17 April 2025 9:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA
x

मुंबईत मुख्यमंत्र्यांशी चर्चेला जाणाऱ्या प्रतिनिधींचा लातूरमध्ये मराठा समाजाच्या राज्यस्तरीय बैठकीत निषेध

लातूर : आज मुंबईमध्ये सह्याद्री अतिथीगृहावर मराठा समाजाचे काही समन्वयक आणि राज्य सरकार यांच्यात चर्चा झाली. परंतु त्या विरुद्ध आज लातूर मध्ये पार पडलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यस्तरीय बैठकीत मुंबईमधील बैठकीचा तीव्र निषेध करण्यात आला आणि मुंबईतील ती चर्चा आम्हाला मान्य नाही अस सांगण्यात आलं. तसेच यापुढे सरकारशी कोणतीही चर्चा न करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला.

राज्य सरकारने आता ठोस निर्णय घेवूनच चर्चेला समोर यावे अन्यथा यापुढे कोणतीही चर्चा केली जाणार नाही असं थेट आवाहन सरकारला करण्यात आलं आहे. लातूरमध्ये आज राहिचंद्र मंगल कार्यालयात सकाळी मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यस्तरीय बैठकीला सुरवात झाली तेव्हा जिल्ह्यातील सर्व समन्वयक आपली बाजू मांडत होते. त्यावेळी मुंबईतील बैठकी विषयी चर्चा झाली तेव्हा, अशा चर्चेच्या माध्यमातून राज्य सरकार हे आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न करीत आहे असा सरकारवर थेट आरोप आंदोलकांनी केला.

आता मुख्यमंत्र्यांनी चर्चेत वेळ न घालवता ठोस निर्णय घेवूनच आमच्या समोर चर्चेला यावे अशी ठाम भूमिका घेण्यात आली. सरकार केवळ मुंबईत चर्चा घडवून आंदोलकांमध्ये जाणीवपूर्वक संभ्रमाचं वातावरण निर्माण करत असल्याचा आरोप सुद्धा आंदोलकांनी राज्य सरकारवर केला आहे. त्यामुळे आंदोलकांमध्ये फूट पडल्याचा संदेश जाऊन आंदोलनाची धार कमी करण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचं आंदोलकांच म्हणणं आहे. त्यामुळे लातूरमधील घडामोडीनंतर सरकार नक्की काय करत ते पाहावं लागणार आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Maratha Kranti Morcha(221)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या