23 February 2025 7:43 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

ते कधीच 'वाजपेयी सरकार' म्हणून जगले नाही, तर एनडीए'ची टीम म्हणूनच जगले

नवी दिल्ली : १९९८ मध्ये अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना त्यांच्याच काळात राजस्थानमधील पोखरण येथे अणुचाचणी करण्यात आली होती आणि त्यानंतर संपूर्ण जगाला म्हणजे अगदी अमेरिकेच्या सीआयए’ला सुद्धा त्या अणुचाचणीचा सुगावा लागला नव्हता. तो विषय अणुशास्त्रज्ञ ए. पी. जे. अब्दुल कलाम, स्वतः अटलबिहारी वाजपेयी, तत्कालीन संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस आणि भारतीय लष्कर अशा ‘टीम’ने नियोजन पद्धतीने हाताळला होता.

त्यानंतर पाकिस्तानच्या कुरघोडी वाढत असताना ३ मे १९९९ रोजी अखेर पाकिस्तानने कारगिलच्या मुद्याला धरून थेट युद्धच पुकारलं होत. त्यानंतर हे युद्ध जवळपास अडीच महिने पेटलं आणि २६ जुलै १९९९ रोजी भारतीय जवानांनी कारगिलवर तिरंगा झेंडा फडकावून पाकिस्तानची मस्ती जिरवली होती.

त्या कारगिल युद्धात भारताचे ५२७ वीर जवान शहिद झाले होते तर १३०० हून अधिक जवान जखमी झाले होते. त्यावेळची आतंरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा वाजपेयीनीं मुसद्दीपणा दाखवत पाकिस्तानला जेरीस आणलं होत. भारतीय जवानांचे आणि जनतेचे मनोधैर्य उंचावण्यासाठी आणि देशाचे प्रतिनिधी म्हणून संतापलेल्या पंतप्रधान वाजपेयीनीं थेट पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांना दूरध्वनी करून खडे बोल सुनावले होते आणि तुम्ही संबंध द्रुढ करण्यासाठी एकाबाजूला आम्हाला लाहोरच निमंत्रण देता आणि दुसऱ्याबाजूला युद्ध पुकारत हे चुकीचं आहे असा सज्जड दम दिला होता.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

BJP(447)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x