21 April 2025 10:47 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांच्या HRA मध्ये बदल होणार, हिशेबही नवीन बेसिक प्रमाणे, अपडेट जाणून घ्या EPFO Pension News | खाजगी कंपनी पगारदारांसाठी मोठी बातमी, EPFO ची महिना 7500 रुपये मिनिमम पेन्शन मिळणार SBI Mutual Fund | पगारदारांनो, बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 1 लाखांच्या गुंतवणुकीवर 1.27 कोटी परतावा मिळेल Horoscope Today | 22 एप्रिल 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या HFCL Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या स्वस्त शेअर्सची जोरदार खरेदी, 5 दिवसात 12.59% तेजी - NSE: HFCL Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 22 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

थेट निवडणुका जिंकणं कठीण झाल्याने भाजप कर्नाटकात पुन्हा घोडेबाजार करणार?

बंगळुरू : कर्नाटक विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर सत्तास्थापनेवेळी मोठ्या प्रमाणावर घोडेबाजार पाहायला मिळाला होता. दरम्यान, कर्नाटकात भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्यानं येडीयुरप्पा यांनी सरकार स्थापन केलं होत. परंतु, बहुमत सिद्ध करता येणे शक्य नसल्याचे कळताच केवळ दीड दिवसांतच येडीयुरप्पा यांना मुख्यमंत्रीपद सोडावे लागले होते.

तर दुसरीकडे सर्वात कमी जागा असून सुद्धा जेडीएसच्या कुमारस्वामी यांच्या नशिबी मुख्यमंत्रीपद आलं होतं. परंतु, आता पुन्हा कर्नाटकमध्ये घोडेबाजार होण्याची शक्यता वर्तविण्यात येते आहे. राज्य मंत्रीमंडळाच्या फेरबदलानंतरच या सर्व हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे. कारण मंत्रिमंडळात वर्णी न लागल्याने नाराज होणाऱ्या काँग्रेस आणि जेडीएसच्या काही आमदारांना गळाला लावून सरकार पाडण्याचे प्रकार होण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली आहे.

भारतीय जनता पक्षाचे आमदार उमेश कट्टी यांच्या एका विधानामुळे कर्नाटकमधील सत्तासंघर्ष चव्हाट्यावर आला आहे. आमदार कट्टी यांनी विधान केलं होतं की, काँग्रेस-जेडीएस पक्षातील एकूण १५ नाराज आमदारांच्या मी थेट संपर्कात आहे. जर, ते तिथे नाराज असतील आणि भाजपात येऊ इच्छित असतील तर त्यांचे स्वागत आहे, असे कट्टी यांनी म्हटले. त्यानंतर याचर्चांना पुन्हा हवा मिळाली आहे. उमेश कट्टी हे कट्टर भाजपा समर्थक असून ते तब्बल ८ वेळा भाजपाच्या तिकीटावर आमदार म्हणून निवडून आले आहेत.

दरम्यान, भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी मात्र हे वृत्त फेटाळले आहे. भाजपा कुठल्याही विद्यमान काँग्रेस आमदाराच्या संपर्कात नसल्याचं त्यांनी म्हटलंय. तर काँग्रेसनेही उमेश यांचा हे विधान केवळ संभ्रम पसरवण्यासाठी असल्याचे म्हटले आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

BJP(447)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या