17 April 2025 10:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | पैसे बचत करून वाढणार नाहीत, तर अशाप्रकारे स्मार्ट बचत करून वाढवा, मिळेल 1 कोटी रुपये परतावा Gratuity Money Alert | तुमचा पगार किती आहे? तुमच्या शेवटच्या पगारानुसार कंपनी एवढी ग्रॅच्युटी रक्कम देणार, अपडेट जाणून घ्या EPFO Money Alert | खाजगी कंपनी पगारदारांसाठी अपडेट, EPFO खात्यातून 5 लाखांपर्यंतची रक्कम ऑटो सेटलमेंट काढता येणार Horoscope Today | 18 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 18 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Yes Bank Share Price | येस बँकेचा पेनी स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी सांगितली टार्गेट प्राईस - NSE: YESBANK Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिली महत्वाची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATAMOTORS
x

देशातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देत नाही तोपर्यंत मोदींना झोपू देणार नाही: राहुल

नवी दिल्ली: जोपर्यंत देशातील सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी देत नाही तोपर्यंत आम्ही पंतप्रधान मोदींना झोपू देणार नाही, असा थेट इशारा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना दिला आहे. इतकंच नाही तर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी देशातील सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज असल्याचं सुद्धा राहुल गांधी यांनी सांगितलं आहे. केवळ घोषणा करणाऱ्या मोदी सरकारने आतापर्यंत शेतकऱ्यांचं एक रुपयाचं कर्ज सुद्धा माफ केलेलं नाही, असं राहुल प्रसारमाध्यमांशी थेट संवाद साधताना म्हणाले.

आजच्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने त्यांनी कामकाजात सहभागी होण्यापूर्वी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये कालच काँग्रेस नेत्यांचे मुख्यमंत्रीपदाचे शपथविधी संपन्न झाले. यानंतर नवनियुक्त मुख्यमंत्र्यांनी पदभार स्वीकारताच अवघ्या काही तासातच मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा केली.

त्याच मुद्याला अनुसरून काँग्रेस अध्यक्ष राहुल यांनी मोदींवर निशाणा साधला. त्यावेळी ते म्हणाले की, ‘काल काँग्रेसच्या दोन मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची घोषणा केली. कर्जमाफीचा निर्णय घ्यायला आम्हाला ६ तासदेखील लागले नाहीत. मात्र मोदी साडेचार वर्षांपासून पंतप्रधान आहेत. त्यांनी या काळात देशातील शेतकऱ्यांचं एक रुपयाचंही कर्ज अजून माफ केलेलं नाही,’ अशा कडक शब्दांमध्ये राहुल यांनी मोदींवर निशाणा साधला.

पुढे ते असं म्हणाले की, ‘मोदींनी देशाला २ भागांमध्ये विभागलं आहे. यातील एका भागात फक्त १५ जण आहेत. यामध्ये मोदींचे लाडके उद्योगपती आहेत. त्यांची मोठं मोठी कर्ज ते लगेच माफ करतात. मात्र दुसऱ्या भारतात असलेल्या सर्वसामान्य जनतेला त्यांच्याकडून काही मिळत नाही. परंतु, यापुढे जोपर्यंत देशातील सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळत नाही, तोपर्यंत आम्ही मोदींना झोपू देणार नाही,’ असा थेट इशारा राहुल यांनी मोदींना दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)#Rahul Gandhi(251)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या