17 April 2025 4:01 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA
x

अंधेरी पूल दुर्घटना: जीवन ज्योत प्रतिष्ठाणचा रेल्वेसेवा सुरळीत करण्यासाठी राबणाऱ्या 'त्या' कामगारांना मदतीचा हात

मुंबई : अंधेरी पूल दुर्घटना घडल्यानंतर अनेक कामगार रेल्वेसेवा सुरळीत करण्यासाठी भर पावसात राबताना दिसत आहेत. परंतु त्यात आता माणुसकीच दर्शन घडविणाऱ्या घटना सुद्धा दिसू लागल्या आहेत. भर पावसात रेल्वेसेवा सुरळीत करण्यासाठी राबणाऱ्या कामगारांसाठी मुरजी पटेल यांच्या जीवन ज्योत प्रतिष्ठाण या समाजसेवी संस्थेने मदतीचा हात पुढे केला आहे.

भर पावसात रेल्वेसेवा सुरळीत करण्यासाठी राबणाऱ्या कामगारांसाठी जीवन ज्योत प्रतिष्ठाणने खाण्या-पिण्याच्या वस्तू प्रत्यक्ष ठिकाणाला भेट देऊन पुरविल्या आहेत. दिवसभर मुंबईमध्ये पावसाचा जोर कायम असून त्यात भर म्हणजे अनेक व्हीआयपी प्रत्यक्ष ठिकाणाला भेट देत असल्यामुळे, प्रत्यक्ष ठिकाणी राबणाऱ्या कामगारांकडे कोणाचे लक्ष जात नव्हते. परंतु प्रत्यक्ष घटनास्थळाच्या भेटी दरम्यान भाजपचे नगरसेवक असलेले मुरजी पटेल यांच्या ते निदर्शनास येताच, त्यांनी पुढाकार घेऊन त्या कामगारांना जीवन ज्योत प्रतिष्ठाण तर्फे मोफत खाण्यापिण्याच्या वस्तूंची त्याच ठिकाणी सोया करून दिली, तेव्हा कामगारांचा जीव भांड्यात पडला असं दिसत होत.

दुर्घटना घडली असली तरी सध्या ही वेळ रेल्वेसेवा लवकरात लवकर पूर्ववत कशी करता येईल हे महत्वाचे आहे. ज्यामुळे लाखो प्रवाशांचा खोळंबा होणार नाही आणि आजचा दिवस जरी मुंबईकरांना खूप दगदगीचा गेला असेल तरी लवकरात लवकर रेल्वेसेवा पूर्ववत कशी करता येईल यावर प्रशासनाचा भर आहे. कारण उद्या मुंबईकर पुन्हा आपल्या दैनंदिन कामासाठी पुन्हा घराबाहेर निघेल आणि त्याआधी रेल्वेसेवा पूर्ववत होणे गरजेचे आहे. अशावेळी जीवन ज्योत प्रतिष्ठाण सारख्या समाजसेवी संस्थेचा खारीचा वाटा सुद्धा महत्वाचा ठरतो.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

BJP(447)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या