प्रयत्न झाला. तेव्हा ती वेळ गेलेली आहे. आता नको. आता त्याऐवजी आम्ही तीनजण एकत्र येऊन, परस्परांवर विश्वास ठेवून तीन पक्षांचं सरकार चांगलं काम करतंय आणि पुढची दिशा ठरलेली आहे. त्यामुळे त्याच दिशेनं आम्ही पुढं जाणार. जुन्या मित्रांना त्यांचा जो काही मार्ग असेल… त्यांनी ते कबूल केलेलं आहे की, आम्ही आता एकटे लढणार. माझ्या शुभेच्छा आहेत, त्यांना. अर्थात त्यांच्या बरोबरचे काही पक्ष जवळ आलेले होते. आठवले, जानकर, सदाभाऊ खोत याचं काय होणार माहिती नाही. कारण भाजपा एकटं लढणार आहे. आम्ही तिघे एकत्र आहोत आणि एकत्र राहणार,” असं देसाई म्हणाले.

 

News English Summary: Desai was asked about the statement made by BJP state president Chandrakant Patil. Replying to him, Desai said, no. That time is now gone. When he was holding the hand, instead of patting it lovingly, he tried to shake it.

News English Title: We Will Not Alliance With BJP said Industrial Minister Subhash Desai News latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#MahaVikasAghadi(137)#SubhashDesai(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या