19 April 2025 1:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट PPF Investment | पगारदारांनो, या सरकारी योजनेत वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या बचत करा, तब्बल 1.5 कोटी रुपये परतावा मिळेल Horoscope Today | 19 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Infosys Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेल्या IT स्टॉकसाठी BUY रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: INFY IRFC Share Price | 129 रुपयाच्या शेअरसाठी 165 रुपये टार्गेट प्राईस, महत्वाची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC Reliance Share Price | कोटक सिक्युरिटीज बुलिश, जाहीर केली टार्गेट प्राईस, गुंतवणूकदारांसाठी अपडेट - NSE: RELIANCE
x

वणी पालिका भाजपकडे, लोकांची तहान भागवते राज ठाकरेंची मनसे

यवतमाळ : वणी शहराची एक हाती सत्ता भाजपकडे असताना सुद्धा इथे स्थानिकांच्या पाण्याचा प्रश्न अधिकच बिकट बनला आहे. सत्ताधारी केवळ टँकर माफियांना पोसण्यातच मग्न असून त्यांचे शहरवासीयांच्या मूळ समस्येकडे संपूर्ण दुर्लक्ष आहे. मे महिन्यामुळे उन्हाची झळ सर्वच घरात पोहोचली असून प्राण्याचा प्रश्न अधिकच गंभीर झाला आहे. परंतु इथल्या स्थानिकांची रोजची तहान भागविण्याची जवाबदारी मनसेचे राजू उंबरकर आणि पदाधिकारी नित्याने पेलत आहेत.

शहरात आठ वर्षांपूर्वी भीषण पाणी टंचाई झाली होती. त्या पाणी टंचाईचे मूळ कारण पालिकेचे पाण्यासंबंधित असलेले धोरण हेच जवाबदार होते. शहरात भाजपची एक हाती सत्ता आल्याने अनेक प्रश्न मार्गी लागतील अशी नागरिकांची अटकळ होती जी फोल ठरली आहे. कारण पाण्याच्या टंचाईची झळ तीव्र झाल्यावर पालिका प्रशासनाला जाग आली आहे. भाजपप्रणीत पालिकेचा हा प्रकार म्हणजे तहान लागल्यावर विहीर खोदायला घेणे असाच म्हणावा लागेल. त्यांनी केवळ वर्धा नदीचं आता तारणहार आहे असा नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण केला. कारण भुरकी घाटावरून वर्धा नदीच्या पात्रातून शहरात यावर्षी पाणीपुरवठा होणे शक्य नाही. पालिका प्रशासन शहरवासीयांच्या डोळ्यात केवळ धूळपेक करत असल्याचा आरोप शहरवासी करत आहेत.

महत्वाचं म्हणजे पालिकेने सुरु केलेले टँकर नक्की कुठे पाणी पुरवठा करतात तेच कळू शकलेलं नाही. त्यामुळे भाजपप्रणीत पालिका प्रश्नाचे वेगळेच हितसंबंध असावेत अशी कुजबुज शहरात सुरु आहे. शहरात ऐन मे महिन्यात प्रचंड पाणी टंचाई झाली असताना राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहरवासीयांसाठी धावून आली असून त्यांनी वणी शहरात मागेल त्याला पाणी हा उपक्रम सुरु केल्याने स्थानिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

पाणी प्रश्नामुळे आगामी निवडणुकीत सत्ताधारी भाजपला वणी शहरातील नागरिकांनी फटका दिल्यास नवल वाटायला नको. कारण स्थानिकांच्या पाणी प्रश्नावर मनसेचे नेते राजू उंबरकर आणि पदाधिकारी अनेक वर्ष लढा देत असून वेळप्रश्नी स्वतः आर्थिक हातभार लावून लोकांच्या समस्या दूर करण्यावर भर देत आहेत.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या