22 February 2025 2:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | नशीब आणि आकड्यांचा खेळ, अंकज्योतिषशास्त्रानुसार 16 फेब्रुवारी तुमचा रविवारचा दिवस कसा असेल IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी होईल मोठी कमाई, अशी संधी सोडू नका - IPO Watch SBI Home Loan | SBI बँकेतून 25 लाखांचे होम लोन 15 वर्षांसाठी घेतले तर, किती रुपयांचा मासिक EMI भरावा लागेल, येथे पहा Smart Investment | पगारदारांनो, पैसे बँकेत ठेऊन वाढत नसतात, या योजनेत महीना 5000 रुपये बचत देईल 2.5 कोटी रुपये परतावा Improve Credit Score | प्रत्येक बँक कर्ज देण्यास टाळाटाळ करतेय, करा केवळ एक काम, मिनिटांत मिळेल कर्ज Home Loan Charges | 90 टक्के पगारदारांना माहित नाही, बँकेतून गृह कर्ज घेताना कोणकोणते चार्जेस वसूल केले जातात 5G Mobile Under 10000 | स्मार्टफोन सॅमसंग Galaxy F06 5G ची भारतात सेल सुरू, किंमत फक्त 10,000 रुपये, इथे पहा ऑफर्स
x

भाजप आमदाराच्या वक्तव्याने महिलांमध्ये संतापाची लाट

नवी दिल्ली : मुलींनो तुमच्यावर होणारे अत्याचार थांबवायचे असतील तर आधी बॉयफ्रेंड बनवणे सोडा हे विधान केलं आहे मध्य प्रदेशातील भाजपचे आमदार पन्नालाल शाक्य यांनी. त्यावर महिलांकडून संतप्त प्रतिक्रिया येत असून त्या विचारात आहेत की, इथे रोज ४-५ वर्षाच्या तान्ह्या मुली आणि ८० वर्षाच्या आजींवर सुद्धा कुठल्यातरी विकृताकडून बलात्काराच्या घटना रोज देशभरात घडत आहेत, म्हणजे त्या ४-५ वर्षाच्या तान्ह्या मुली आणि ८० वर्षाच्या आजींनासुद्धा बॉय फ्रेंड असतो का अशा तीव्र प्रतिकिया महिला नोंदवत आहेत.

भाजपचे हे महोदय इतक्यावरच थांबले नाही तर पुढे ते असे बरगळले की, आपल्या देशात महिलांची ४ वेळा पूजा केली जाते आणि असे असेल तरी आम्ही कसे म्हणावे की महिलांवर अत्याचार होतो. इतकंच नाही तर महिलांवरील अत्याचाराचे आकडे दिवसेंदिवस वाढतच असताना भाजपचे हे महोदय पुढे असे ही म्हणाले की, आकडे काहीही सांगतात.

पुढे मुलींना सल्ला देताना भाजपचे आमदार पन्नालाल शाक्य बरगळले की, ‘मुलींनो, जर तुमच्यावरील अत्याचार रोखायचे असतील तर पहिलं बॉयफ्रेंड बनवणे सोडून द्या. तुम्ही जर बॉयफ्रेंड बनवला नाही तर तुमच्यावर अत्याचार होणार नाहीत, अशी मुक्ताफळं या महाशयांनी एका महाविद्यालयातील कार्यक्रमात उधळली आहेत.

महिलावर्गातून यावर तीव्र प्रतिक्रिया येत आहेत.

अनेक महिलांनी प्रश्न केला की, इथे रोज ४-५ वर्षाच्या तान्ह्या मुली आणि ८० वर्षाच्या आजींवर सुद्धा कुठल्यातरी विकृताकडून बलात्कार होण्याच्या घटना रोज देशभरात घडत आहेत, म्हणजे त्या बलात्काराच्या बळी ठरलेल्या ४-५ वर्षाच्या तान्ह्या मुली आणि ८० वर्षाच्या आजींनासुद्धा बॉय फ्रेंड असतो का अशा तीव्र प्रतिकिया महिला नोंदवत आहेत.

काही महिलांनी ‘निर्भयाचं’ उदाहरण देत संताप व्यक्त केला. तर महाराष्ट्रातून सुद्धा भाजप विरुद्ध संतप्त आणि तीव्र प्रतिक्रिया महिलावर्गातून उमटत आहेत. काही महिलांनी थेट ‘मोदींच्या मन की बात’ चा दाखला दिला की, भाजप जेव्हापासून सत्तेत आले आहे, तेंव्हापासून महिलांवरील अत्याचारात प्रचंड वाढ झाली आहे आणि त्यासाठी काय उपाय योजना आखल्या जात आहेत हे आम्ही मोदींच्या ‘मन कि बात’ मध्ये कधीच ऐकले नाही. उलटपक्षी असेच म्हणावे लागेल की हे सरकार महिलांप्रती विचारशून्य आहे, त्यामुळेच ही अशी वक्तव्य भाजपचे नेते करत आहेत.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Amit Shah(265)#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x