22 February 2025 3:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | नशीब आणि आकड्यांचा खेळ, अंकज्योतिषशास्त्रानुसार 16 फेब्रुवारी तुमचा रविवारचा दिवस कसा असेल IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी होईल मोठी कमाई, अशी संधी सोडू नका - IPO Watch SBI Home Loan | SBI बँकेतून 25 लाखांचे होम लोन 15 वर्षांसाठी घेतले तर, किती रुपयांचा मासिक EMI भरावा लागेल, येथे पहा Smart Investment | पगारदारांनो, पैसे बँकेत ठेऊन वाढत नसतात, या योजनेत महीना 5000 रुपये बचत देईल 2.5 कोटी रुपये परतावा Improve Credit Score | प्रत्येक बँक कर्ज देण्यास टाळाटाळ करतेय, करा केवळ एक काम, मिनिटांत मिळेल कर्ज Home Loan Charges | 90 टक्के पगारदारांना माहित नाही, बँकेतून गृह कर्ज घेताना कोणकोणते चार्जेस वसूल केले जातात 5G Mobile Under 10000 | स्मार्टफोन सॅमसंग Galaxy F06 5G ची भारतात सेल सुरू, किंमत फक्त 10,000 रुपये, इथे पहा ऑफर्स
x

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना केवळ १० वर्षांसाठी आरक्षण हवं होतं : सुमित्रा महाजन

रांची : लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी आरक्षणावर आश्चर्यकारक विधान केलं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना केवळ १० वर्षांसाठी आरक्षण हवं होतं असं थेट विधान त्यांनी एका कार्यक्रमात केलं आहे. शिक्षण तसेच नोकरीमध्ये कायमचं आरक्षण मिळणं हे योग्य आहे का, असा प्रश्न सुद्धा त्यांनी उपस्थित केला आहे. त्यांच्या या विधानामुळे वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे.

रांचीमध्ये सुरू असलेल्या ४ दिवसीय लोकमंथन कार्यक्रमात त्या उपस्थितांसमोर बोलत होत्या. दरम्यान त्या म्हणाल्या की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा सांगितलं होतं, की आरक्षण केवळ १० वर्षांकरिता आवश्यक आहे. परंतु आरक्षणानं देशाचं कल्याण होणार आहे काय ?, असा प्रश्न सुद्धा सुमित्रा महाजन यांनी उपस्थित केला आहे. परंतु असं असलं तरी देशाला पुढे नेण्यासाठी आंबेडकरांनी दिलेल्या मार्गानं चालणं गरजेचं आहे अशी टिपणी सुद्धा त्यांनी जोडली.

जोपर्यंत तुमच्या मध्ये देशाबद्दलची भक्ती वाढणार नाही, तोपर्यंत देशाचा विकास अशक्य आहे. संसद दिवसेंदिवस आरक्षण वाढवत चाललं आहे. प्रत्येक वेळी १० वर्षांसाठी आरक्षण वाढवलं जातंय. एकदा तर आरक्षणाची मुदत तब्बल २० वर्षांसाठी वाढवण्यात आली होती आणि असं कधीपर्यंत चालणार आहे असं प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. आमच्या सरकारनं धर्म परिवर्तनविरोधी कायदा केला.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

BJP(447)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x