8 September 2024 9:07 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | स्वस्त IPO आला रे! पहिल्याच दिवशी मिळेल मोठा परतावा, मोठ्या कमाईची संधी सोडू नका - Marathi News Numerology Horoscope | रविवार 08 सप्टेंबर 2024 | जन्म तारीख आणि अंकज्योतिषशास्त्रानुसार दिवस कसा असेल? - Marathi News Ajay Devgn | 'या' चित्रपटामुळे अजयचं करीयर डुबता-डुबता राहिलं; स्वतः बद्दलचा एक खुलासा - Marathi News Horoscope Today | रविवार 08 सप्टेंबर, 'या' 4 राशींना मिळू शकते खुशखबर, वाचा तुमचं 8 सप्टेंबरचं राशीभविष्य -Marathi News Reliance Share Price | रिलायन्स शेअर्स गुंतवणूकदार मालामाल होणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - Marathi News Credit Card | क्रेडिट कार्डला कंटाळले आहात? फॉलो करा या 5 स्टेप्स, क्रेडिट कार्ड बंद होईल - Marathi News Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर काय परिणाम होणार? - Marathi News
x

लोकसभा निवडणुकीआधी ३ राज्यांमध्ये राहुल गांधी मोदींना जोरदार धक्का देणार, सर्वे रिपोर्ट

नवी दिल्ली : कालच मुख्य निवडणूक आयुक्तांनी राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, मिझोराम आणि तेलंगण या ५ राज्यांमध्ये १२ नोव्हेंबर ते ७ डिसेंबर या कालावधीत मतदान तर, ११ डिसेंबरला मतमोजणी करण्यात येणार असल्याची घोषणा केली. त्याधर्तीवर प्रसारित करण्यात आलेल्या निवडणूक पूर्व सर्व्हेमध्ये मध्य प्रदेश, छत्तीसगढ आणि राजस्थान या ३ तीन राज्यांमध्ये मोदींनी सभा घेताल्यातरी सत्तापरिवर्तन अटळ आहे असं म्हटलं आहे. या तिन्ही राज्यांमध्ये काँग्रेसला बहुमत मिळेल आणि त्यात राजस्थानमध्ये भाजपचा धुव्वा उडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

या सर्वेमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी वरचढ ठरतील तर मोदींना जवळपास नाकारलं जाईल असं हा सर्वे निर्देशित करतो. एबीपी सी वोटरच्या सर्वेनुसार भाजपची चिंता वाढली आहे तर काँग्रेस आणि राहुल गांधींसाठी सुखावणारी बातमी आहे. या सर्वेनुसार, राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये सत्तापरिवर्तन होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्या या तिन्ही राज्यांमधून भाजपची सत्ता असली तरी विधानसभा निवडणुकीनंतर ती जाऊ शकते असं हा सर्वे निर्देशित करतो. विशेष म्हणजे काँग्रेसला या तीनही राज्यांमध्ये स्पष्ट बहुमत मिळू शकतं, असा अंदाज सर्व्हेतून व्यक्त करण्यात आला आहे.

मध्य प्रदेशात विद्यमान मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांची व्यक्तिगत प्रतिमा चांगली असली तरी ‘व्यापम’ घोटाळा, शेतकऱ्यांवर झालेला गोळीबार, १५ वर्षे सत्तेत असल्याने सरकारच्या विरोधातील असलेली प्रचंड नाराजी हे प्रमुख घटक भाजपसाठी घातक ठरू शकतात. मध्य प्रदेशात विधानसभेच्या एकूण २३० जागा आहेत. त्यापैकी काँग्रेसचा १२२ जागांवर विजय होईल. तर भाजपला केवळ १०८ जागा मिळतील, असा अंदाज सर्व्हेतून व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे तब्बल १५ वर्षानंतर मध्य प्रदेशात काँग्रेसची जोरदार इंट्री होणार असल्याचे हा सर्वे सांगतो आहे.

तसेच छत्तीसगड विधानसभेत भाजपला मोठा धक्का बसणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. छत्तीसगड मध्ये विधानसभेच्या एकून ९० जागा असून त्यापैकी एकूण ४७ जागांवर विजय मिळवून काँग्रेस सत्तेवर विराजमान होईल तर भाजपच्या वाट्याला केवळ ४० जागा येतील असं म्हटलं आहे. त्यामुळे छत्तीसगडमध्ये सुद्धा काँग्रेसची सत्ता स्थापन होण्याची शक्यता आहे. मागील विधानसभा निवडणुकीत फार कमी मतांच्या अंतराने भाजपने सत्ता राखली होती.

राजस्थानात पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री वसुंधराराजे यांनी सत्ता कायम राखण्याकरिता शक्ती लावली आहे. या सर्वेनुसार, राजस्थानमधील २०० जागांपैकी भाजपाला फख्त ५६ जागा मिळणार असून भाजपचा पूर्ण धुव्वा उडण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत काँग्रेसच्या मतांमध्ये सुद्धा प्रचंड वाढ होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. राजस्थानमध्ये काँग्रेसला तब्बल ५० टक्के मते मिळतील तर भाजपला ३४ टक्के मत मिळतील. तब्बल १४२ जागावर विजय मिळवत काँग्रेस राजस्थानमध्ये सत्ता स्थापन करेल असा दावा या सर्वेतून व्यक्त करण्यात आली आहे.

तेलंगणामध्ये पुन्हा के. चंद्रशेखर राव सत्तेत येण्याची शक्यता आहे आणि भाजपला तिथे काहीच स्थान नाही. मिझोराममध्ये मागील १५ वर्षे काँग्रेसची सत्ता आहे. मात्र आसाम सहित ईशान्येकडील विविध राज्यांमध्ये सत्ता मिळाल्याने भाजपच्या मिझोराम बाबत आशा उंचावल्या आहेत.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)#Rahul Gandhi(251)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x