19 April 2025 1:45 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट PPF Investment | पगारदारांनो, या सरकारी योजनेत वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या बचत करा, तब्बल 1.5 कोटी रुपये परतावा मिळेल Horoscope Today | 19 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Infosys Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेल्या IT स्टॉकसाठी BUY रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: INFY IRFC Share Price | 129 रुपयाच्या शेअरसाठी 165 रुपये टार्गेट प्राईस, महत्वाची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC Reliance Share Price | कोटक सिक्युरिटीज बुलिश, जाहीर केली टार्गेट प्राईस, गुंतवणूकदारांसाठी अपडेट - NSE: RELIANCE
x

२०१९ मध्ये राजकीय परिस्थिती बदलण्यास वातावरण अनुकूल: शरद पवार

सातारा : भाजपचा मागील ४ वर्षातील कारभार बघता सामान्य जनतेत प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे कोणाला नक्की किती जागा मिळतील किंव्हा सरकार बनेल की नाही हे सध्या सांगण कठीण असलं तरी २०१९ मध्ये राजकीय परिस्थिती बदलण्यास वातावरण अनुकूल असं राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसेवा शरद पवार म्हणाले.

साताऱ्यात रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांची ५९ वी पुण्यतिथी असल्याने शरद पवारांची विशेष उपस्थिती होती. २०१९ मधील निवडणुकीत भाजपला रोखण्यासाठी अन्य पक्षांनी एकत्र येणे गरजेचे आहे. काँग्रेस सोबतच्या आघाडीबाबत शरद पवारांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता पवार म्हणाले की, ‘राज्यासह केंद्रात काँग्रेससोबत एकत्र काम करण्याची आमची इच्छा आहे. सध्या राज्यात काँग्रेसची ताकद कमी झाली असली तरी देशातील अनेक राज्यात काँग्रेसचे अस्तित्व अजून कायम आहे, ते आपण मान्य केले पाहिजे असं मत त्यांनी नोंदवलं.

भाजप कृषी संशोधन केंद्रांतील कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा भाजप सरकार भरत नाहीत यावर शरद पवारांनी नेमकं बोट ठेवलं. तसेच राज्यात अनेक संस्थांना प्रमुख नेमलेच नाहीत असं पवार म्हणाले. तसेच देशाच्या संसदीय लोकशाहीत लोकांच्या मनातील संशय दूर करणे हे भारताच्या निवडणूक आयोगाचे कर्तव्य आहे. ते कर्तव्य त्यांनी चोखपणे बजावले तरच ते लोकशाहीच्या हिताचे असेल असं मत निवडणूक आयोगाच्या भुमिकेबाबत बोलताना पवार यांनी पत्रकारांसमोर व्यक्त केलं.

तसेच महाराष्ट्रात भाजप सरकार सर्वत्र मराठीचा वापर करण्याबाबतचा परिपत्रक काढत, परंतु मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत भाजप सरकार कोणत्याच हालचाली करीत नसल्याच मत पवारांनी मांडल. तसेच धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करण्याबाबतचे भाजपचे आश्वासन हवेतच विरळ आहे असं पवार म्हणाले.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या