23 February 2025 1:53 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राज्यात दंगली उसळतील: आमदार बच्चू कडू

अकोला : शेतकऱ्यांच्या प्रश्नावर महाराष्ट्र सरकार जर असंच असंवेदनशील राहिल्यास दंगली उसळतील असा सज्जड इशारा आमदार बच्चू कडू यांनी दिला आहे. अकोला येथे आयोजित करण्यात आलेल्या मुक्काम मोर्चादरम्यान उपस्थितांना संबोधित करताना आमदार बच्चू यांनी हे वक्तव्य केलं आहे. दरम्यान, यावेळी बोलताना शेतकऱ्यांच्या तुरीचे चुकारे द्या, अन्यथा अमरावतीचं विभागीय मार्केटिंग अधिकाऱ्याचं कार्यालय जाळून टाकू, अशी धमकी सुद्धा आमदार बच्चू कडू यांनी जाहीरपणे दिली आहे.

भाषणादरम्यान बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या तुरीचे चुकारे देण्यास उशीर केल्याबद्दल फडणवीस सरकारला तिखट शब्दात धारेवर धरलं आहे. तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, पुढच्या १५ दिवसांत शेतकऱ्यांच्या तुरीचे चुकारे द्या, अन्यथा अमरावतीचं विभागीय मार्केटिंग अधिकाऱ्याचं कार्यालयच जाळून टाकू.

दरम्यान, आमदार बच्चू कडू यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने २० दिवसांची मुदत मागितली आहे. तर दुसरीकडे आमदार बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न निकाली काढण्यासाठी केवळ ६ दिवसांचा अल्टिमेटम स्थानिक प्रशासनाला दिला आहे. १९ ते २४ नोव्हेंबर दरम्यान शेतकऱ्यांचे सर्व प्रलंबित प्रश्न निकाली काढावे असा अल्टिमेटम फडणवीस सरकारला देण्यात आला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)BJP(447)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x