23 February 2025 2:45 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

पुतळ्यासाठी पैसे आहेत, मग नक्कीच भारताला आपण पैसे द्यायला नको: पीटर बोन

इंग्लंड : गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचा १८५ मीटर उंचीच्या भव्य पुतळ्याचं अनावरण झालं आणि त्यावर जगभरातून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. दरम्यान, जगातला सर्वांत उंच पुतळा बांधल्याबद्दल एकीकडे मोदी सरकार स्वतःची पाठ थोपटून घेत आहे, तर विरोधक या पुतळ्यावर ३ हजार कोटी खर्च केल्याबद्दल मोदी सरकारवर सडकून टीका करत आहेत. परंतु, आता आंतरराष्ट्रीय स्तरावरून सुद्धा या स्मारकावर टीका होत आहे.

कारण इंग्लंडच्या पार्लमेंटरिअन पीटर बोन यांनी ‘स्टेच्यू ऑफ युनिटी‘वरून भारतावर कडक शब्दांत टीका केली आहे. भारताने त्यांचे पैसे कशावर आणि कुठे खर्च करावेत हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. परंतु, जर भारताकडे अशा भव्य पुतळ्यांसाठी खूप पैसे आहेत, तर नक्कीच त्या देशाला आम्ही पैसे द्यायला नको, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे.

२०१२ साली ब्रिटिश करदात्यांच्या पैशांतून १.१७ कोटी पाऊंड्सचा निधी इंग्लंडने तत्कालीन भारत सरकारला आर्थिक सहाय्य म्हणून पुरवला होता. परंतु, नंतरच्या बदललेल्या सरकारने त्यातील तब्बल ३३० दशलक्ष पाऊंड्स हे ५९७ फूट उंचीचा ब्राँझचा पुतळा उभारण्यात खर्च केले. आमच्याकडून १.१ बिलियन पाऊंड्सचं सहाय्य घेऊन त्या रक्कमेतील ३३० दशलक्ष पाऊंड्स पुतळ्यावर खर्च करणं म्हणजे निव्वळ मुर्खपणा आहे, असं रोखठोक वक्तव्य बोन यांनी मोदी सरकारबद्दल केल आहे. तसंच यापुढे भारताला पैसे पुरवायला नको, हेच यातून सिद्ध होतं आहे असं ते पुढे म्हणाले.

२०१३ साली २६८ मिलियन पाऊंड्सची, २०१४ साली २७८ मिलीयन पाऊंड्सची आणि २०१५ साली १५८ दशलक्ष पाऊंड्सची मदत इंग्लंडने भारत सरकारला केली होती. या शिवाय गुजरातमधील तरुणांमध्ये धार्मिक सहिष्णुता वाढावी, यासाठी १४,००० पाऊंड्सची नगद रक्कम सुद्धा इंग्लंडने गुजरात सरकारला दिली होती.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x