22 February 2025 7:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या Railway Confirm Ticket | रेल्वेची तिकिट कन्फर्म आणि ट्रेन सुटली, तुम्ही दुसऱ्या ट्रेनने प्रवास करू शकता का? नियम लक्षात ठेवा Credit Card EMI | क्रेडिट कार्डच्या मोठ्या बिलाचे EMI मध्ये रूपांतर कसे करावे? थकीत रक्कम भरणे सोपे होईल Numerology Horoscope | नशीब आणि आकड्यांचा खेळ, अंकज्योतिषशास्त्रानुसार 16 फेब्रुवारी तुमचा रविवारचा दिवस कसा असेल IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी होईल मोठी कमाई, अशी संधी सोडू नका - IPO Watch
x

'ते' दत्तक गाव मुख्यमंत्र्यांच, तर दुष्काळात मदतीची जवाबदारी स्वीकारली मनसेने

MNS, Raj Thackeray, Devendra Fadanvis, Loksabha Election 2019

नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा प्रचारादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमधील दत्तक घेतलेल्या त्रंबकेश्वर येथील बर्डेवाडी (खोडाला तालुका) येथील दुष्काळामुळे ओढवलेलं वास्तव लाव रे तो व्हिडिओ म्हणत जनतेसमोर मांडलं होतं. दरम्यान या गावातील महिला चक्क खोलवर विहिरीत उतरून हंडाभर पाण्यासाठी जीव मुठीत टाकत असल्याचं वास्तव अनेक वृत्त वाहिन्यांच्या विशेष वृत्तात समोर आलं होतं.

मात्र प्रचाराच्या शेवटच्या दिवशी स्वतःला महान दाखवण्यासाठी राज ठाकरे यांना प्रतिउत्तर देण्यासाठी भाजपने केविलवाणा प्रयत्न केला खरा, मात्र सत्ताधारी म्हणून कोणतीही जवाबदारी त्यांनी स्वीकारली नाही. त्यात मुंबई भाजपचे अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका करताना त्यांनी कधी शिवाजी पार्क येथील झाड तरी दत्तक घेतलं होतं का, असा प्रतिप्रश्न उपस्थित केला होता. मात्र जमिनीवर त्याच राज ठाकरे यांचा मनसे पक्ष आणि त्यांचे कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या गावाची जवाबदारी दुष्काळ काळात स्वीकारत आहेत.

२६ एप्रिलला नाशिकच्या सभेमध्ये राज ठाकरे यांनी नाशिकच्या त्रंबकेश्वर येथील बर्डेवाडी खोडाला गाव जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतले दाखवले आणि त्या गावातील महिला हंडाभर पाण्यासाठी कशा वणवण फिरतायत आणि जीव धोक्यात घालून विहिरीतून पाणी काढतानाचे व्हिडिओ दाखवले आणि मुख्यमंत्रीची फसवेगिरी जनतेसमोर मांडली होती. त्यानंतर राज ठाकरे यांनी मनसे सरचिरणीस आणि कामगार सेनेचे अध्यक्ष मनोज चव्हाण यांना या गंभीर विषयात लक्ष देण्याचे आदेश दिले. त्यानंतर २००० लिटरच्या टाक्या आणि पाण्याचे टँकर्स १ मे २०१९ पासून ते पाऊस पडे पर्यंतची जवाबदारी त्यांनी स्वकारली आणि प्रत्यक्ष कामाला लागले. त्यानुसार सरचिटणीस मनोज चव्हाण यांच्याकडुन गावात सर्व सामुग्री पोहोचण्यास सुरुवात झाली आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x