19 April 2025 12:40 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HUDCO Share Price | तब्बल 852 टक्के परतावा देणारा सरकारी कंपनीचा शेअर, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO TTML Share Price | टाटा ग्रुपचा स्वस्त शेअर, यापूर्वी 2393% परतावा दिला, पेनी स्टॉक टार्गेट नोट करा - NSE: TTML JSW Steel Share Price | हा स्टील कंपनीचा स्वस्त शेअर खरेदी करा, BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JSWSTEEL HFCL Share Price | कंपनीत रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी, 83 रुपयाचा शेअर फोकसमध्ये, फायद्याची अपडेट - NSE: HFCL Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट PPF Investment | पगारदारांनो, या सरकारी योजनेत वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या बचत करा, तब्बल 1.5 कोटी रुपये परतावा मिळेल
x

विधिमंडळातील घोषणाबाजी पेक्षा मोदींकडे राज्याच्या हक्काचे १४,६०० कोटी मागा: जयंत पाटील

Minister Jayant Patil, Opposition Leader Devendra Fadnavis, Chief Minister Uddhav Thackeray

नागपूर: हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून भारतीय जनता पक्षाने विधानसभेत गदारोळ केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्तेत आल्यास शेतकऱ्यांना २५ हजार रुपये हेक्टरी मदत देण्याची आश्वासन दिले होते. त्यामुळे त्यांनी शब्द पाळून शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी अशी मागणी करत भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी सभागृहात गोंधळ घातला. यावेळी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या आमदारांमध्ये खडाजंगी झाली. त्यानंतर, अर्थमंत्री जयंत पाटील यांनी पुढाकार घेत दोन्ही आमदारांमध्ये समन्वय साधला. त्यानंतर, यांनी फडणवीसांनाच प्रश्न विचारले.

तत्पूर्वी, विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू असताना सभागृहात धक्कादायक प्रकार घडला आहे. शेतकरी प्रश्नावरून चर्चा सुरू असताना शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या आमदारांमध्ये थेट हाणामारी झाली आहे. शिवसेनेचे बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड आणि भारतीय जनता पक्षाचे आमदार अभिमन्यू पवार या दोघांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याचं पाहायला मिळालं.

दरम्यान, राज्य सरकारने अवकाळग्रस्त शेतकऱ्यांसाठी ६६०० कोटी रुपयांची मदत दिली आहे. त्यातले २१०० कोटी रुपये जिल्ह्यांपर्यंत पोहचले आहेत. तुम्हाला खरंच शेतकऱ्यांची काळजी असेल तर केंद्राकडून राज्य सरकारचे पैसे मागावेत. राज्य सरकारचे १४,६०० कोटी केंद्राने अडवले आहेत. फडणवीस यांनी विधिमंडळ सभागृहात घोषणाबाजी करण्यापेक्षा मोदींकडे पैसे देण्याची विनंती करावी, असेही अर्थमंत्री जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

 

Web Title:  Demand Rupee 14600 Crore from PM Narendra Modi says Minister Jayant Patil to Devendra Fadanvis ove Farmer issue.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)#JayantPatil(73)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या