23 February 2025 1:56 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

पेड सर्व्हे? लोकसंख्या १३० कोटी आणि १६,९३१ लोकांनी देशाचा ओपिनियन पोल ठरवला?

BJP, Congress

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हवानिर्मितीसाठी पुन्हा पेड सव्हेने तोंड वर काढल्याचे दिसत आहे. बालाकोटमध्ये केलेल्या एअर स्ट्राईकनंतर मोदी सरकारला खरंच फायदा होणार आहे का? असे मथळे छापून आणि प्रश्न विचारून सत्ताधाऱ्यांसाठीच हे केलं जात आहे का असा प्रश्न उपस्थित होतो आहे.

विषय चिंतेचा आहे कारण बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या आणि अनेक गंभीर विषयांना बगल देत एअर स्ट्राईकनंतर सरकारला किती फायदा होईल असे प्रश्न समोर केले जात आहेत. पेड जाहिरातबाजीने अक्षरशः कहर केल्याचं निदर्शनास येत आहे. कारण, टाइम्स नाऊ आणि व्हीएमआरच्या ओपिनियन पोलमध्ये भाजप प्रणित एनडीए बहुमताच्या जवळ दिसत आहे. तर काँग्रेसप्रणित यूपीए मात्र १३५ जागांवर अडकली आहे. ५४३ जागांपैकी एनडीएला २८३, यूपीए १३५ आणि इतर पक्षांचा १२५ जागांचा अंदाज वर्तवण्यात आलाय. एकाबाजूला भाजपला सर्वात मोठा फटका उत्तर प्रदेशात बसताना दिसतोय. तर तामिळनाडूत एआयएडीएमकेला सोबत घेतल्याचाही फायदा झालेला दिसत नाही. तरी देखील भाजपचं अव्वल राहील असा कांगावा केला जात आहे.

भारताची एकूण लोकसंख्या तब्बल १३० कोटीच्या घरात असताना देशभरातून केवळ १६,९३१ लोकांच्या संपर्कातून सर्व्हे केल्याचे सांगत आहेत. तसेच ते कोणत्या पक्षाचे कार्यकर्ते होते की सामान्य लोकं हे देखील समजू शकलेले नाही. दुसरं म्हणजे ती लोकं कोण आणि कोणत्या शहर किंवा राज्यातील आहेत आणि देशातील सर्वच राज्यांमध्ये तो घेण्यात आला का? याचा कोणताही तपशील देण्यात आलेला नाही हे विशेष म्हणावे लागेल.

सदर सर्वे मार्च महिन्यात करण्यात आला असून या सर्व्हेमध्ये १६९३१ लोकांचा सहभाग होता. यापूर्वीच्या सर्व्हेमध्ये एनडीए बहुमतापासून दूर असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र तेव्हापासून दोन महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत. केंद्र सरकारने सादर केलेलं अंतरिम बजेट आणि बालाकोट एअर स्ट्राईक. या पार्श्वभूमीवर या सर्व्हेला महत्त्व प्राप्त झालं आहे. तेलंगणा, केरळ या राज्यांमध्ये भाजप आणि काँग्रेसलाही फटका बसणार आहे. तर दिल्लीमध्ये सातपैकी सात जागा भाजप जिंकताना दिसत आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#india(222)BJP(447)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x