निवडणूक प्रक्रियेत बदल, ईव्हीएम मशीन हद्दपार होणार ?

नवी दिल्ली : देशातील निवडणूक प्रक्रियेत मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. कारण भारतातील लोकशाही अबाधित ठेवण्याचे मोठे काम निवडणूक प्रक्रिया निभावत असते. त्याचाच भाग म्हणून देशातील निवडणूक प्रक्रियेतून ईव्हीएम मशीन हद्दपार होऊ शकतात.
भारतात पुन्हा एकदा मतपत्रिकेद्वारे मतदान घेतले जाण्याची चिन्हं दिसत आहेत. २०१४ पासूनचा निकालानंतर आणि विविध पक्षांच्या आरोपानंतर भाजपने यावर गांभीर्याने विचार सुरु केला आहे. परंतु सर्वच पक्षांचं एकमत झाल्यास निवडणूक प्रक्रियेतून ईव्हीएम मशिन हद्दपार करण्याची तयारी असल्याचे भाजपच्या गोटातून समजत आहे.
ईव्हीएम मशीन संबंधित विविध आरोपानंतर काँग्रेसने भविष्यातील निवडणुकांमध्ये मतपत्रिकांचा वापर करावा अशी विनंती निवडणूक आयोगाकडे केली होती. परंतु आता विविध आरोपानंतर भाजपने सुद्धा यांच्या भूमिकेत बदल केला आहे. ए.एन.आयशी बोलताना भाजपचे सरचिटणीस राम माधव यांनी प्रतिक्रिया दिली की जर विविध पक्षांना वाटत असेल तर आम्हाला परत मतपत्रिकेकडे वळण्यास काहीच अडचण किंव्हा हरकत नाही, केवळ सर्व बाजूंचा विचार करून चर्चा होण्याची गरज आहे. कारण निवडणूक प्रक्रिया ईव्हीएम मशीनकडे वळवण्याचा निर्णय हा सर्वसहमतीने त्यावेळी घेण्यात आला होता, हे फक्त काँग्रेसने विसरू नये असं स्पष्टीकरण सुद्धा भाजपच्या राम माधव यांनी ए.एन.आयशी बोलताना दिल.
२०१४ नंतरच्या विविध निवडणुकीदरम्यान ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार करून निवडणुका जिंकल्या जात आहेत असे आरोप विविध पक्षांकडून केले गेले. त्या आरोपांनी जास्त जोर धरला तो उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या डोळे दिपवून टाकणाऱ्या यशाने. त्यानंतर काँग्रेस आणि विविध राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाकडे हरकती दर्शविल्या होत्या. सध्या नवी दिल्लीत काँग्रेस पक्षाचं अधिवेशन सुरु आहे आणि तिथे तशा आशयाचा ठराव सुद्धा काँग्रेसने मंजूर केला आहे. त्यानंतर पुन्हा भारतातील निवडणूक प्रक्रिया मतपत्रीकेकडे वळवण्याचा विषयाने जोर धरला आहे.
I would like to remind Congress that the decision to shift from paper ballots to EVMs was taken because of a larger consensus. Now today, if every party think that we should return to paper ballots again, after due discussion, we can consider: Ram Madhav, BJP General Secretary pic.twitter.com/nqzf2zVOWQ
— ANI (@ANI) March 17, 2018
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल