22 February 2025 11:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

बेरोजगार युवक मोदींच्या २ कोटी रोजगाराची आतुरतेने वाट बघत आहेत : डॉ. मनमोहन सिंग

नवी दिल्ली : काँग्रेसचे वरिष्ठ नेते कपिल सिब्बल यांच्या ‘शेड्स ऑफ ट्रूथ- ए जर्नी डिरेल्ड’ पुस्तकाचे प्रकाशन माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या हस्ते काल करण्यात आले. त्यावेळी त्यांनी मोदी सरकारच्या अनेक आश्वासनांचे वाभाडे काढले. त्यावेळी उपस्थितांना संबोधित करताना डॉ. मनमोहन सिंग यांनी मोदी सरकारच्या अनेक फसव्या घोषणांना उजाळा दिला.

त्यावेळी बोलताना डॉ. मनमोहन सिंग म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दोन कोटी रोजगार देऊ, युवकांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देऊ असे आश्वासन दिले होते. परंतु ते हवेत विरले का? बेरोजगार युवक २ कोटी रोजगाराची खूप आतुरतेने वाट पहात आहेत, असा टोला लगावला. मागील ४ वर्षात रोजगाराच्या संधी वाढण्याऐवजी त्या अधिक प्रमाणात घटल्या आहेत. आम्ही रोजगाराच्या, नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या असे नरेंद्र मोदी सरकारकडून सांगण्यात येत असले तरी सुद्धा त्यात अजिबात तथ्य नसल्याचे डॉ. मनमोहन सिंग यांनी म्हटले आहे.

तसेच ढासळत्या अर्थव्यवस्थेवर बोलताना डॉ. मनमोहन सिंग म्हणाले की, ‘मेक इन इंडिया’, स्टँड अप इंडिया यांसारख्या योजनांचा हवा तसा सकारात्मक परिणाम दिसून आलेला नाही. केवळ घाईने घेण्यात आलेल्या नोटाबंदीच्या आणि जीएसटी लागू करण्याच्या निर्णयामुळे आर्थिक आघाडीवर देशातील उद्योग क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे अशी जाहीर टिपणी सुद्धा त्यांनी केली आणि मोदी सरकारच्या विविध योजनांचे वाभाडे काढले.

विद्यमान कृषी व्यवस्थेवर बोलताना मनमोहन सिंग म्हणाले की, मोदी सरकारच्या काळात देशातल्या शेतकऱ्यावर दुर्दैवाने अश्रू ढाळण्याची वेळ आली आहे. कारण या मोदी सरकारचे कृषी विषयक धोरण शेतकऱ्यांना पुरक असे ठरू शकलेले नाही. लोकसभा निवडणुकांच्या आधी मोदींनी जी आश्वासने दिली होती त्यातील कोणतेही आश्वासन या सरकारने पूर्ण केलेली नाहीत, अशीही जळजळीत टीका त्यांनी उपस्थितांसमोर बोलताना केली.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Congress(527)#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x