17 April 2025 1:08 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA
x

मुलाच्या प्रचारासाठी रामदास कदम ब्लँकेट व छत्र्या वाटून मतदारांना मूर्ख बनवत आहेत

मंडणगड : दापोली, मंडणगड आणि खेड तिनही तालुक्यात पाणीप्रश्न, रस्ते आणि बेरोजगारीसोबतच इतर अनेक मोठ्या समस्या स्थानिकांना भेडसावत असताना असताना केवळ ब्लँकेट, छत्री आणि फराळ वाटून मतदारांना आमिष आणि भुलवण्याचे काम राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम करत असल्याची खरमरीत टीका एनसीपीचे आमदार संजय कदम यांनी केली.

काल आंबवणे खुर्द बौद्धवाडी येथील रस्त्याचे भूमिपूजन एनसीपीचे स्थानिक विद्यमान आमदार संजय कदम यांच्या हस्ते पार पडले. यावेळी आयोजित स्वागत समारंभ कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी हे भाष्य केले आणि रामदास कदमांवर टीकास्त्र सोडले. दरम्यान, पुढे ते असं सुद्धा म्हणाले की ‘मागील ३० वर्षात या मतदार संघातील शिवसेनेच्या खासदार निधीतून मागासवर्गीयांसाठी राखीव असलेला १० टक्के निधी तालुक्यात किती मागासवर्गीय वाड्यांमध्ये खर्च केला आहे? ते आधी पुराव्यानिशी दाखवून द्यावे, असे थेट आव्हान देत शिवसेनेला लक्ष केले.

दरम्यान आंबवणे खुर्द गावातील राजकीय स्थितीकडे जराही लक्ष न देता येथील सामाजिक कार्यकर्ते प्रमोद तांबे आणि ग्रामस्थांच्या इच्छेनुसार रस्त्याचे काम मी तातडीने मंजूर केले आणि कोणताही पक्षपात केला नाही. कारण रामदास कदम यांच्या प्रमाणे ब्लँकेट, छत्री आणि फराळ वाटून लोकांच्या खऱ्या गरजा पूर्ण होत नाहीत. कारण अनेक वर्षांपासून या गावागावांमध्ये मुलभूत सुविधांचीच उणीव आहे. कारण, पूर्वी ३ महिन्यांनी येणारे घरातील विजेचे बिल आता प्रत्येक महिन्याला येते. विशेष म्हणजे याच मतदार संघात पाणीप्रश्न, रस्ते, बेरोजगारी अशा एक ना अनेक गंभीर समस्या असताना केवळ स्वतःच्या मुलाच्या प्रचारासाठी ते भेटवस्तू देऊन मतदारांना मूर्ख बनवत आहेत.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Ramdas Kadam(14)#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या