17 April 2025 2:17 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA
x

पेड सर्व्हे? लोकसंख्या १३० कोटी आणि १६,९३१ लोकांनी देशाचा ओपिनियन पोल ठरवला?

BJP, Congress

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हवानिर्मितीसाठी पुन्हा पेड सव्हेने तोंड वर काढल्याचे दिसत आहे. बालाकोटमध्ये केलेल्या एअर स्ट्राईकनंतर मोदी सरकारला खरंच फायदा होणार आहे का? असे मथळे छापून आणि प्रश्न विचारून सत्ताधाऱ्यांसाठीच हे केलं जात आहे का असा प्रश्न उपस्थित होतो आहे.

विषय चिंतेचा आहे कारण बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या आणि अनेक गंभीर विषयांना बगल देत एअर स्ट्राईकनंतर सरकारला किती फायदा होईल असे प्रश्न समोर केले जात आहेत. पेड जाहिरातबाजीने अक्षरशः कहर केल्याचं निदर्शनास येत आहे. कारण, टाइम्स नाऊ आणि व्हीएमआरच्या ओपिनियन पोलमध्ये भाजप प्रणित एनडीए बहुमताच्या जवळ दिसत आहे. तर काँग्रेसप्रणित यूपीए मात्र १३५ जागांवर अडकली आहे. ५४३ जागांपैकी एनडीएला २८३, यूपीए १३५ आणि इतर पक्षांचा १२५ जागांचा अंदाज वर्तवण्यात आलाय. एकाबाजूला भाजपला सर्वात मोठा फटका उत्तर प्रदेशात बसताना दिसतोय. तर तामिळनाडूत एआयएडीएमकेला सोबत घेतल्याचाही फायदा झालेला दिसत नाही. तरी देखील भाजपचं अव्वल राहील असा कांगावा केला जात आहे.

भारताची एकूण लोकसंख्या तब्बल १३० कोटीच्या घरात असताना देशभरातून केवळ १६,९३१ लोकांच्या संपर्कातून सर्व्हे केल्याचे सांगत आहेत. तसेच ते कोणत्या पक्षाचे कार्यकर्ते होते की सामान्य लोकं हे देखील समजू शकलेले नाही. दुसरं म्हणजे ती लोकं कोण आणि कोणत्या शहर किंवा राज्यातील आहेत आणि देशातील सर्वच राज्यांमध्ये तो घेण्यात आला का? याचा कोणताही तपशील देण्यात आलेला नाही हे विशेष म्हणावे लागेल.

सदर सर्वे मार्च महिन्यात करण्यात आला असून या सर्व्हेमध्ये १६९३१ लोकांचा सहभाग होता. यापूर्वीच्या सर्व्हेमध्ये एनडीए बहुमतापासून दूर असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र तेव्हापासून दोन महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत. केंद्र सरकारने सादर केलेलं अंतरिम बजेट आणि बालाकोट एअर स्ट्राईक. या पार्श्वभूमीवर या सर्व्हेला महत्त्व प्राप्त झालं आहे. तेलंगणा, केरळ या राज्यांमध्ये भाजप आणि काँग्रेसलाही फटका बसणार आहे. तर दिल्लीमध्ये सातपैकी सात जागा भाजप जिंकताना दिसत आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#india(222)BJP(447)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या